शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

पवारसाहेब, राष्ट्रवादी-भाजपच्या ‘सेटिंग’मध्ये तुम्हीच लक्ष घाला : पतंगराव कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 20:51 IST

सांगली : ‘आता परिस्थिती गंभीर आहे, लोक बदलाची भाषा बोलायला लागलेत, राज्यात, देशात आपण एकत्र आले पाहिजे, असा सूर आहे.

ठळक मुद्देआघाडीचे नेतृत्व करण्याचे आवाहन‘खरं तर आता परिस्थिती गंभीर आहे, लोक बदलाची भाषा बोलायला लागलेत, मी मुख्यमंत्री फडणवीसांना म्हणालो, ‘तुमचं काय दुखणं आहे?

सांगली : ‘आता परिस्थिती गंभीर आहे, लोक बदलाची भाषा बोलायला लागलेत, राज्यात, देशात आपण एकत्र आले पाहिजे, असा सूर आहे. सांगलीत मात्र राष्ट्रवादी आणि भाजपचीच सेटिंग आहे. पवारसाहेब, यात तुम्ही स्वत: लक्ष घाला’, अशी टोलेबाजी काँग्रेसचे नेते आ. पतंगराव कदम यांनी शुक्रवारी दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर केली.

कवठेएकंद (ता. तासगाव) येथे सिद्धराज शेती पाणीपुरवठा संस्थेच्या रौप्यमहोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर पवार यांच्यासह भाजपचे खासदार संजय पाटील, राष्टÑवादीचे नेते आमदार जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील, शेकापचे आमदार जयंत पाटील व धैर्यशील पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, कुंडलच्या क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड उपस्थित होते. स्वत:च्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील भाजप आणि राष्ट्रवादीच्या ‘मिलीभगत’वर बोट ठेवत पतंगरावांनी राष्ट्रवादीचे नेते अरुण लाड यांना कोपरखळ्या हाणल्या.

पतंगरावांनी एकीकडे भाजपवर हल्ला चढवत दुसरीकडे राष्ट्रवादीला टोले दिले. क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी नुकतेच कृषी प्रदर्शन आणि स्वत:च्या वाढदिवस सोहळ्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन केले. शरद पवार यांच्याहस्ते गुरुवारी त्यांचा गौरव झाला. जिल्'ातील सर्वपक्षीय नेत्यांना त्यांनी निमंत्रण दिले होते. मात्र पतंगरावांना दिले नव्हते. ही खंत व्यक्त करत पतंगराव म्हणाले की, आरं, घरचं सोडून पळत्याच्या मागे का लागताय? जिल्'ाच्या राजकारणातल्या वावटळात ३३ वर्षे काम केलंय. आमच्यात भाजप आणि राष्टÑवादी एकत्र येत असतात.

सगळे मिळून माझ्याविरोधात बैठका घेतात. भविष्यात मात्र घोटाळा करून चालणार नाही. लोकांची अपेक्षा आहे, पवारांनी नेतृत्व करावं. आपण सारे एक विचाराचे, एका दिशेचे आहोत. या कार्यक्रमाला मला बोलवलं, मी आलो. मी कुठं आड येत नाही आणि बोलावल्याशिवाय कुठं जात नाही. मला अरुणने बोलावलं नाही. पंख लहान होते, त्यावेळेला मला जी. डी. बापू लाड यांनीच मदत केली. १९८५ ला बापूंनी पाठिंबा दिल्यामुळेच मी आमदार झालो. कुंडलमध्ये माझं शिक्षण झालं. बालपण गेलं. तिथली माणसं माझ्या हक्काची आहेत. मी लोकांच्या जीवावर आहे, आता पंख मोठे झालेत. माझं पंख छाटायचा प्रयत्न करू नका, तुम्हाला जमणार नाही.ते म्हणाले की, राज्यातील भाजप सरकारला पश्चिम महाराष्ट्राचे वावडे आहे. मी मुख्यमंत्री फडणवीसांना म्हणालो, ‘तुमचं काय दुखणं आहे? आमची फाईल आली की फुली का मारता?’‘खरं तर आता परिस्थिती गंभीर आहे, लोक बदलाची भाषा बोलायला लागलेत, राज्यात, देशात एकत्र आले पाहिजे, असा सूर आहे. आमच्या जिल्'ात मात्र राष्ट्रवादी आणि भाजपचीच सेटिंग आहे. पवारसाहेब, यात तुम्ही स्वत: लक्ष घाला,’ असा टोला त्यांनी मारला. त्यावर खासदार संजयकाकांचा त्रास आहे का? असे विचारल्यावर, ‘'ो नुसता घुलवतो. माणसं गोळा करून जाहिरातबाजी करतो. त्याचा मला त्रास नाही. त्याचं माझ्याबाबतीत काही वाकडं नसतं. आम्ही यापूर्वी एकत्र काम केलंय,’ असे त्यांनी सांगितले.पतंगरावांनी शेकापचे आमदार जयंत पाटील ‘सर्वांत श्रीमंत शेकापवाला’ असल्याचे सांगून त्यांनाही चिमटा काढला.

 

टॅग्स :PoliticsराजकारणIndiaभारत