इचलकरंजी शहर व परिसरात मनीष नागोरी त्याचबरोबर विकास खंडेलवालसह त्याच्या साथीदारांची प्रचंड दहशत आहे. दहशत माजविण्यासह खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, आदींसह विविध गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल आहेत. त्यांचे कारनामे दिवसेंदिवस वाढतच असल्याने टोळीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. कारखानदारासह दिवाणजीचे अपहरण करून खंडणी उकळण्याचा प्रकार घडला. या गुन्ह्यासह इचलकरंजी विभागाचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी विक्या-मन्या टोळीविरोधात ‘मोक्का’अंतर्गत कारवाईचा पहिला प्रस्ताव तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी या प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई केली होती. २०१९ पासून मनीष व विकाससह त्याचे साथीदार कळंबा कारागृहात आहेत.
फोटो नं. ३००५२०२१-कोल-शकील गवंडी (मोक्का)
फोटो नं. ३००५२०२१-कोल-भीम्या चव्हाण (मोक्का)
(यापूर्वी दोन फोटो पाठवले आहेत, तेही घ्यावेत.)
===Photopath===
300521\30kol_6_30052021_5.jpg~300521\30kol_7_30052021_5.jpg
===Caption===
फोटो नं. ३००५२०२१-कोल-शकील गवंडी (मोक्का)फोटो नं. ३००५२०२१-कोल-भिम्या चव्हाण (मोक्का)~फोटो नं. ३००५२०२१-कोल-शकील गवंडी (मोक्का)फोटो नं. ३००५२०२१-कोल-भिम्या चव्हाण (मोक्का)