शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा नको, ग्रामस्थांच्या बैठकीत बंद ठेवून साखळी उपोषणाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:41 IST

पन्हाळा : जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळा गडचा समावेश नको म्हणून ग्रामस्थांनी रविवारी घेतलेल्या दुसऱ्या बैठकीत कडाडून विरोध करण्याचा ...

पन्हाळा : जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळागडचा समावेश नको म्हणून ग्रामस्थांनी रविवारी घेतलेल्या दुसऱ्या बैठकीत कडाडून विरोध करण्याचा निर्णय घेतला असून, उद्या, मंगळवारी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दहा एप्रिलपर्यंत ग्रामस्थांसमोर जागतिक वारसा स्थळांचे नियम व कायदेविषयक माहिती लिखित स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी, असा शासनावर दबाव आणण्याचा निर्णय ग्राम बैठकीत घेण्यात आला. बैठकीला सुमारे पाचशे ग्रामस्थ उपस्थित होते.जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळ्याचे नाव निश्चित झाल्याने यापूर्वी या यादीत जैसलमेर किल्ला गेला आहे. तेथे कोणते नियम लागले आहेत, याची पाहणी व अभ्यास दौऱ्यासाठी पन्हाळगडावरून पाचजणांचे शिष्टमंडळ जैसलमेर येथे जाऊन तेथील शासकीय, नगरपरिषद व ग्रामस्थांबरोबर चर्चा करून जनतेवर कोणकोणते जाचक नियम लादले आहेत, त्याचे विश्लेषण बैठकीत त्यांनी सांगितले. जैसलमेर येथील व पन्हाळगडावरची परिस्थिती वेगळी असल्यामुळे जागतिक वारसा यादीत पन्हाळगडाचा समावेश नसावा असा निर्णय ग्रामबैठकीत घेतला. शासकीय अधिकारी ग्रामस्थांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत आहेत, त्यामुळे ग्रामस्थ व शासन यांच्यात दुही निर्माण झाली आहे. यात प्रामुख्याने पर्यटकांवर अवलंबून असणाऱ्या लहानमोठ्या व्यावसायिकांमध्ये असंतोष आहे.पन्हाळा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत जाताना पन्हाळा ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नसल्याने व वारसा यादीत पन्हाळ्याचा समावेश होत असताना पन्हाळगडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात सांगितले होते की, पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होता तसा ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील म्हणजे नेमके येथील रहिवासी असलेल्या लोकांचे काय होणार, हा संभ्रम दूर करणे शासनाकडून अपेक्षित आहे. त्यामुळेच पन्हाळा जागतिक वारसा यादीत समावेश होण्यासाठी स्थानिक पातळीवर विरोध होऊ लागला आहे. यात पहिल्या टप्प्यात बंद पाळणे व साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे.टॉवर, टाकी हटवणारदूरध्वनी व आकाशवाणीचे मनोरे (टाॅवर) यांना जोतिबा डोंगरावर प्रत्येकी दहा गुंठे जागा देण्यात आली व त्यांना प्रत्येकी सहा कोटी रुपये देऊन पन्हाळगडावरून त्यांना स्थलांतर करण्यास सांगितले आहे. पाठोपाठ पन्हाळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उंच पाण्याची टाकी पाडण्यासाठी सांगितले आहे. हे पन्हाळा नागरिकांना विश्वासात न घेता घेतलेले निर्णय आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगड