शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

पर्युषण पर्व: जैन समाजात आहे माफी मागण्याचा सण

By संदीप आडनाईक | Updated: September 15, 2023 12:46 IST

पाणी न पिता कडक उपवास, एकासन

संदीप आडनाईककोल्हापूर : एखादी चुकीची घटना आपल्या हातून घडल्यास त्याबद्दल माफी मागण्यासाठीही मोठे मन असावे लागते, असे म्हटले जाते. परंतु वर्षभरात केलेल्या चुकांची, पापांची जाणीव ठेवून त्याची माफी मागण्यासाठीही एका समाजात एक खास सण साजरा केला जातो, तो समाज म्हणजे जैन समाज आणि तो सण म्हणजे संवत्सरी किंवा पर्युषण पर्व. लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबरच जैन धर्मीयांचा हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. हा त्यांचा माफी मागण्याचा दिवस आहे. याला पर्व धीरज, असेही म्हणतात. “मिच्छा मी दुक्कडं” ही प्रथा या पर्युषण पर्वाची मुख्य प्रक्रिया असते.हिंदू धर्मातील नवरात्रीप्रमाणे जैन समाज पर्युषण पर्व साजरा करतो. भगवान महावीर यांच्यासह इतर सर्व जैन तीर्थंकरांनी सत्य, अहिंसा आणि क्षमा यांचे विशेष महत्त्व सांगितले आहे. जैन समाज या तत्त्वावर चालतो. हा समाज आठ दिवस हा संवत्सरी पर्व किंवा पर्युषण पर्व सण म्हणून साजरा करतात. जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन मुख्य पंथ आहेत. या दोन्ही पंथात हा संवत्सरी पर्व मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्वेतांबर पंथातील बांधव हे पर्युषण पर्व आठ दिवस तर दिगंबर पंथातील बांधव १६ दिवसांपर्यंत या पवित्र व्रताचं पालन करतात.आषाढ शुक्ल चतुर्दशीला जैन धर्मातील चातुर्मास सुरू होतो. या चार महिन्यांत जैन बांधव तप-साधना करतात. या कालावधी दरम्यानच भाद्रपद महिन्यात संवत्सरी पर्व साजरे केले जाते. कळत-नकळत वर्षभर मानवांकडून असंख्य चुका झालेल्या असतात, अनेकांना दुखावलेले असते, अनेक जिवांची हत्या झालेली असते. या सर्व चुकांची पर्युषण पर्वाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे संवत्सरीच्या शेवटच्या दिवशी क्षमा मागितली जाते.पाणी न पिता कडक उपवास, एकासनपर्युषण पर्वाच्या काळात जैन बांधव, सर्व कंद-मूळ, पालेभाजी यासह अनेक गोष्टींचा त्याग करतात. एकासन म्हणजेच सायंकाळ होण्याअगोदर एकवेळचे भोजन घेतात. याबरोबरच अनेक जैन बांधव पाणी देखील न घेता कडक उपवास करतात. जैन मंदिरामध्ये जैन मुनींचे प्रवचन, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर