शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

पासपोर्टची पडताळणी होणार घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:17 IST

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पासपोर्टसाठी लागणारी पोलीस पडताळणी (व्हेरिफिकेशन) वेळेत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. आता हीच पडताळणी पोलीस घरी येऊन करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना टॅब देण्यात आले आहेत. १ जानेवारी २०१८ पासून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे.कोल्हापुरातून साधारणत: वर्षाकाठी सुमारे ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पासपोर्टसाठी लागणारी पोलीस पडताळणी (व्हेरिफिकेशन) वेळेत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. आता हीच पडताळणी पोलीस घरी येऊन करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना टॅब देण्यात आले आहेत. १ जानेवारी २०१८ पासून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे.कोल्हापुरातून साधारणत: वर्षाकाठी सुमारे २० ते २५ हजार नागरिक, विद्यार्थी हे पासपोर्टसाठी अर्ज करतात. अचानक पासपोर्टची गरज लागल्यास, कागदपत्रांची छाननी, त्यातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी येथील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी पुण्याला जावे लागत होते. धावपळ, वेळ आणि पैसा खर्च होत होता.परराष्ट्र खात्याकडून कसबा बावडा मार्गावरील पोस्टाच्या मुख्य कार्यालयात स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरू केल्याने पुण्याला जावे लागत नाही; परंतु पासपोर्टसाठी संबंधित व्यक्तीचा अर्ज पोलीस पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याला गोपनीय विभागाकडून निरोप दिला जातो.काहीवेळा कर्मचाºयांवर कामाचा अतिरिक्त भार असल्याने अर्ज पुढे जाण्यासाठी रेंगाळतात, तर काही वेळा संबंधित व्यक्ती पाठपुरावा करत नसल्याने अर्जांकडे कोणी लक्ष देत नाही. या घोळामध्ये पासपोर्ट अर्जांच्या पडताळणीला विलंब होतो. लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ७२ तासांच्या आत पासपोर्टच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून ते पुढील कार्यवाहीसाठी पासपोर्ट केंद्राला पाठवून देण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागातील कर्मचाºयांना दिले आहेत.पोलीस मुख्यालयातील पासपोर्ट विभागास एका पासपोर्टची एकवीस दिवसात प्रक्रिया पूर्ण केल्यास १५० रुपये मिळतात. वर्षभरात २६ हजार पासपोर्टची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्या प्रत्येकामागे १५० रुपयांप्रमाणे ३ लाख ९० हजार रुपये शासनाकडून मिळाले आहेत तसेच प्रत्येक नागरिकाने पासपोर्टसाठी अर्ज केल्यास त्याचेकडून पंधराशे रुपये भरून घेतले जातात.या जमा झालेल्या निधीतून पासपोर्ट विभागाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना प्रत्येकी दोन टॅब दिले आहेत. नागरिकांच्यासोयीसाठी पोलीस ठाण्यात होणारी पडताळणी आता पोलीस घरी जाऊन करणार आहेत. त्यामुळे नागरिकांना पासपोर्टसाठी पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागणार नाही.दहा दिवसांत पासपोर्ट हातीपासपोर्ट काढण्यासाठी सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून तो अर्ज पोलीस मुख्यालयातील पासपोर्ट विभागात सादर केला जातो तेथून तो पोलीस पडताळणीसाठी संबंधित पोलीस ठाण्यात पाठविला जातो. येथील गोपनीय विभागाकडून संबंधित व्यक्तीवर कोणत्याही प्रकारे गुन्हे दाखल नसल्याची खात्री केली जाते. त्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या समोर होणारी ओळख परेड आता थेट पोलीस घरी जावून करतील. त्यानंतर तो अर्ज टपालाने पुन्हा पासपोर्ट विभागाला पाठविला जाईल. त्यानंतर तो येथील निरीक्षकांच्या सहीने कसबा बावडा येथील टपाल कार्यालयातील पासपोर्ट केंद्राला पाठविला जाईल. तेथून तो जावक क्रमांक देऊन पुणे पासपोर्ट कार्यालयाकडे पाठविला जाईल. अवघ्या दहा दिवसांत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांच्या घरी पासपोर्ट टपालाने मिळणार आहे.नागरिकांच्या सोयीसाठी आता पोलीस त्यांच्या घरी जावून पासपोर्ट संबंधी पडताळणी करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना टॅब देण्यात आले आहेत. जानेवारी २०१८ मध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस प्रशासनाची तयारी सुरू आहे.-शिवाजी शेंडे, सहायक पोलीस निरीक्षक, पासपोर्ट विभाग