शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

भावा, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला कसा काय लागला ब्रेक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 11:52 IST

निवडणुकीत इंधन दरवाढीचा फटका पक्षाला बसू नये यासाठीच हे दर स्थिर ठेवले असल्याचे जाणकारांचे म्हणणे

कोल्हापूर : नियंत्रण मुक्त असलेले पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या दोन महिन्यांपासून स्थिर आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत तरीसुद्धा दर स्थिर कसे राहिले रे भाऊ अशी विचारणा लोकांतून होत आहे. उत्तरप्रदेश, पंजाब, दिल्ली, गोवा, मणिपूर या राज्यांत विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. इंधन दरवाढीचा फटका तिथे पक्षाला बसू नये यासाठीच हे दर स्थिर ठेवले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

निवडणुका जाहीर केल्यानंतर ४ नोव्हेंबर २०२१ ला पेट्रोल दरात ५ रूपये ८२ , तर डिझेलमध्ये १२ रुपये २० पैशांनी कपात केली. निवडणुका ७ मार्चला संपणार आहेत. त्यानंतर असेच दर स्थिर ठेवावेत, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे. दर स्थिर राहण्यासाठी देशात कुठे ना कुठे कायम निवडणुका सुुरु राहिल्या तर बरे होईल, अशीही मिश्किल टिप्पण्णी सर्वसामान्य करत आहेत. केंद्र सरकार राजकीय लाभासाठी भडकलेले दर स्थिर ठेवू शकते याचेच प्रत्यंतर यातून येत आहे.

नोव्हेंबरमधील पेट्रोल-डिझेलचे दर

दिनांक                      पेट्रोल           डिझेल

१ नोव्हेंबर २०२१       ११५-२५        १०४-८०

२ नाेव्हेंबर २०२१       ११५-६०        १०४-८०

३ नोव्हेंबर २०२१       ११५-६०        १०४-८०

करकपातीनंतरचे दर

दिनांक                     पेट्रोल             डिझेल

४ नोव्हेंबर २०२१      १०९.७८          ९२.६०

४ डिसेंबर २०२१       १०९.९०          ९४.१४

४ जानेवारी २०२२     ११०-०९          ९५-६०

४ फेब्रुवारी २०२२      ११०-०९          ९५.६५

महागाई कमी होण्याची अपेक्षा फोल

सध्याचे पेट्रोल, डिझेलचे दर उच्च पातळीलाच आहेत. त्यामुळे पाच रुपये आणि दहा रूपये प्रतिलिटरमध्ये कपात करून सर्वसामान्यांना काहीच फरक पडत नाही. मोठ्या प्रमाणात दर कपात झाल्यास महागाई कमी होईल. अन्यथा पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर महागाईचा डोंब आणखी उसळण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

दर असेच राहावेत

जागतिक तेल बाजारात कच्चे तेल (क्रुड) चे गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहेत. तरीसुद्धा तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. यापूर्वी कच्चे तेलात वाढ झाली की तत्काळ दरवाढ होत असे. सध्या मात्र, दर ‘जैसे थे’ ठेवले आहेत असेच दर निवडणुकांनंतरही राहावेत अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर