शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
2
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
3
'१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले'; अण्णा हजारेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
उपचारासाठी भारतात आलेले बांग्लादेशचे खासदार बेपत्ता; अखेरचं लोकेशन बिहारमध्ये, शोध सुरू
5
“त्यांनी चीन सीमेवर जावे अन् पाहून यावे”; हेमंत बिस्वा सरमा यांचा नाना पटोलेंवर पलटवार
6
Indigo Flight: ऐकावं ते नवल! विमानातही ट्रेनसारखा किस्सा; कन्फर्म सीटवर बसवला 'स्टँडबाय' प्रवासी, प्रकरण काय?
7
अनिर्बंध मुजोरीचा निबंध! मस्तवाल बाळ आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत
8
राजस्थान रॉयल्स ११ दिवस खेळला नाही; RCB च्या आजच्या सामन्यावर सुनिल गावस्करांची भविष्यवाणी
9
Buddha Purnima 2024: भगवान बुद्धांची प्रिय तिथी अर्थात बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करायला हवी ते जाणून घ्या!
10
मोदी, सहानुभूती अन् जातीचे गणित; विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक, नेत्यांची अहोरात्र मेहनत तरीही धाकधूक कायम
11
उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटना; बुडालेल्या सहा जणांची नावे आली समोर; शोध कार्य पुन्हा केले सुरु
12
Paytm Q4 Results: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा 'पेटीएम'ला मोठा फटका, निव्वळ तोटा ५५० कोटींवर; महसुलातही मोठी घट
13
त्रिस्तरीय सुरक्षा भेदली, एक इसम थेट EVM ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला; निलेश लंकेंचा आरोप काय?
14
नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?
15
ऑनलाइन क्रशला भेटायला २४०० किमी दूर पोहचली युवती; त्यानंतर जे घडलं तिने डोक्याला हात लावला
16
पीपीएफ आणि दर महिन्याची ५ तारीख, अचूक टायमिंग लक्षात ठेवा; 1 कोटीचा फंड जमा करू शकाल
17
पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत
18
विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव 
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची जबरदस्त सुरुवात; अल्ट्राटेकमध्ये तेजी, एसबीआय घसरला
20
काँग्रेस अन् भाजपने उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे आखली; बसप अध्यक्षा मायावती यांचा आरोप

पासपोर्टची पडताळणी होणार घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 12:16 AM

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पासपोर्टसाठी लागणारी पोलीस पडताळणी (व्हेरिफिकेशन) वेळेत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. आता हीच पडताळणी पोलीस घरी येऊन करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना टॅब देण्यात आले आहेत. १ जानेवारी २०१८ पासून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे.कोल्हापुरातून साधारणत: वर्षाकाठी सुमारे ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पासपोर्टसाठी लागणारी पोलीस पडताळणी (व्हेरिफिकेशन) वेळेत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. आता हीच पडताळणी पोलीस घरी येऊन करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना टॅब देण्यात आले आहेत. १ जानेवारी २०१८ पासून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे.कोल्हापुरातून साधारणत: वर्षाकाठी सुमारे २० ते २५ हजार नागरिक, विद्यार्थी हे पासपोर्टसाठी अर्ज करतात. अचानक पासपोर्टची गरज लागल्यास, कागदपत्रांची छाननी, त्यातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी येथील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी पुण्याला जावे लागत होते. धावपळ, वेळ आणि पैसा खर्च होत होता.परराष्ट्र खात्याकडून कसबा बावडा मार्गावरील पोस्टाच्या मुख्य कार्यालयात स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरू केल्याने पुण्याला जावे लागत नाही; परंतु पासपोर्टसाठी संबंधित व्यक्तीचा अर्ज पोलीस पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याला गोपनीय विभागाकडून निरोप दिला जातो.काहीवेळा कर्मचाºयांवर कामाचा अतिरिक्त भार असल्याने अर्ज पुढे जाण्यासाठी रेंगाळतात, तर काही वेळा संबंधित व्यक्ती पाठपुरावा करत नसल्याने अर्जांकडे कोणी लक्ष देत नाही. या घोळामध्ये पासपोर्ट अर्जांच्या पडताळणीला विलंब होतो. लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ७२ तासांच्या आत पासपोर्टच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून ते पुढील कार्यवाहीसाठी पासपोर्ट केंद्राला पाठवून देण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागातील कर्मचाºयांना दिले आहेत.पोलीस मुख्यालयातील पासपोर्ट विभागास एका पासपोर्टची एकवीस दिवसात प्रक्रिया पूर्ण केल्यास १५० रुपये मिळतात. वर्षभरात २६ हजार पासपोर्टची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्या प्रत्येकामागे १५० रुपयांप्रमाणे ३ लाख ९० हजार रुपये शासनाकडून मिळाले आहेत तसेच प्रत्येक नागरिकाने पासपोर्टसाठी अर्ज केल्यास त्याचेकडून पंधराशे रुपये भरून घेतले जातात.या जमा झालेल्या निधीतून पासपोर्ट विभागाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना प्रत्येकी दोन टॅब दिले आहेत. नागरिकांच्यासोयीसाठी पोलीस ठाण्यात होणारी पडताळणी आता पोलीस घरी जाऊन करणार आहेत. त्यामुळे नागरिकांना पासपोर्टसाठी पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागणार नाही.दहा दिवसांत पासपोर्ट हातीपासपोर्ट काढण्यासाठी सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून तो अर्ज पोलीस मुख्यालयातील पासपोर्ट विभागात सादर केला जातो तेथून तो पोलीस पडताळणीसाठी संबंधित पोलीस ठाण्यात पाठविला जातो. येथील गोपनीय विभागाकडून संबंधित व्यक्तीवर कोणत्याही प्रकारे गुन्हे दाखल नसल्याची खात्री केली जाते. त्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या समोर होणारी ओळख परेड आता थेट पोलीस घरी जावून करतील. त्यानंतर तो अर्ज टपालाने पुन्हा पासपोर्ट विभागाला पाठविला जाईल. त्यानंतर तो येथील निरीक्षकांच्या सहीने कसबा बावडा येथील टपाल कार्यालयातील पासपोर्ट केंद्राला पाठविला जाईल. तेथून तो जावक क्रमांक देऊन पुणे पासपोर्ट कार्यालयाकडे पाठविला जाईल. अवघ्या दहा दिवसांत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांच्या घरी पासपोर्ट टपालाने मिळणार आहे.नागरिकांच्या सोयीसाठी आता पोलीस त्यांच्या घरी जावून पासपोर्ट संबंधी पडताळणी करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना टॅब देण्यात आले आहेत. जानेवारी २०१८ मध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस प्रशासनाची तयारी सुरू आहे.-शिवाजी शेंडे, सहायक पोलीस निरीक्षक, पासपोर्ट विभाग