शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

फलटणला पाच निंबाळकर रिंगणात

By admin | Updated: February 6, 2017 23:21 IST

अर्ज भरण्यासाठी झुंबड : शेवटच्या दिवशी गटासाठी ६७ तर गणासाठी १०५ अर्ज दाखल

फलटण : तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी ६७ तर पंचायत समितीसाठी १०५ अर्ज दाखल झाले आहेत. यात निंबाळकर घराण्याचे तब्बल पाच उमेदवार आहेत. एकूण जिल्हा परिषदेच्या ७ जागांसाठी ९४ तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी १५१ अर्ज दाखल झाले असून, अनेक दिग्गजांनी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक सर्वांच्या प्रतिष्ठेची व चुरशीची होणार आहे.फलटण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी तहसील कार्यालय परिसराला अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले होते. विविध पक्ष व त्यांच्या काही इच्छुक उमेदवारांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याच्या अखरेच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज येण्याची शक्यता गृहीत धरून शासकीय यंत्रणेने योग्य नियोजन व जादा कर्मचारी नेमल्याने कोणताही गोंधळ न उडता शांततेत सर्वांना अर्ज भरता आले.तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसने सोमवारी अखेरच्या क्षणी आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना तरडगाव जिल्हा परिषद गटातून शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर यांना साखरवाडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली आहे. यावेळेस दोघांनी एकमेकांच्या मतदार संघाची आरक्षणामुळे अदलाबदल केली आहे.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्या पत्नी भावना माणिकराव सोनवलकर यांना कोळकी जिल्हा परिषद गटातून विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सारिका अनपट यांचे पती दत्तात्रय अनपट यांना हिंगणगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या उषादेवी गावडे यांना गुणवरे जिल्हा परिषद गटातून पंचायत समितीच्या माजी उपसभापती कांचनमाला निंबाळकर यांनी विडणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने विद्यमान कोणत्याही पंचायत समिती सदस्याला पुन्हा पंचायत समितीसाठी संधी दिलेली नाही. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांचे सुपुत्र विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर यांना राजकारणात उतरवित त्यांना वाठार निंबाळकर गणातून उमेदवारी दिली आहे.राष्ट्रीय काँग्रेसने जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी पूर्णपणे नवीन चेहरे दिले असून, विद्यमान पंचायत समिती सदस्या अ‍ॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर यांना गिरवी जिल्हा परिषद गटातून तर सदस्य धनंजय साळुंखे-पाटील यांना हिंगणगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली आहे. गिरवी पंचायत समिती गणातून स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांच्या पत्नी जयश्री आगवणे यांना काँग्रेसने उमेदवारी देत राजकारणात उतरविले आहे.भाजपानेही नवीन चेहरे दिले असून, माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम यांचे सुपुत्र सह्याद्री कदम यांना गिरवी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देत राजकारणात उतरविले आहे. सह्याद्री कदम यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने जिल्हा परिषदेसाठी ४ तर पंचायत समितीसाठी ८ उमेदवार रिंगणात उतरविले असून, घटक पक्षातील रासप व शिवसेनेसाठी इतर जागा सोडल्याचे सह्याद्री कदम यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना व रासपनेही काही जागी उमेदवार उभे केले आहेत. अपक्षांनीही मोठ्या प्रमाणात अर्ज भरले असून, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील बऱ्याच इच्छुकांचा समावेश आहे. दाखल अर्जाची दि. ७ रोजी छाननी होणार आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रीय काँग्रेसनेही नव्या नेतृत्वाला उतरविलेराष्ट्रीय काँग्रेसनेही पूर्णपणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नवीन चेहरे दिले असून, कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पत्नी पंचायत समिती सदस्या अ‍ॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर यांना गिरवी जिल्हा परिषद गट तर ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांचे पुत्र धनंजय साळुंखे-पाटील यांना हिंगणगाव जिल्हा परिषद गटातून तर स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांच्या पत्नी जयश्री आगवणे यांना गिरवी पंचायत समिती गणातून उमेदवारी दिली आहे. अर्ज भरताना यावेळी प्रल्हादराव साळुंखे-पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, नगरसेवक समशेरसिंह नाईक-निंबाळकर, दिगंबर आगवणे, महेंद्र सूर्यवंशी (बेडके) आदी उपस्थित होते. राष्ट्रीय काँग्रेसनेही नव्या नेतृत्वाला उतरविलेराष्ट्रीय काँग्रेसनेही पूर्णपणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नवीन चेहरे दिले असून, कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पत्नी पंचायत समिती सदस्या अ‍ॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर यांना गिरवी जिल्हा परिषद गट तर ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांचे पुत्र धनंजय साळुंखे-पाटील यांना हिंगणगाव जिल्हा परिषद गटातून तर स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांच्या पत्नी जयश्री आगवणे यांना गिरवी पंचायत समिती गणातून उमेदवारी दिली आहे. अर्ज भरताना यावेळी प्रल्हादराव साळुंखे-पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, नगरसेवक समशेरसिंह नाईक-निंबाळकर, दिगंबर आगवणे, महेंद्र सूर्यवंशी (बेडके) आदी उपस्थित होते.