शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडे बोट कशाला...घरला पाठवा ठेकेदाराला; राष्ट्रीय महामार्ग लोकांचा जीव घेण्यासाठी आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 18:00 IST

मणक्यांचा खुळखुळा, तरी यंत्रणा ढिम्म

शरद यादवकोल्हापूर : राज्य रस्ते विकास महामंडळाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सहापदरीचे काम वर्ग झाल्यानंतर कामाला गती येण्याऐवजी रेंगाळलेच आहे. रोज तरणीताठी मुले धडकून जीव गमावत आहेत. याबाबत नेत्यांना विचारले की हे काम केंद्राच्या अखत्यारीत येते एवढे एकच कॅसेट लावले जाते. केंद्र काय मंगळ ग्रहावर असल्याने संपर्क होत नाही का, इथं रोज माणसं मरायला लागल्यात अन् ठेकेदार बदलता येत नाही म्हणून जर मणके मोडण्याचा खेळ सुरू असेल तर या खेळाच्या गदीत पाणी ओतण्यासाठी कोल्हापूरकर सक्षम असल्याचा सूर व्यक्त होत आहे.कागलच्या थोडे पुढे गेले की कर्नाटक सुरू होते. तेथे सहापदरीचे काम वेगवान असल्याचे पाहायला मिळते. अनेक ठिकाणी काम पूर्णही झाले असल्याचे सांगण्यात येते. मग कोल्हापूरच्या वाटणीलाच ही रखडपट्टी का, याचा जाब विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. या कामावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नियत्रंण आहे. याचे कार्यालयही उजळाईवाडी येथे आहे. ३ वर्षे झाली काम जराही पुढे सरकत नसेल व हे विचारण्यासाठी संबंधित अधिकारी फोनही घेण्याची तसदी घेत नसतील तर केंद्राने हा विभाग केवळ पगार घेण्यासाठी सुरू केला आहे का, असा सवाल केला जात आहे.

पक्षप्रवेश, राजकीय जोडण्यात नेते मग्नजिल्ह्यात बडे नेते पक्षप्रवेश करून घेण्यात, पालिका व झेडपी निवडणुकीच्या जोडण्या करण्यात मग्न आहेत.पंरतू जिल्ह्यातील जनता जीवन मरणाचा संघर्ष करत असल्याचे त्यांना काहीच कसे वाटत नाही,याचेच आर्श्चय वाटते. अजून वर्षभराने होणाऱ्या एका निवडणुकीसाठी श्रावणबाळ गणित घालत आहेत. पण इकडे वृद्धांना हायवेवरून प्रवास केला की अंथरूण धरावे लागते, त्यांची यात्रा सुखकर कोण करणार, हा प्रश्न आहेच.

गडकरींचे काम प्रामाणिक, पण खालची यंत्रणा ढिसाळकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी अनेक वेळा आपल्या भाषणात रस्त्यांचे जाळे देशभर विणून आपल्या मंत्रालयाने कसा विकास केला हे सांगतात. त्यांचे अमोघ वकृत्व ऐकून भारतातील रस्ते आता सिंगापूरच्या तोडीचे होणार असल्याचा भास होताे. पण प्रत्यक्षात गाडी घेवून हायवेला लागले की चिखलगुठ्ठा स्पर्धेत भाग घेतल्यासारखी अवस्था वाहनचालकाची होत असल्याचा अनुभव आहे.

विरोधकांनी हायवे ठप्प करावाजिल्ह्यातील विरोधक हायवेच्या कामावर आंदोलन करताना दिसतात. परंतु तासभर आंदोलन करून हा प्रश्न सुटणार नाही. एक पूर्ण दिवस हायवेवर ठिय्या मारला तरच याची कळ मुंबईपर्यंत लागेल. राष्ट्रीय महामार्ग दोन तास बंद पडला तर मुख्यमंत्री दखल घेतात. एखादा दिवस वाहनचालकांना त्रास झाला तरी होऊ दे, पण केंद्राला दखल घ्यावी लागेल, असा चक्काजाम केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.

सर्किट बेंच कोल्हापुरात, टोल टोला देणे शक्यसर्किट बेंच आता कोल्हापुरात झाल्याने याचिका दाखल करण्यासाठी मुंबईला जाण्याची गरज नाही. नांगरल्यासारखा रस्ता असताना आम्ही टोल का द्यावा, यावर याचिका दाखल केली तर काम पूर्ण होईपर्यंत टोलमधून मुक्ती मिळणे सहज शक्य आहे. शहरातील टोल पंचगंगेत बुडवला, ऊस, दुधाचा दर आंदोलन करून पदरात पाडून घेतला, त्या कोल्हापूरकरांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सरळ करण्यास वेळ लागणार नाही. गरज आहे सर्वांनी रस्तावर उतरण्याची.

सहापदरी महामार्ग गेली ३ वर्षे सुरु असून ठिकठिकाणी रस्ता उकरून टाकला आहे. अद्याप २० टक्केसुद्धा काम पूर्ण झालेले नाही. ठेकेदाराला महामार्ग पूर्ण करण्यासाठी काही टाइमलाइन दिलेली आहे का नाही? जोपर्यंत महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहनधारकांनी टोल का भरावा? जोपर्यंत कागल ते किणी नाका काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफ करणे गरजेचे आहे. - अनिल य. जाधव, सचिव, ग्राहक संरक्षण 

मी रोज कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये नोकरीला जातो. या रस्त्याची अवस्था बघून पाणंदीसुद्धा कदाचित चांगल्या असतील असं आता वाटायला लागलं आहे. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आम्ही घरात मागे येईपर्यंत सर्वच काळजीत असतात. हे कोणत्याही लोकप्रतिनिधीला दिसत नाही का? लोकप्रतिनिधींच्या ५० लाखांपासून कोटीपर्यंतच्या गाड्या आहेत. त्यामुळे त्यांना याचा दणका बसत नाही. सर्वच लोकप्रतिनिधींना एकदा दुचाकीने कागल ते पेठ नाका प्रवास करायला लावले पाहिजे, तरच खरे दुखणे कळेल. - ऋषिकेश कमलाकर, भादोले

English
हिंदी सारांश
Web Title : Fix highway, not blame game; Kolhapur residents demand action now.

Web Summary : Kolhapur residents are frustrated with the delayed six-lane highway construction, leading to accidents. They question the authorities' inaction and demand accountability from the contractor, urging protests and toll waivers until completion.