शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
4
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
5
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
6
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
7
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
8
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
9
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
10
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
11
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
12
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
13
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
14
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
15
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
16
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
17
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
18
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
19
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
20
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  

(सीडीसाठीचा नियोजित विषय) रत्नागिरी ते कोल्हापूर महामार्गाचे भूसंपादन दोन महिन्यांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:04 IST

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रमार्गे कोकणला विदर्भ जोडणाऱ्या नागपूर ते रत्नागिरी या नव्या महामार्गांतर्गत रत्नागिरी ते कोल्हापूर या १३४ ...

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रमार्गे कोकणला विदर्भ जोडणाऱ्या नागपूर ते रत्नागिरी या नव्या महामार्गांतर्गत रत्नागिरी ते कोल्हापूर या १३४ किलोमीटरच्या मार्गाचे भूसंपादन येत्या दोन महिन्यांत सुरू होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जानेवारीला गॅझेट प्रसिद्धीस देऊन २५ जानेवारीपर्यंत हरकतीसाठी मुदत दिली आहे. त्यामुळे गेली १२ वर्षे रखडलेल्या या रस्ते प्रकल्पाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

नागपूर ते रत्नागिरी असा ५४८ किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग व्हावा अशी मागणी २००९ पासून होत आहे; पण मार्च २०१३ मध्ये त्याची अधिसूचना जारी झाली आणि खऱ्या अर्थाने राज्यमार्गाचे रूपांतर चौपदी महामार्गात करण्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले. तुळजापूर, लातूर, अहमदपूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, बुटीबोरी एमआयडीसी नागपूर असा पहिला टप्पा; तर सोलापूर, सांगोला, कोल्हापूर, टिंकपाली, रत्नागिरी असा दुसरा टप्पा निश्चित करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने २०१५ मध्ये यासाठी १५०० कोटींच्या निधीचीही तरतूद झाली. त्यानुसार पहिल्या टप्प्याचे काम बऱ्यापैकी सुरू झाले आहे. दुसऱ्या टप्प्याचेही काम मिरजपर्यंत सुरू आहे. सांगली ते कोल्हापूर हा मार्ग सुप्रीम या खासगी कंपनीकडून तयार करून घेतला आहे. पण कोल्हापूर हद्दीतील चोकाक ते रत्नागिरी हे काम अजून भूसंपादनातच अडकले आहे. यापूर्वी दोन वेळा भूसंपादनास सुरुवात झाली, पण कंपनीकडून योग्य मोबदला दिला जात नसल्याने शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी भूसंपादनास विरोध केला. आता पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गॅझेट प्रसिद्धीस देऊन भूसंपादनास काही हरकत असल्यास कळवावे, अन्यथा काम सुरू केले जाईल असे कळवले आहे. त्यामुळे दीड वर्ष विस्मरणात गेलेला हा रस्ते प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे.

चौकट ०१

या गावातून जाणार महामार्ग

कोल्हापुरातून रत्नागिरीला जाणारा मार्ग शहरातून प्रस्तावित होता; पण शहरात रस्ता चौपदरीकरणाला मर्यादा असल्याने चोकाक येथून ते शिये, केर्लेमार्गे वाघबीळ, पन्हाळा, बांबवडे, मलकापूर, आंबा, साखरपा, रत्नागिरी असा मार्ग निश्चित केला. हा १३४ किलोमीटरचा मार्ग आहे.

चौकट ०२

म्हणून होतोय विरोध

हातकणंगले, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी या चार तालुक्यांतून नवीन महामार्ग जाणार आहे. या मार्गातर्गत येणाऱ्या जमिनी या पिकाऊ असल्याने त्याचा मोबदला योग्य मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. हातकणंगले व करवीरमधील शेतजमीन व शाहूवाडीतील शेतजमीन यांच्या दरात मोठ्या प्रमाणावर फरक आहे. प्राधिकरणाकडून वेगवेगळा दर आकारण्याचे धोरण ठेवल्यानेच आतापर्यंत भूसंपादनाला विरोध झाला आहे.

प्रतिक्रीया

रत्नागिरी ते कोल्हापूर या चारपदरी महामार्गासाठी पुन्हा एकदा भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश आल्याने कार्यवाही सुरू केली आहे. दिलेल्या वेळेत हरकती देऊन सहकार्य केल्यास या रत्याचे काम सुरू होईल.

व्ही. एन. पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण