शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पूरमुक्त कोल्हापूरसाठी पंचगंगेचे पुनरुज्जीवन आवश्यक :  राजेंद्रसिंह राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 18:48 IST

पूरमुक्त कोल्हापूर होण्यासाठी पंचगंगा नदीचे पुनरुज्जीवन करण्यासह या नदीपात्रातील जमिनीची होणारी धूप थांबविणे आवश्यक आहे; त्यासाठी नदीपात्रालगत, त्याच्यामागे असणाऱ्या शेती, परिसरात झाडे लावणे, असलेले गवत टिकविण्याचे काम लोकांकडून व्हावे. नाला म्हणून ओळख झालेली जयंती, गोमतीला नदीचा दर्जा देण्यात यावा, असे प्रतिपादन जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी बुधवारी केले.

ठळक मुद्देपूरमुक्त कोल्हापूरसाठी पंचगंगेचे पुनरुज्जीवन आवश्यक :  राजेंद्रसिंह राणाशिवाजी विद्यापीठाने जलसाक्षरतेचा उपक्रम राबवावा

कोल्हापूर : पूरमुक्त कोल्हापूर होण्यासाठी पंचगंगा नदीचे पुनरुज्जीवन करण्यासह या नदीपात्रातील जमिनीची होणारी धूप थांबविणे आवश्यक आहे; त्यासाठी नदीपात्रालगत, त्याच्यामागे असणाऱ्या शेती, परिसरात झाडे लावणे, असलेले गवत टिकविण्याचे काम लोकांकडून व्हावे. नाला म्हणून ओळख झालेली जयंती, गोमतीला नदीचा दर्जा देण्यात यावा, असे प्रतिपादन जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी बुधवारी केले.शिवाजी विद्यापीठ आणि असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अ‍ॅन्ड इंजिनिअर्स कोल्हापूरतर्फे ‘जागे व्हा, पंचगंगेसाठी’ या अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहातील या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, तर कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी प्रमुख उपस्थित होते.

डॉ. राणा म्हणाले, कोल्हापूरमधील जलस्रोत, नदीच्या पुनरुज्जीवनासाठी सुरूअसलेले काम पाहून आनंद झाला. गेल्या काही वर्षांतील चुकांमुळे जयंती, गोमती नदीची नाला नोंद म्हणून झाली आहे. ती पुन्हा नदी म्हणून होण्यासाठी आयुक्त कलशेट्टी यांनी प्रयत्न करावेत. जयंती, गोमतीमध्ये ज्या ठिकाणी सांडपाणी मिसळते, त्या ठिकाणी प्रक्रिया केंद्र उभारल्यास पाणी शुद्धीकरण प्रक्रियेचा खर्च शंभरपटीने कमी होईल.

विद्यापीठ परिसरात पडणारा पाऊस, या ठिकाणी असणारी पाण्याची गरज लक्षात घेऊन जलव्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार पाऊल टाकल्याने आज विद्यापीठ पाणीदार झाले आहे. पिण्याचे आणि वापराचे पाणी स्वतंत्रपणे ठेवण्याचे चांगले व्यवस्थापन विद्यापीठाकडून होते. दर्जा, वापरानुसार पाणी स्वतंत्र ठेवल्यास त्यांच्या शुद्धीकरणासाठी कमी खर्च येतो. विद्यापीठाने महाविद्यालयांमध्ये जलसाक्षरता उपक्रम राबवावा.आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील एनएनएसचे काम खूप चांगले आहे. जलसाक्षरतेसह लॅब टू लँड काम होणे आवश्यक आहे. ‘सागरमित्र’चे संस्थापक विनोद बोधनकर म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रबोधन व्हावे.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, डॉ. राणा यांच्या मार्गदर्शन, प्रेरणेतून विद्यापीठाने जलव्यवस्थापन केले आहे. जलसाक्षरतेचा उपक्रम राबविला जाईल. या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डी. आर. मोरे, जयदीप बागी, उदय गायकवाड, गौरी चोरगे, अनिल कानडी, आदी उपस्थित होते. पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी स्वागत केले. असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स कोल्हापूरचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी प्रास्ताविक केले. आरती परीट, आसावरी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. वंदना कुसाळकर यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर