शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

पंचगंगेच्या पातळीत दीड फुटाने वाढ : १४ बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 12:04 IST

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून, नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

ठळक मुद्देपर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून, नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत २४ तासांत दीड फुटाने वाढ झाली असून, ती वाढ २० फुटांवर आहे. १४ बंधारे पाण्याखाली आहेत.

गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, आजरा व चंदगड तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ४५२.७२ मिलिमीटरची नोंद झाली आहे. आजरा व गगनबावडा तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. राधानगरी, तुळशी, दूधगंगा धरणक्षेत्रातही सरासरी ९० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. घटप्रभा धरणक्षेत्रात तब्बल १५४ मिलिमीटर पाऊस झाला. हे धरण पूर्णक्षमतेने भरले असून, प्रतिसेकंद ३५२२ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोदे धरण ६४, तर कडवी धरण ४४ टक्के भरले आहे. राधानगरी व तुळशी ३५ टक्के, तर वारणा २९ व दूधगंगा १६ टक्के भरले आहे.

नद्यांच्या पातळीत वाढ होत असून, पंचगंगेची पातळी २० फुटांपर्यंत पोहोचली आहे. पंचगंगा नदीवरील सात, भोगावती नदीवरील तीन, वेदगंगा नदीवरील चार असे १४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत; यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा-हातकणंगले (६.३८), शिरोळ (६.२९), पन्हाळा (२०.४३), शाहूवाडी (४०.५०), राधानगरी (४६.१७), गगनबावडा (८२), करवीर (२४.३६), कागल (२४.१४), गडहिंग्लज (२६.८६), भुदरगड (४६.६०), आजरा (८०), चंदगड (४९).

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीRainपाऊस