शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे स्मृतीदिन : समता संघर्ष समितीतर्फे बिंदू चौकात धरणे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 20:26 IST

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी येत्या १५ दिवसांत शासनाने खऱ्या आरोपींचा शोध न घेतल्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानास घेराव घालून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा

ठळक मुद्देअन्यथा चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी घेराव

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी येत्या १५ दिवसांत शासनाने खऱ्या आरोपींचा शोध न घेतल्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानास घेराव घालून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा, समता संघर्ष समितीच्यावतीने बुधवारी देण्यात आला. या समितीच्यावतीने दिवसभर बिंदू चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी ‘गोविंद पानसरे अमर रहे, ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. पानसरे यांच्या हत्या प्रकरणाला बुधवारी चार वर्षे पूर्ण झाली असतानाही तपास यंत्रणेला मारेकºयांनी वापरलेले पिस्तूल, गाड्या, फरार आरोपींचा शोध घेता आला नसल्याने या जनताविरोधी सरकारला आगामी निवडणुकीत घरचा रस्ता दाखवा, असा इशारा नामदेवराव गावडे दिला. मुक्ता दाभोलकर यांनीही जनतेने धर्मनिरपेक्षता आणि विवेकी विचारसरणीच्या पाठीशी राहावे, असे आवाहन केले.

विवेकी विचारांच्या खुनांचा तपास करण्याची सत्ताधाºयांची मानसिकता नसल्याने त्यांना मुळासकट उपटून टाका, असे आवाहन त्यांनी केले. पानसरे स्मारकासाठी निधी देण्याची घोषणा आमदार सतेज पाटील यांनी केली.पानसरे निवासस्थानापासून ‘मॉर्निंग वॉक’ पानसरे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे निवासस्थान ते बिंदू चौक असा ‘मॉर्निंग वॉक’काढण्यात आला. त्याची सुरुवात ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, उमा पानसरे आणि मुक्ता दाभोलकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार करुन झाली.

विवेकाचा आवाज बुलंद करण्याची शपथ कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी सकाळी ‘विवेकाचा आवाज बुलंद’ करण्याची शपथ पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी घेतली. यावेळी ‘शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या विचारवंतांचे वारसदार म्हणून त्यांचे कार्य आम्ही पुढे नेऊ, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे निवासस्थान ते बिंदू चौक असा ‘मॉर्निंग वॉक’काढण्यात आला. त्याची सुरुवात ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, उमा पानसरे आणि मुक्ता दाभोलकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार करुन झाली. प्रा. पाटील म्हणाले,‘या देशात धर्मांध शक्तींंनी आपले डोके वर काढले आहे. ज्यांना गजाआड घालण्याची आवश्यकता आहे. त्याविरोधात आवाज उठवतात त्यांची अभिव्यक्ती ठेचून काढण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. अशा शक्तींच्या विरोधात आपण उभे राहिले पाहिजे.’

मुक्ता दाभोलकर म्हणाल्या,‘ कर्नाटक पोलिस गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यापर्यंत पोहचले. परंतू महाराष्ट्र सरकारला मात्र अजूनही दाभोलकर, पानसरे यांच्या खून्यांना बेड्या ठोकता आलेल्या नाहीत. हा तपास एका टप्प्यावर येऊन थांबला आहे. भारतातील चार विवेकवाद्यांची हत्या झाली, त्यांच्या मास्टरमाइंडपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर