शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

राज्यातील लोकप्रतिनिधी कमी पडतात

By admin | Updated: April 2, 2016 00:25 IST

ज्ञानेश्वर मुळे यांची खंत : दोनदिवसीय पासपोर्ट शिबिराचे उद्घाटन

कोल्हापूर : दिल्लीतून इतर राज्यांतील लोकप्रतिनिधी आपल्या राजकीय बळाचा वापर करून जनतेची कामे करून घेतात; परंतु महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी त्या तुलनेत कमी पडतात, अशी खंत कॉन्सुलर पासपोर्ट, व्हिसा विभागाचे अतिरिक्त सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली. यावर दिल्ली येथे मराठी नेते व लोकप्रतिनिधींचे लॉबिंग कमी पडते, यात राज्य शासनाने पुढाकार घेऊन सर्वांमध्ये समन्वय ठेवावा, अशी प्रतिक्रिया खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात केंद्र सरकारच्या विदेश मंत्रालयातर्फे आयोजित दोनदिवसीय पासपोर्ट शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार धनंजय महाडिक, खासदार राजू शेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, पुणे विभागीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. चैतन्या, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे उपस्थित होते. पहिल्या दिवशी १५० जणांच्या पासपोर्टचे काम करण्याची प्रक्रिया झाली.मुळे म्हणाले, पासपोर्ट हा व्यक्तीच्या आर्थिक सशक्तीकरणाचे माध्यम बनला आहे. जग समजून घेणे, व्यवसाय, शिक्षण यासाठी देश-विदेशातील प्रवास महत्त्वाचा आहे. त्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. लोकांना एकमेकांशी जोडणे हे आपले ध्येय आहे. पासपोर्ट हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. कोणत्याही सक्षम कारणाशिवाय पासपोर्ट नाकारता येत नाही. दरवर्र्षी परदेशातील ७० लाख लोक विविध कारणांनी भारतात येतात; तर भारतातील सुमारे १ कोटी ५० लाख लोक परदेशी जातात. त्यांच्याशी संबंधित पासपोर्ट, व्हिसाविषयक कामांमध्ये हे कार्यालय जनताभिमुख झाले आहे. भारत सरकार पासपोर्ट सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशात उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे पासपोर्ट वितरणामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. ते पहिल्या क्रमांकावर यावे, अशी अपेक्षा आहे.खा. शेट्टी म्हणाले, कोल्हापूरला पासपोर्ट कार्यालय व्हावे. ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत, त्यांच्या गुन्ह्यांचे स्वरूप पाहून पासपोर्ट दिले जावेत. यावेळी खा. महाडिक व अतुल गोतसुर्वे यांचे भाषण झाले. पासपोर्ट कार्यालयाचे प्रोटोकॉल इन्चार्ज जतिन आर. पोटे यांनी स्वागत केले. गोतसुर्वे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)मराठी लोकप्रतिनिधींच्या लॉबिंगची गरजदिल्लीत महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींचे बळ कमी पडते, या ज्ञानेश्वर मुळे यांच्या वक्तव्यावर खासदार शेट्टी म्हणाले, दिल्लीत मराठी नेते, अधिकाऱ्यांचे लॉबिंग कमी पडते, हे मुळे यांना सांगावयाचे होते. यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन मराठी नेते व अधिकाऱ्यांचा समन्वय ठेवून महाराष्ट्र सदनाचा विकासाभिमुख कामांसाठी उपयोग करावा.