शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

पंचगंगा नदीघाटाचे काम फाईलबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:20 IST

भारत चव्हाण / कोल्हापूर : आपले हेतू साध्य झाले नाहीत अथवा आपले महत्त्व वाढत नाही, असे वाटले की एखादे ...

भारत चव्हाण / कोल्हापूर : आपले हेतू साध्य झाले नाहीत अथवा आपले महत्त्व वाढत नाही, असे वाटले की एखादे चांगले काम बंद पाडण्याची एक ‘व्हाईट कॉलर’ प्रवत्ती कोल्हापुरात बळावत चालली असल्याचा संशय पंचगंगा नदीघाट विकासकामातून येत आहे. या कामाला मंजुरी मिळाली होती, निधी होता, कामाला सुरुवात झाली आणि एक दिवस काम थांबले. आता तर काम ‘फाईलबंद’ झाले.

तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांत पाटील व तत्कालिन आमदार राजेश क्षीरसागर यांनी पंचगंगा नदीघाट येथे पर्यटकांकरिता मुलभूत सोयी-सुविधा करण्याचे काम हाती घेतले. २०१७मध्ये या कामासाठी ४ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर झाला होता. कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम केले जाणार होते. त्याला पुरातत्व विभागाची पार्टली मंजुरी देण्यात आली होती. या कामासाठी ठेकेदार नियुक्त झाले. तत्कालिन पालकमंत्री पाटील व राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत कामाचा प्रारंभही करण्यात आला.

ठेकेदाराने कामाला सुरुवात केली आणि एके दिवशी महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने काम थांबविण्याचे आदेश दिले. काही व्यक्तींनी या कामाबाबत केंद्रीय पुरातत्व विभागाकडे हरकत दाखल करुन काम थांबविण्यास भाग पाडले. हरकती केल्या नाहीत तोपर्यंत सगळे व्यवस्थित सुरु होते. नंतर मात्र तक्रारी दाखल केल्या. त्यामुळे पुरातत्वच्या सर्वेअरनी जागेची पाहणी केली. त्यांच्यासमाेर कोल्हापुरातील तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी चुकीचे सादरीकरण करुन ब्रम्हपुरी टेकडी या वारसा स्थळापासून शंभर मीटरच्या आत काम होत असल्याची माहिती दिली आणि काम बंद पडण्यास मोठा हातभार लागला.

पुरातत्व विभागाला चुकीची माहिती मिळाल्यामुळे त्यांनी कामात आडकाठी आणली, अशी चर्चा आहे. नंतर महापालिकेच्या नगररचना विभागाने पत्र देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला काम थांबविण्याच्या सूचना दिल्या. पर्यटकांच्या दृष्टीने एक चांगले होणारे काम थांबले. काम का थांबले, कोणी तक्रारी केल्या, त्यातील वस्तूस्थिती काय होती, यावर विचारविनिमय होऊन पुन्हा काही त्यातून मार्ग निघतो का, हे पाहिले पाहिजे.

- नदीघाटावर ही कामे होणार होती -

नदीघाटावर एक जुन्या पद्धतीची भिंत, एक कमान, चार दीपमाळा स्तंभ बांधले जाणार होते. पाथवे केला जाणार होता. लॅन्डस्केपिंग, नदी पात्रातील पायऱ्यांची दुरुस्ती, विरंगुळा केंद्र, बैठक व्यवस्था, विजेची व्यवस्था अशी कामे पहिल्या टप्प्यात केली जाणार होती. तर दुसऱ्या टप्प्यात स्मशानभूमीपर्यंत २८ कोटींची कामे प्रस्तावित होती. एक अप्रतिम पर्यटनस्थळ करण्यात येणार होते.

-शिवाजी पुलाचाच अनुभव -

शिवाजी पुलाला पर्यायी नवीन पूल बांधताना अशीच काही मंडळी आडवी पडली होती. पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झाल्यानंतर पुरातत्व विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. सात-आठ झाडे तोडण्यास व एक पाण्याचा हौद तोडण्यास विरोध करण्यात आला. विघ्नसंतोषी मंडळींच्या विरोधामुळे पुलाचे बांधकाम रखडले. दरम्यानच्या काळात एका वाहनाला अपघात होऊन त्यात १३ व्यक्तींचा मृत्यू झाला. नवीन पूल वेळेत झाला असता तर हा अपघातही टळला असता. आता अशीच मंडळी नदी घाटाच्या कामात आडवी पडली आहेत.

-ब्रम्हपुरी वारसास्थळ नेमके कोठे?

पुरातत्वच्या सर्वेअरसमोर ब्रम्हपुरी टेकडीबाबत झालेले सादरीकरण चुकीचे होते. त्यांची धूळफेक केली गेली, असा दावा काहीजण करतात. जर सादरीकरण चुकीचे झाले असेल आणि त्यामुळे घाट विकासाचे काम बंद पडले असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यात लक्ष देऊन नेमकी वस्तूस्थिती काय आहे, याची माहिती घेतली पाहिजे. मंत्री, खासदार, आमदार यांनीही यात लक्ष घातले पाहिजे. कोणीतरी खोडसाळपणाने कामे थांबवत असेल तर ते योग्य नाही.