शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Kolhapur: जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा नको, ग्रामस्थांच्या बैठकीत बंद ठेवून साखळी उपोषणाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:41 IST

पन्हाळा : जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा गडचा समावेश नको म्हणून ग्रामस्थांनी रविवारी घेतलेल्या दुसऱ्या बैठकीत कडाडून विरोध करण्याचा ...

पन्हाळा : जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळागडचा समावेश नको म्हणून ग्रामस्थांनी रविवारी घेतलेल्या दुसऱ्या बैठकीत कडाडून विरोध करण्याचा निर्णय घेतला असून, उद्या, मंगळवारी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दहा एप्रिलपर्यंत ग्रामस्थांसमोर जागतिक वारसा स्थळांचे नियम व कायदेविषयक माहिती लिखित स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी, असा शासनावर दबाव आणण्याचा निर्णय ग्राम बैठकीत घेण्यात आला. बैठकीला सुमारे पाचशे ग्रामस्थ उपस्थित होते.जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळ्याचे नाव निश्चित झाल्याने यापूर्वी या यादीत जैसलमेर किल्ला गेला आहे. तेथे कोणते नियम लागले आहेत, याची पाहणी व अभ्यास दौऱ्यासाठी पन्हाळगडावरून पाचजणांचे शिष्टमंडळ जैसलमेर येथे जाऊन तेथील शासकीय, नगरपरिषद व ग्रामस्थांबरोबर चर्चा करून जनतेवर कोणकोणते जाचक नियम लादले आहेत, त्याचे विश्लेषण बैठकीत त्यांनी सांगितले. जैसलमेर येथील व पन्हाळगडावरची परिस्थिती वेगळी असल्यामुळे जागतिक वारसा यादीत पन्हाळगडाचा समावेश नसावा असा निर्णय ग्रामबैठकीत घेतला. शासकीय अधिकारी ग्रामस्थांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत आहेत, त्यामुळे ग्रामस्थ व शासन यांच्यात दुही निर्माण झाली आहे. यात प्रामुख्याने पर्यटकांवर अवलंबून असणाऱ्या लहानमोठ्या व्यावसायिकांमध्ये असंतोष आहे.पन्हाळा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत जाताना पन्हाळा ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नसल्याने व वारसा यादीत पन्हाळ्याचा समावेश होत असताना पन्हाळगडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात सांगितले होते की, पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होता तसा ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील म्हणजे नेमके येथील रहिवासी असलेल्या लोकांचे काय होणार, हा संभ्रम दूर करणे शासनाकडून अपेक्षित आहे. त्यामुळेच पन्हाळा जागतिक वारसा यादीत समावेश होण्यासाठी स्थानिक पातळीवर विरोध होऊ लागला आहे. यात पहिल्या टप्प्यात बंद पाळणे व साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे.टॉवर, टाकी हटवणारदूरध्वनी व आकाशवाणीचे मनोरे (टाॅवर) यांना जोतिबा डोंगरावर प्रत्येकी दहा गुंठे जागा देण्यात आली व त्यांना प्रत्येकी सहा कोटी रुपये देऊन पन्हाळगडावरून त्यांना स्थलांतर करण्यास सांगितले आहे. पाठोपाठ पन्हाळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उंच पाण्याची टाकी पाडण्यासाठी सांगितले आहे. हे पन्हाळा नागरिकांना विश्वासात न घेता घेतलेले निर्णय आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगड