शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
6
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
7
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
8
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
9
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
10
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
11
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
12
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
13
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
14
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
16
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
17
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
18
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
19
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
20
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ

चंदूर ग्रामस्थांना पंचगंगेचे दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2017 22:13 IST

ग्रामस्थांचे आरोग्य धाब्यावर : भारत निर्माण पाणीपुरवठा योजना अर्धवट अवस्थेत

अतुल आंबी -- इचलकरंजी --चंदूर (ता. हातकणंगले) येथील भारत निर्माण पाणीपुरवठा योजना अर्धवट अवस्थेत सुरू आहे. प्रकल्प मंजूर होऊन दहा वर्षे उलटली तरी गावभागातील ग्रामस्थांना आजतागायत पंचगंगा नदीतील प्रदूषित पाणी विनाप्रक्रिया थेट प्यावे लागत आहे. राजकीय वाद-विवाद व शासनाकडून मिळणाऱ्या निधीची उदासीनता अशा गोंधळात हा प्रकल्प रखडला आहे. विशेष म्हणजे अशुद्ध पाणी पिऊनही ग्रामस्थांना पाणीपट्टी मात्र शुद्ध पाण्याची भरावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत असून, पेयजल प्रकल्प तत्काळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावा, अशी मागणी होत आहे.पंचगंगा नदीकाठावर असलेल्या चंदूर गावाला गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेमार्फत नदीतील पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नळाद्वारे थेट पुरविले जाते. पंचगंगा नदीचे दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदूषण यामुळे सन २००४ ला केंद्र शासनाकडून गावासाठी तीन कोटी ४६ लाखांची भारत निर्माण पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. मात्र, कागदपत्रांची पूर्तता व निधी उपलब्ध होण्यात चार वर्षे निघून गेली. त्यानंतर सन २००८ ला प्रत्यक्षात काम सुरू झाले. ते आजतागायत पूर्ण झालेच नाही. पहिल्या टप्प्यात गावच्या वाढीव भागात म्हणजेच शाहूनगर, साईनगर, आभार फाटा, माळभाग या परिसरात प्रक्रिया केलेला शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.त्यानंतर गावभागात बिरोबा मंदिरपर्यंत शुद्ध पाणी येण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी गेला. त्यानंतर पुन्हा दोन वर्षांनी ग्रामपंचायत परिसरापर्यंत हा शुद्ध पाणीपुरवठा पोहोचला.त्यानंतरही काही वर्षे उलटली तरी आजतागायत संपूर्ण गावाला शुद्ध पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना आजही पंचगंगा नदीतून येणारे मैलामिश्रित व अशुद्ध पाणीच थेट प्यावे लागत आहे. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी कायद्यात तरतूद असतानाही तो कायदा डावलून चंदूर ग्रामपंचायत गावभागातील ग्रामस्थांना आजही अशुद्ध पाणीपुरवठा करीत आहे. एखाद्या सुजान ग्रामस्थाने याविरोधात न्यायालयात धाव घेतल्यास प्रशासनाची चांगलीच पाचावर धारण बसेल, असेही जाणकारांकडून सांगण्यात आले.एकीकडे अशुद्ध पाणीपुरवठा सुरू असतानाही त्या ग्रामस्थांकडून शुद्ध पाणीपुरवठा नियमानुसार होणारी पाणीपट्टी वसूल केली जात आहे. ग्रामस्थांवर होणारा हा अन्याय ग्रामपंचायतीने तत्काळ बंद करून शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी होत आहे.शासनाकडून निधी मिळण्यास विलंबयोजना सन २००४ साली मंजूर झाली असली तरी सन २०१६ साल उगवले तरी अद्याप शासनाकडून जवळपास सव्वा कोटी रुपये निधी येणे बाकी आहे. योजनेचे काम सुरू झाल्यानंतरही अनेकवेळा निधी मिळण्यास विलंब झाला. त्यावेळी संबंधित मक्तेदाराने स्वखर्चाने काम सुरू ठेवले होते. मात्र, वारंवारच्या विलंबामुळे काम संथगतीने झाले.शुद्ध पेयजल प्रकल्पही बंदचंदूर येथील ग्रामस्थांचा अशुद्ध पाण्यापासून बचाव होण्यासाठी नवमहाराष्ट्र सूतगिरणीच्यावतीने एक रुपयात दहा लिटर शुद्ध पाणी मिळणारा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. अनेक ग्रामस्थ तेथून पाणी नेऊन पित होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून तोही बंद पडला आहे. ग्रामपंचायतीने याकडेही दुर्लक्ष केले आहे.