शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

‘कागल’ला भाकरी परतण्याचा जनतेचाच निर्णय --समरजित घाटगे --रोखठोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:39 AM

या निवडणुकीत जनता पाठीशी असल्याचे सांगून समरजित म्हणाले, ‘गोकुळचे संचालक रणजित पाटील, डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी मला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याशिवाय तालुक्यातील सर्व गट माझ्या विरुद्ध आहेत. फार नेतेमंडळी माझ्यासोबत नाहीत.

ठळक मुद्देसमरजित घाटगे : माझा विजय निश्चित, लढत दुरंगीच, मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचा मला आशीर्वाद !

विश्वास पाटील ।कोल्हापूर : ‘पारंपरिक राजकारणाला कागलची जनता कंटाळली आहे. विद्यमान आमदार ही माझी शेवटची निवडणूक आहे असे सांगत आहेत, म्हणजे पुढची पाच वर्षे ते काहीच काम करणार नाहीत हे स्पष्टच आहे. मी जनतेसमोर ठेवलेला विकासाचा अजेंडा मतदारसंघाच्या सर्वांगसुंदर विकासाचे बोलके उदाहरण आहे. या निवडणुकीत माझ्याविरोधात चेहरे वेगवेगळे असले तरी त्यांची प्रवृत्ती एकच आहे. त्यातही त्यांच्यात नुरा कुस्ती सुरू असल्याचे जनतेनेही ओळखले आहे. त्यामुळे कुणाला मते दिल्यास ती कुजणार हे मतदारांनाही चांगले माहीत आहे. म्हणून लोक माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वास समरजित घाटगे यांनी व्यक्त केला.ते म्हणाले, गेली तीन वर्षे मी भाजपचे काम केले. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी या कामात मला प्रचंड पाठबळ दिले. त्यामुळेच अनेक प्रश्न मी सोडवू शकलो. जागावाटपामध्ये भाजपची उमेदवारी मिळाली नाही. चांगले काम करूनही माझ्यावर अन्याय झाला, अशी भावना सामान्य जनतेत आहे. त्यामुळेच जनतेच्या एबी फॉर्मवर मी ही निवडणूक लढवीत असून, गावोगावी मिळत असलेला पाठिंबा पाहता, मी ही लढत शंभर टक्के जिंकणार याचा विश्वास आहे.’

या निवडणुकीत जनता पाठीशी असल्याचे सांगून समरजित म्हणाले, ‘गोकुळचे संचालक रणजित पाटील, डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी मला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याशिवाय तालुक्यातील सर्व गट माझ्या विरुद्ध आहेत. फार नेतेमंडळी माझ्यासोबत नाहीत. ज्यांनी विक्रमसिंह घाटगे यांच्यामुळे किंवा राजे गटामुळे अनेक पदे भोगली, तीच सर्व मंडळी विरोधात आहेत. त्यातून शाहू घराण्याला एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी राजकारणात येऊच नये, आलो तर टिकूच नये, अन्यथा आपली दुकानदारी बंद होऊ शकते, या पछाडलेल्या मानसिकतेतून मला विरोध होत आहे; परंतु त्याला मी घाबरत नाही. या सत्याच्या लढाईत जनता हाच सर्वांत मोठा नेता माझ्यामागे आहे. त्याच बळावर मी जिंकण्याचा दावा केला आहे.’

सत्तेतून पैसा व पैशातून पुन्हा सत्ता हे चक्र या निवडणुकीत रोखण्याचा निर्धार जनतेनेच केला आहे. विकासाचा स्वच्छ दृष्टिकोन व श्वेतपत्रिका घेऊनच मी लोकांसमोर जात आहे. गटातटाच्या राजकारणात अडकलेल्या जनतेला मतदारसंघाच्या शाश्वत विकासाचे स्वप्न मी दाखविले आहे. कागलला ‘राजकारणाचे विद्यापीठ’ असे कुचेष्टेने म्हटले जाते; परंतु कागलसह गडहिंग्लज व उत्तूरचा परिसर विकासाचे मॉडेल व्हावे असेच माझे प्रयत्न आहेत. नुसती टीकाटिप्पणी, राजकीय राळ उडवण्यात मला रस नाही. कुणी काय केले हे सांगण्यापेक्षा मी काय करणार आहे, हे सांगण्यावर माझा भर आहे, असे समरजित घाटगे यांनी सांगितले.

कागल विधानसभा मतदारसंघात लढत दुरंगीच होत असून, या मतदारसंघातील कागलसह गडहिंग्लज, उत्तूर परिसरातील जनतेने या वेळेला भाकरी परतण्याचाच निर्णय घेतला आहे. त्यामुळे माझा विजय नक्की झाला असल्याचा विश्वास अपक्ष उमेदवार समरजित घाटगे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा माझ्या उमेदवारीस आशीर्वाद आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राजकारणातील पुढील वाटचाल करणार असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत आवर्जून सांगितले.

विकास संकल्प

  • आरोग्य : मतदारसंघात डायलेसिस सेंटर सुरू करणार. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू व्हावे यासाठी प्रयत्न करणार. कागलचे आरोग्य केंद्र स्टाफ, औषधे, उपचार अशा सर्वच स्तरांवर सक्षम करण्याचा प्रयत्न.
  • शिक्षण : लोकसेवा परीक्षेचे कोचिंग सेंटर तिन्ही नगरपालिकांच्या शहरामध्ये सुरू करणार. कागल हे एज्युकेशन हब व्हावे, असा प्रयत्न आहे.
  • जलसमृद्धी : आरळगुंडी येथे आणखी तीन बंधारे बांधणार. त्यामुळे कितीही कमी पाऊस पडला तरी चिकोत्रा धरण भरू शकेल.
  • नोकरी : गडहिंग्लज औद्योगिक वसाहत विकसित करणार. राजे बँक व अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत कर्जपुरवठा करून व्यवसाय सुरू करण्यास बळ देणार.
  • महिलांचे सबलीकरण : महिला बझार सुरू करणार. बचत गटाच्या महिलांना आॅनलाईन पोर्टलद्वारे आॅर्डर्स मिळवून देणार.

 

जेव्हा माणसाला पराभव दिसू लागतो तेव्हाच त्याच्याकडून सर्व मार्ग संपले म्हणून दहशत दाखविली जाते. आमच्या आईसाहेबांना फोनवरून धमकी देण्याचा प्रकारही त्यातलाच आहे. त्यांना जनताच २१ तारखेला मतदान यंत्रातून उत्तर देईल.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण