शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

पवारसाहेब, राष्ट्रवादी-भाजपच्या ‘सेटिंग’मध्ये तुम्हीच लक्ष घाला : पतंगराव कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 20:51 IST

सांगली : ‘आता परिस्थिती गंभीर आहे, लोक बदलाची भाषा बोलायला लागलेत, राज्यात, देशात आपण एकत्र आले पाहिजे, असा सूर आहे.

ठळक मुद्देआघाडीचे नेतृत्व करण्याचे आवाहन‘खरं तर आता परिस्थिती गंभीर आहे, लोक बदलाची भाषा बोलायला लागलेत, मी मुख्यमंत्री फडणवीसांना म्हणालो, ‘तुमचं काय दुखणं आहे?

सांगली : ‘आता परिस्थिती गंभीर आहे, लोक बदलाची भाषा बोलायला लागलेत, राज्यात, देशात आपण एकत्र आले पाहिजे, असा सूर आहे. सांगलीत मात्र राष्ट्रवादी आणि भाजपचीच सेटिंग आहे. पवारसाहेब, यात तुम्ही स्वत: लक्ष घाला’, अशी टोलेबाजी काँग्रेसचे नेते आ. पतंगराव कदम यांनी शुक्रवारी दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर केली.

कवठेएकंद (ता. तासगाव) येथे सिद्धराज शेती पाणीपुरवठा संस्थेच्या रौप्यमहोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर पवार यांच्यासह भाजपचे खासदार संजय पाटील, राष्टÑवादीचे नेते आमदार जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील, शेकापचे आमदार जयंत पाटील व धैर्यशील पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, कुंडलच्या क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड उपस्थित होते. स्वत:च्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील भाजप आणि राष्ट्रवादीच्या ‘मिलीभगत’वर बोट ठेवत पतंगरावांनी राष्ट्रवादीचे नेते अरुण लाड यांना कोपरखळ्या हाणल्या.

पतंगरावांनी एकीकडे भाजपवर हल्ला चढवत दुसरीकडे राष्ट्रवादीला टोले दिले. क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी नुकतेच कृषी प्रदर्शन आणि स्वत:च्या वाढदिवस सोहळ्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन केले. शरद पवार यांच्याहस्ते गुरुवारी त्यांचा गौरव झाला. जिल्'ातील सर्वपक्षीय नेत्यांना त्यांनी निमंत्रण दिले होते. मात्र पतंगरावांना दिले नव्हते. ही खंत व्यक्त करत पतंगराव म्हणाले की, आरं, घरचं सोडून पळत्याच्या मागे का लागताय? जिल्'ाच्या राजकारणातल्या वावटळात ३३ वर्षे काम केलंय. आमच्यात भाजप आणि राष्टÑवादी एकत्र येत असतात.

सगळे मिळून माझ्याविरोधात बैठका घेतात. भविष्यात मात्र घोटाळा करून चालणार नाही. लोकांची अपेक्षा आहे, पवारांनी नेतृत्व करावं. आपण सारे एक विचाराचे, एका दिशेचे आहोत. या कार्यक्रमाला मला बोलवलं, मी आलो. मी कुठं आड येत नाही आणि बोलावल्याशिवाय कुठं जात नाही. मला अरुणने बोलावलं नाही. पंख लहान होते, त्यावेळेला मला जी. डी. बापू लाड यांनीच मदत केली. १९८५ ला बापूंनी पाठिंबा दिल्यामुळेच मी आमदार झालो. कुंडलमध्ये माझं शिक्षण झालं. बालपण गेलं. तिथली माणसं माझ्या हक्काची आहेत. मी लोकांच्या जीवावर आहे, आता पंख मोठे झालेत. माझं पंख छाटायचा प्रयत्न करू नका, तुम्हाला जमणार नाही.ते म्हणाले की, राज्यातील भाजप सरकारला पश्चिम महाराष्ट्राचे वावडे आहे. मी मुख्यमंत्री फडणवीसांना म्हणालो, ‘तुमचं काय दुखणं आहे? आमची फाईल आली की फुली का मारता?’‘खरं तर आता परिस्थिती गंभीर आहे, लोक बदलाची भाषा बोलायला लागलेत, राज्यात, देशात एकत्र आले पाहिजे, असा सूर आहे. आमच्या जिल्'ात मात्र राष्ट्रवादी आणि भाजपचीच सेटिंग आहे. पवारसाहेब, यात तुम्ही स्वत: लक्ष घाला,’ असा टोला त्यांनी मारला. त्यावर खासदार संजयकाकांचा त्रास आहे का? असे विचारल्यावर, ‘'ो नुसता घुलवतो. माणसं गोळा करून जाहिरातबाजी करतो. त्याचा मला त्रास नाही. त्याचं माझ्याबाबतीत काही वाकडं नसतं. आम्ही यापूर्वी एकत्र काम केलंय,’ असे त्यांनी सांगितले.पतंगरावांनी शेकापचे आमदार जयंत पाटील ‘सर्वांत श्रीमंत शेकापवाला’ असल्याचे सांगून त्यांनाही चिमटा काढला.

 

टॅग्स :PoliticsराजकारणIndiaभारत