शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

‘पाटबंधारे’चा लिपिक लाच घेताना जाळ्यात

By admin | Updated: June 14, 2014 01:25 IST

बदलीचा अर्ज पाठविण्यासाठी घेतली पाच हजार रुपयांची लाच

कोल्हापूर : बदलीचा अर्ज पुढे पाठविण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पाटबंधारे विभागातील कनिष्ठ लिपिक संशयित दिनकर अण्णाप्पा कांबळे (वय ५४, रा. वसगडे, ता. करवीर) याला आज- शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई ताराबाई पार्क येथील सिंचन भवन पाटबंधारे विभागाच्या परिसरात पोलिसांनी केली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, बावडा येथे पाटबंधारे शाखेमध्ये कालवा निरीक्षक म्हणून संदीप मंचकराव अंभुरे (वय २४, रा. मूळ गाव परभणी) हे २० नोव्हेंबर २०११ पासून या ठिकाणी काम करतात. ते अपंग असून अपंग वर्गवारीमधून भरती झाले आहेत. १३ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांनी परभणी जिल्ह्णात बदली होण्यासाठी कोयना बांधकाम मंडळ व परिमंडळीय अधिकारी अधीक्षक अभियंता यांच्याकडे अर्ज करून त्याची पोहोच घेतली. त्यानंतर हा अर्ज पंचगंगा पाटबंधारे उपविभाग सहायक अभियंता (श्रेणी वर्ग) यांच्यामार्फत पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे पाठविल्याचे अंभुरे यांना समजले. त्यांनी या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातील कनिष्ठ लिपिक दिनकर कांबळे यांची भेट घेतली. त्यावेळी कांबळे याने ‘तुझी फाईल माझ्याकडे आहे. तुझी बदली व्हावी, अशी शिफारस मी करीन. / पान ४ वरत्याकरिता पाच हजार रुपये दिले पाहिजेस.’ असे सांगितले. तेव्हा त्यांनी ‘माझ्याकडे पैसे नाहीत’ असे सांगितले. त्यावेळी ‘तू मला पैसे देत नाहीस तोपर्यंत तुझा अर्ज पुढे पाठवणार नाही,’ असे त्याने अंभुरे यांना सांगितले. त्यानंतर अनेक वेळा कांबळे यांना भेटून बदलीचा अर्ज पुढे पाठवा, अशी त्यांनी विनंती केली. परंतु, त्यांनी पैसे देत नाही तोपर्यंत अर्ज पुढे पाठवणार नाही, असे अंभुरे यांना सांगितले. त्यानंतर काल, गुरुवारी अंभुरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार आज, शुक्रवारी सकाळी पाटबंधारे विभाग येथे पाच हजारांची लाच स्वीकारताना संशयित दिनकर कांबळे याला पोलिसांनी सापळा रचून पकडले. दरम्यान, लाच घेतल्यानंतर पोलिसांचे पथक कांबळे याच्या वसगडेतील घराची झडती घेण्यासाठी रवाना झाले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक उदय आफळे, पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उदयसिंह पाटील, पोलीस हवालदार श्रीधर सावंत, जितेंद्र शिंदे, दयानंद कडूकर, पावलेकर ,महिला पोलीस शिपाई अर्पिता चौधरी यांनी केली.साडेपाच महिन्यात ११ जण जाळ्यात...१ जानेवारी ते आज (शुक्रवार )अखेर लाचलुचपत विभागाने जिल्ह्यात ११ जणांना लाचप्रकरणी अटक केली आहे. त्यांमध्ये सर्वाधिक महसूल विभागातील पाच , पोलीस दल दोन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कोल्हापूर महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद (पीडब्ल्यूडी विभाग) यांतील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे पोलीस उपअधीक्षक उदय आफळे यांनी सांगितले.दरम्यान, लाचेच्या अथवा अपसंपदेच्या तक्रारी असल्यास त्यांनी लाचलुचपत विभाग कोल्हापूर ०२३१ -२५४०९८९ व ९४०४३४५५३२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले.