शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पूरमुक्त कोल्हापूरसाठी पंचगंगेचे पुनरुज्जीवन आवश्यक :  राजेंद्रसिंह राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 18:48 IST

पूरमुक्त कोल्हापूर होण्यासाठी पंचगंगा नदीचे पुनरुज्जीवन करण्यासह या नदीपात्रातील जमिनीची होणारी धूप थांबविणे आवश्यक आहे; त्यासाठी नदीपात्रालगत, त्याच्यामागे असणाऱ्या शेती, परिसरात झाडे लावणे, असलेले गवत टिकविण्याचे काम लोकांकडून व्हावे. नाला म्हणून ओळख झालेली जयंती, गोमतीला नदीचा दर्जा देण्यात यावा, असे प्रतिपादन जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी बुधवारी केले.

ठळक मुद्देपूरमुक्त कोल्हापूरसाठी पंचगंगेचे पुनरुज्जीवन आवश्यक :  राजेंद्रसिंह राणाशिवाजी विद्यापीठाने जलसाक्षरतेचा उपक्रम राबवावा

कोल्हापूर : पूरमुक्त कोल्हापूर होण्यासाठी पंचगंगा नदीचे पुनरुज्जीवन करण्यासह या नदीपात्रातील जमिनीची होणारी धूप थांबविणे आवश्यक आहे; त्यासाठी नदीपात्रालगत, त्याच्यामागे असणाऱ्या शेती, परिसरात झाडे लावणे, असलेले गवत टिकविण्याचे काम लोकांकडून व्हावे. नाला म्हणून ओळख झालेली जयंती, गोमतीला नदीचा दर्जा देण्यात यावा, असे प्रतिपादन जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी बुधवारी केले.शिवाजी विद्यापीठ आणि असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अ‍ॅन्ड इंजिनिअर्स कोल्हापूरतर्फे ‘जागे व्हा, पंचगंगेसाठी’ या अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहातील या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, तर कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी प्रमुख उपस्थित होते.

डॉ. राणा म्हणाले, कोल्हापूरमधील जलस्रोत, नदीच्या पुनरुज्जीवनासाठी सुरूअसलेले काम पाहून आनंद झाला. गेल्या काही वर्षांतील चुकांमुळे जयंती, गोमती नदीची नाला नोंद म्हणून झाली आहे. ती पुन्हा नदी म्हणून होण्यासाठी आयुक्त कलशेट्टी यांनी प्रयत्न करावेत. जयंती, गोमतीमध्ये ज्या ठिकाणी सांडपाणी मिसळते, त्या ठिकाणी प्रक्रिया केंद्र उभारल्यास पाणी शुद्धीकरण प्रक्रियेचा खर्च शंभरपटीने कमी होईल.

विद्यापीठ परिसरात पडणारा पाऊस, या ठिकाणी असणारी पाण्याची गरज लक्षात घेऊन जलव्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार पाऊल टाकल्याने आज विद्यापीठ पाणीदार झाले आहे. पिण्याचे आणि वापराचे पाणी स्वतंत्रपणे ठेवण्याचे चांगले व्यवस्थापन विद्यापीठाकडून होते. दर्जा, वापरानुसार पाणी स्वतंत्र ठेवल्यास त्यांच्या शुद्धीकरणासाठी कमी खर्च येतो. विद्यापीठाने महाविद्यालयांमध्ये जलसाक्षरता उपक्रम राबवावा.आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील एनएनएसचे काम खूप चांगले आहे. जलसाक्षरतेसह लॅब टू लँड काम होणे आवश्यक आहे. ‘सागरमित्र’चे संस्थापक विनोद बोधनकर म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रबोधन व्हावे.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, डॉ. राणा यांच्या मार्गदर्शन, प्रेरणेतून विद्यापीठाने जलव्यवस्थापन केले आहे. जलसाक्षरतेचा उपक्रम राबविला जाईल. या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डी. आर. मोरे, जयदीप बागी, उदय गायकवाड, गौरी चोरगे, अनिल कानडी, आदी उपस्थित होते. पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी स्वागत केले. असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स कोल्हापूरचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी प्रास्ताविक केले. आरती परीट, आसावरी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. वंदना कुसाळकर यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर