शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

विधानसभेला चित्र वेगळे असेल :रोहित पवार यांचे मत : मोदींकडे पाहून झाले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 13:09 IST

लोकसभा निवडणुकीत लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मतदान केले आहे. तिथे पक्षीय विचार झाला नाही. तसे विधानसभेला होणार नसल्याने भाजप-शिवसेनेला त्या निवडणुकीत एवढे यश नक्की मिळणार नाही, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

ठळक मुद्देविधानसभेला चित्र वेगळे असेल :रोहित पवार यांचे मत मोदींकडे पाहून झाले मतदान

कोल्हापूर :  लोकसभा निवडणुकीत लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मतदान केले आहे. तिथे पक्षीय विचार झाला नाही. तसे विधानसभेला होणार नसल्याने भाजप-शिवसेनेला त्या निवडणुकीत एवढे यश नक्की मिळणार नाही, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ते म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत लोकांनी फक्त मोदी यांच्याकडे पाहून मतदान केले त्यामुळे भाजपला एवढे यश मिळाले. त्यामध्ये लोकांचे प्रश्न बाजूला पडले. प्रत्येक वेळी तसे घडणार नाही. विधानसभेला त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाही. मला प्रत्येक ठिकाणी ‘काय ठरलंय’ असे लोक विचारतात.

तूर्त माझे एवढंच ठरलंय की, पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायची. पक्षाने विधानसभा निवडणूक लढवावी असे सांगितले तर त्यासाठीही माझी तयारी आहे. संघटनेत काम करून आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले तर त्यालाही माझी हरकत नाही.’ 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर