शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

खेड्यातील जीवन आनंददायी

By admin | Updated: January 14, 2015 00:35 IST

विजय भोसले : म्हाकवे येथे सत्संग व्याख्यानमालेस प्रारंभ

म्हाकवे : शहरांपेक्षा खेड्यांतील जीवन आनंदी, निरोगी आणि चैतन्यमय असते. सध्या खेड्यांनीही शहरीकरणाची आस धरल्याने कुटुंबातील सुसंवाद हरवत चालला आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी पुढाकार घेऊन कुटुंबातील सुसंवाद वाढवावा, असे आवाहन प्रा. विजय भोसले (कोल्हापूर) यांनी केले.म्हाकवे (ता. कागल) येथील सत्संग व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सदाशिव पाटीव होते. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.महिला चैतन्यमयी, उत्साही आणि तितकीच संयमी असेल, तर त्या घरातील वातावरण प्रसन्न असते. पैसा, दागदागिन्यांपेक्षा संस्कारमूल्य आपल्या भावी पिढीला प्रेरणादायी ठरणारी आहेत. इंग्रजी जरूर शिका, पण आपली मूळ संस्कृती विसरू नका, असे आवाहनही प्रा. भोसले यांनी केले.प्रा. कृष्णात पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रमेश छाबडा यांनी दीपप्रज्वलन केले. धन्वंतरी पूजन वसंतराव मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘सत्संग’चे प्रमुख श्रीकांत पाटील, माजी सरपंच वर्षा पाटील, महाराष्ट्र बँकेचे शाखाधिकारी साबळे, आर. एस. पाटील, माजी उपसरपंच रामचंद्र पाटील, पंढरीनाथ पाटील, सरपंच तानाजी पाटील (बस्तवडे), आदी उपस्थित होते. सुनील पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)...तर धाबा संस्कृतीला अटकावमहिलांनी आपल्या घरात रुचिदार आणि नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थ करण्याची पाककला आत्मसात करावी. यामुळे आजच्या तरुणाईमधील वाढती धाबा संस्कृती निश्चितच कमी होईल, असा विश्वासही प्रा. भोसले यांनी व्यक्त केला.