शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘कागल’ला भाकरी परतण्याचा जनतेचाच निर्णय --समरजित घाटगे --रोखठोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:40 IST

या निवडणुकीत जनता पाठीशी असल्याचे सांगून समरजित म्हणाले, ‘गोकुळचे संचालक रणजित पाटील, डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी मला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याशिवाय तालुक्यातील सर्व गट माझ्या विरुद्ध आहेत. फार नेतेमंडळी माझ्यासोबत नाहीत.

ठळक मुद्देसमरजित घाटगे : माझा विजय निश्चित, लढत दुरंगीच, मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचा मला आशीर्वाद !

विश्वास पाटील ।कोल्हापूर : ‘पारंपरिक राजकारणाला कागलची जनता कंटाळली आहे. विद्यमान आमदार ही माझी शेवटची निवडणूक आहे असे सांगत आहेत, म्हणजे पुढची पाच वर्षे ते काहीच काम करणार नाहीत हे स्पष्टच आहे. मी जनतेसमोर ठेवलेला विकासाचा अजेंडा मतदारसंघाच्या सर्वांगसुंदर विकासाचे बोलके उदाहरण आहे. या निवडणुकीत माझ्याविरोधात चेहरे वेगवेगळे असले तरी त्यांची प्रवृत्ती एकच आहे. त्यातही त्यांच्यात नुरा कुस्ती सुरू असल्याचे जनतेनेही ओळखले आहे. त्यामुळे कुणाला मते दिल्यास ती कुजणार हे मतदारांनाही चांगले माहीत आहे. म्हणून लोक माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वास समरजित घाटगे यांनी व्यक्त केला.ते म्हणाले, गेली तीन वर्षे मी भाजपचे काम केले. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी या कामात मला प्रचंड पाठबळ दिले. त्यामुळेच अनेक प्रश्न मी सोडवू शकलो. जागावाटपामध्ये भाजपची उमेदवारी मिळाली नाही. चांगले काम करूनही माझ्यावर अन्याय झाला, अशी भावना सामान्य जनतेत आहे. त्यामुळेच जनतेच्या एबी फॉर्मवर मी ही निवडणूक लढवीत असून, गावोगावी मिळत असलेला पाठिंबा पाहता, मी ही लढत शंभर टक्के जिंकणार याचा विश्वास आहे.’

या निवडणुकीत जनता पाठीशी असल्याचे सांगून समरजित म्हणाले, ‘गोकुळचे संचालक रणजित पाटील, डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी मला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याशिवाय तालुक्यातील सर्व गट माझ्या विरुद्ध आहेत. फार नेतेमंडळी माझ्यासोबत नाहीत. ज्यांनी विक्रमसिंह घाटगे यांच्यामुळे किंवा राजे गटामुळे अनेक पदे भोगली, तीच सर्व मंडळी विरोधात आहेत. त्यातून शाहू घराण्याला एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी राजकारणात येऊच नये, आलो तर टिकूच नये, अन्यथा आपली दुकानदारी बंद होऊ शकते, या पछाडलेल्या मानसिकतेतून मला विरोध होत आहे; परंतु त्याला मी घाबरत नाही. या सत्याच्या लढाईत जनता हाच सर्वांत मोठा नेता माझ्यामागे आहे. त्याच बळावर मी जिंकण्याचा दावा केला आहे.’

सत्तेतून पैसा व पैशातून पुन्हा सत्ता हे चक्र या निवडणुकीत रोखण्याचा निर्धार जनतेनेच केला आहे. विकासाचा स्वच्छ दृष्टिकोन व श्वेतपत्रिका घेऊनच मी लोकांसमोर जात आहे. गटातटाच्या राजकारणात अडकलेल्या जनतेला मतदारसंघाच्या शाश्वत विकासाचे स्वप्न मी दाखविले आहे. कागलला ‘राजकारणाचे विद्यापीठ’ असे कुचेष्टेने म्हटले जाते; परंतु कागलसह गडहिंग्लज व उत्तूरचा परिसर विकासाचे मॉडेल व्हावे असेच माझे प्रयत्न आहेत. नुसती टीकाटिप्पणी, राजकीय राळ उडवण्यात मला रस नाही. कुणी काय केले हे सांगण्यापेक्षा मी काय करणार आहे, हे सांगण्यावर माझा भर आहे, असे समरजित घाटगे यांनी सांगितले.

कागल विधानसभा मतदारसंघात लढत दुरंगीच होत असून, या मतदारसंघातील कागलसह गडहिंग्लज, उत्तूर परिसरातील जनतेने या वेळेला भाकरी परतण्याचाच निर्णय घेतला आहे. त्यामुळे माझा विजय नक्की झाला असल्याचा विश्वास अपक्ष उमेदवार समरजित घाटगे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा माझ्या उमेदवारीस आशीर्वाद आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राजकारणातील पुढील वाटचाल करणार असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत आवर्जून सांगितले.

विकास संकल्प

  • आरोग्य : मतदारसंघात डायलेसिस सेंटर सुरू करणार. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू व्हावे यासाठी प्रयत्न करणार. कागलचे आरोग्य केंद्र स्टाफ, औषधे, उपचार अशा सर्वच स्तरांवर सक्षम करण्याचा प्रयत्न.
  • शिक्षण : लोकसेवा परीक्षेचे कोचिंग सेंटर तिन्ही नगरपालिकांच्या शहरामध्ये सुरू करणार. कागल हे एज्युकेशन हब व्हावे, असा प्रयत्न आहे.
  • जलसमृद्धी : आरळगुंडी येथे आणखी तीन बंधारे बांधणार. त्यामुळे कितीही कमी पाऊस पडला तरी चिकोत्रा धरण भरू शकेल.
  • नोकरी : गडहिंग्लज औद्योगिक वसाहत विकसित करणार. राजे बँक व अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत कर्जपुरवठा करून व्यवसाय सुरू करण्यास बळ देणार.
  • महिलांचे सबलीकरण : महिला बझार सुरू करणार. बचत गटाच्या महिलांना आॅनलाईन पोर्टलद्वारे आॅर्डर्स मिळवून देणार.

 

जेव्हा माणसाला पराभव दिसू लागतो तेव्हाच त्याच्याकडून सर्व मार्ग संपले म्हणून दहशत दाखविली जाते. आमच्या आईसाहेबांना फोनवरून धमकी देण्याचा प्रकारही त्यातलाच आहे. त्यांना जनताच २१ तारखेला मतदान यंत्रातून उत्तर देईल.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण