शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

पानसरे स्मृतीदिन : समता संघर्ष समितीतर्फे बिंदू चौकात धरणे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 20:26 IST

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी येत्या १५ दिवसांत शासनाने खऱ्या आरोपींचा शोध न घेतल्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानास घेराव घालून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा

ठळक मुद्देअन्यथा चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी घेराव

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी येत्या १५ दिवसांत शासनाने खऱ्या आरोपींचा शोध न घेतल्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानास घेराव घालून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा, समता संघर्ष समितीच्यावतीने बुधवारी देण्यात आला. या समितीच्यावतीने दिवसभर बिंदू चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी ‘गोविंद पानसरे अमर रहे, ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. पानसरे यांच्या हत्या प्रकरणाला बुधवारी चार वर्षे पूर्ण झाली असतानाही तपास यंत्रणेला मारेकºयांनी वापरलेले पिस्तूल, गाड्या, फरार आरोपींचा शोध घेता आला नसल्याने या जनताविरोधी सरकारला आगामी निवडणुकीत घरचा रस्ता दाखवा, असा इशारा नामदेवराव गावडे दिला. मुक्ता दाभोलकर यांनीही जनतेने धर्मनिरपेक्षता आणि विवेकी विचारसरणीच्या पाठीशी राहावे, असे आवाहन केले.

विवेकी विचारांच्या खुनांचा तपास करण्याची सत्ताधाºयांची मानसिकता नसल्याने त्यांना मुळासकट उपटून टाका, असे आवाहन त्यांनी केले. पानसरे स्मारकासाठी निधी देण्याची घोषणा आमदार सतेज पाटील यांनी केली.पानसरे निवासस्थानापासून ‘मॉर्निंग वॉक’ पानसरे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे निवासस्थान ते बिंदू चौक असा ‘मॉर्निंग वॉक’काढण्यात आला. त्याची सुरुवात ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, उमा पानसरे आणि मुक्ता दाभोलकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार करुन झाली.

विवेकाचा आवाज बुलंद करण्याची शपथ कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी सकाळी ‘विवेकाचा आवाज बुलंद’ करण्याची शपथ पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी घेतली. यावेळी ‘शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या विचारवंतांचे वारसदार म्हणून त्यांचे कार्य आम्ही पुढे नेऊ, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे निवासस्थान ते बिंदू चौक असा ‘मॉर्निंग वॉक’काढण्यात आला. त्याची सुरुवात ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, उमा पानसरे आणि मुक्ता दाभोलकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार करुन झाली. प्रा. पाटील म्हणाले,‘या देशात धर्मांध शक्तींंनी आपले डोके वर काढले आहे. ज्यांना गजाआड घालण्याची आवश्यकता आहे. त्याविरोधात आवाज उठवतात त्यांची अभिव्यक्ती ठेचून काढण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. अशा शक्तींच्या विरोधात आपण उभे राहिले पाहिजे.’

मुक्ता दाभोलकर म्हणाल्या,‘ कर्नाटक पोलिस गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यापर्यंत पोहचले. परंतू महाराष्ट्र सरकारला मात्र अजूनही दाभोलकर, पानसरे यांच्या खून्यांना बेड्या ठोकता आलेल्या नाहीत. हा तपास एका टप्प्यावर येऊन थांबला आहे. भारतातील चार विवेकवाद्यांची हत्या झाली, त्यांच्या मास्टरमाइंडपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर