शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

कडधान्यांचा अनुशेष भरण्यासाठी ‘पॅकेज’

By admin | Updated: July 3, 2015 01:18 IST

मोफत बियाणे : कोल्हापूरसह राज्यातील सात जिल्ह्यांची निवड, बांधावर तूर लागवडीस प्रोत्साहन

भीमगोंडा देसाई - कोल्हापूरराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कडधान्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी कोल्हापूरसह राज्यातील आठ जिल्ह्यांत बांधावर तुरीच्या लागवडीस प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना बियाण्यांचे मोफत पॅकेज दिले जात आहे. आठ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ३७५ क्विंटल तूर बियाणे कृषी विभागातर्फे मोफत दिले जात आहे. याअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात पाच हजार हेक्टरवर तूर लागवडीचे उद्दिष्ट आहे. आंतर पीक म्हणून तूर बियाणे घेतल्यास शेकऱ्यांना फायदा होऊ शकतो, असे कृषी प्रशासनाचे म्हणणे आहे. पश्चिम महाराष्ट्रात मुख्य पीक ऊस आहे. सलग ऊस लागवड होत असल्यामुळे बांधही मोठे नसतात. त्यामुळे कडधान्याचे उत्पादन राज्यात पश्चिम महाराष्ट्रात कमी होते. ते वाढावे म्हणून बांधावरील तूर लागवडीस प्रोत्साहन दिले जात आहे.संयुक्त राष्ट्र संघटनेने २०१६ हे ‘आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने चालू खरीप हंगामासाठी आंतरर पीक म्हणून कडधान्याचे अधिक उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कडधान्याचे उत्पादन कमी होणाऱ्या आठ जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्या जिल्ह्यात भात व अन्य पिकांच्या बांधावर तूर पीक घ्यावे, असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. बांधावर तूर टोकण करण्यासाठी एक हेक्टरसाठी एक किलो बी.एस.एम.आर. ७३६ जातीचे बियाणे, असे प्रमाण कृषी प्रशासनाने निर्धारित केले आहे.बियाणे वाटप सुलभ व्हावे, म्हणून २५० ग्रॅमचे एक पाकीट आहे. कोरडवाहू आणि बागायत क्षेत्रांसाठी तूर फायदेशीर आहे. तिची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे. जास्तीज जास्त शेतकऱ्यांपर्यंत बियाणे पोहोचविण्याचा प्रयत्न कृषी विभाग करीत आहे. बांधावर तूर लागवड केल्याने शेतातील उत्पन्नाबरोबरच बोनस उत्पन्न मिळणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.जिल्ह्यातील उद्दिष्टतालुकानिहाय तूर बियाणांचे वाटप क्विंटलमध्ये असे : हातकणंगले-५० किलो, पन्हाळा-५, शाहूवाडी-७, राधानगरी-६, गगनबावडा-१, करवीर-४, कागल-४, गडहिंग्लज- ४.५०, भुदरगड- ६, आजरा-५, चंदडग-७.जिल्ह्यातील उद्दिष्टतालुकानिहाय तूर बियाणांचे वाटप क्विंटलमध्ये असे : हातकणंगले-५० किलो, पन्हाळा-५, शाहूवाडी-७, राधानगरी-६, गगनबावडा-१, करवीर-४, कागल-४, गडहिंग्लज- ४.५०, भुदरगड- ६, आजरा-५, चंदडग-७.बांधावर तुरीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे दिले जात आहे. ज्या शेतकऱ्यांना तुरीचे बियाणे आवश्यक आहे, त्यांनी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.- मोहन आटोळे,जिल्हा कृषी अधीक्षक