शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा नदीघाटाचे काम फाईलबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:20 IST

भारत चव्हाण / कोल्हापूर : आपले हेतू साध्य झाले नाहीत अथवा आपले महत्त्व वाढत नाही, असे वाटले की एखादे ...

भारत चव्हाण / कोल्हापूर : आपले हेतू साध्य झाले नाहीत अथवा आपले महत्त्व वाढत नाही, असे वाटले की एखादे चांगले काम बंद पाडण्याची एक ‘व्हाईट कॉलर’ प्रवत्ती कोल्हापुरात बळावत चालली असल्याचा संशय पंचगंगा नदीघाट विकासकामातून येत आहे. या कामाला मंजुरी मिळाली होती, निधी होता, कामाला सुरुवात झाली आणि एक दिवस काम थांबले. आता तर काम ‘फाईलबंद’ झाले.

तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांत पाटील व तत्कालिन आमदार राजेश क्षीरसागर यांनी पंचगंगा नदीघाट येथे पर्यटकांकरिता मुलभूत सोयी-सुविधा करण्याचे काम हाती घेतले. २०१७मध्ये या कामासाठी ४ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर झाला होता. कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम केले जाणार होते. त्याला पुरातत्व विभागाची पार्टली मंजुरी देण्यात आली होती. या कामासाठी ठेकेदार नियुक्त झाले. तत्कालिन पालकमंत्री पाटील व राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत कामाचा प्रारंभही करण्यात आला.

ठेकेदाराने कामाला सुरुवात केली आणि एके दिवशी महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने काम थांबविण्याचे आदेश दिले. काही व्यक्तींनी या कामाबाबत केंद्रीय पुरातत्व विभागाकडे हरकत दाखल करुन काम थांबविण्यास भाग पाडले. हरकती केल्या नाहीत तोपर्यंत सगळे व्यवस्थित सुरु होते. नंतर मात्र तक्रारी दाखल केल्या. त्यामुळे पुरातत्वच्या सर्वेअरनी जागेची पाहणी केली. त्यांच्यासमाेर कोल्हापुरातील तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी चुकीचे सादरीकरण करुन ब्रम्हपुरी टेकडी या वारसा स्थळापासून शंभर मीटरच्या आत काम होत असल्याची माहिती दिली आणि काम बंद पडण्यास मोठा हातभार लागला.

पुरातत्व विभागाला चुकीची माहिती मिळाल्यामुळे त्यांनी कामात आडकाठी आणली, अशी चर्चा आहे. नंतर महापालिकेच्या नगररचना विभागाने पत्र देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला काम थांबविण्याच्या सूचना दिल्या. पर्यटकांच्या दृष्टीने एक चांगले होणारे काम थांबले. काम का थांबले, कोणी तक्रारी केल्या, त्यातील वस्तूस्थिती काय होती, यावर विचारविनिमय होऊन पुन्हा काही त्यातून मार्ग निघतो का, हे पाहिले पाहिजे.

- नदीघाटावर ही कामे होणार होती -

नदीघाटावर एक जुन्या पद्धतीची भिंत, एक कमान, चार दीपमाळा स्तंभ बांधले जाणार होते. पाथवे केला जाणार होता. लॅन्डस्केपिंग, नदी पात्रातील पायऱ्यांची दुरुस्ती, विरंगुळा केंद्र, बैठक व्यवस्था, विजेची व्यवस्था अशी कामे पहिल्या टप्प्यात केली जाणार होती. तर दुसऱ्या टप्प्यात स्मशानभूमीपर्यंत २८ कोटींची कामे प्रस्तावित होती. एक अप्रतिम पर्यटनस्थळ करण्यात येणार होते.

-शिवाजी पुलाचाच अनुभव -

शिवाजी पुलाला पर्यायी नवीन पूल बांधताना अशीच काही मंडळी आडवी पडली होती. पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झाल्यानंतर पुरातत्व विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. सात-आठ झाडे तोडण्यास व एक पाण्याचा हौद तोडण्यास विरोध करण्यात आला. विघ्नसंतोषी मंडळींच्या विरोधामुळे पुलाचे बांधकाम रखडले. दरम्यानच्या काळात एका वाहनाला अपघात होऊन त्यात १३ व्यक्तींचा मृत्यू झाला. नवीन पूल वेळेत झाला असता तर हा अपघातही टळला असता. आता अशीच मंडळी नदी घाटाच्या कामात आडवी पडली आहेत.

-ब्रम्हपुरी वारसास्थळ नेमके कोठे?

पुरातत्वच्या सर्वेअरसमोर ब्रम्हपुरी टेकडीबाबत झालेले सादरीकरण चुकीचे होते. त्यांची धूळफेक केली गेली, असा दावा काहीजण करतात. जर सादरीकरण चुकीचे झाले असेल आणि त्यामुळे घाट विकासाचे काम बंद पडले असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यात लक्ष देऊन नेमकी वस्तूस्थिती काय आहे, याची माहिती घेतली पाहिजे. मंत्री, खासदार, आमदार यांनीही यात लक्ष घातले पाहिजे. कोणीतरी खोडसाळपणाने कामे थांबवत असेल तर ते योग्य नाही.