शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

‘के. पीं.’ना नडला अती आत्मविश्वास

By admin | Updated: October 24, 2014 00:16 IST

विरोधक एकत्र : के .पी. हटाव मोहीम यशस्वी

संजय पारकर - राधानगरी -विरोधक कधी एकत्र येऊच शकत नाहीत. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे, अशा फाजील आत्मविश्वासामुळेच गाफील राहिलेल्या के. पी. पाटील यांचा पराभव झाला. ऐनवेळी कॉँग्रेसच्या काही नेत्यांना गळाला लावण्यात यशस्वी होऊनही तरुणाईचा उत्साह व के. पी. हटावसाठी काय पण, ही कॉँग्रेसची खेळी यशस्वी ठरल्याने प्रकाश आबिटकर यांना दुसऱ्या प्रयत्नातच आमदारकी मिळालीे.१९९९ च्या पराभवानंतर २००४ च्या निवडणुकीत तत्कालीन आमदार बजरंग देसाई यांना हटविण्यासाठी काही कॉँग्रेस नेत्यांनी अपक्ष लढलेल्या के. पीं.ना साथ दिली होती. त्यामुळे त्यांचा विजय झाला. पाच वर्षांपूर्वी षट्कोनी लढतीमुळे पुन्हा त्यांचा एकतर्फी विजय झाला. या दोन्ही वेळा विखुरलेले विरोधक हेच प्रमुख कारण त्यांच्या विजयात महत्त्वाचे ठरले होते. एकूण मतदानांपैकी सुमारे ३५ ते ४० टक्के मतदान राष्ट्रवादीला मानणारे होते. विरोधातील मतांची विभागणी झाली असती तर चित्र वेगळे असते.गतवेळी अपक्ष लढून सुमारे ३५ हजार मतांपर्यंत मजल मारणाऱ्या प्रकाश आबिटकर यांना लोकसभा निवडणुकीत अंदाज घेण्याची संधी मिळाली. राष्ट्रवादीच्या मतात कॉँग्रेसची मतेही होती; पण त्याचे श्रेय घेताना राष्ट्रवादीने कॉँग्रेसला बेदखल केले. तेथूनच पुन्हा ठिणगी पडली. शिवसेनेला लोकसभेवेळी मिळालेल्या मतांमध्ये फारशी घट होण्याचे काहीच कारण नसल्याने आबिटकर यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली. येथेच त्यांना निम्मे यश मिळाले होते. दोन महिने निकराचे प्रयत्न करूनही आघाडी तुटल्याने बजरंग देसाई यांना उमेदवारी मिळाली; पण त्यात के. पीं.नाच फायदा होणार हे स्पष्ट होते. शिवाय करवीरमधील खेळीमुळे बजरंग देसाई यांनी माघार घेतली. देसाई व अरुण डोंगळे वगळता कॉँग्रेस नेत्यांनी के. पी. हटावसाठीच आबिटकर यांची पाठराखण केली.पाच वर्षांत २६६ कोटींची कामे केल्याचा दावा के. पीं.कडून ठळकपणे झाला; पण मतदारसंघातील रस्ते व्यवस्थित नाहीत. भोगावती कारखान्याच्या नोकरभरतीचे पडसादही उमटले. ‘बिद्री’ची जादा दर देण्याची खेळी अयशस्वी झाली. शेकाप-जनता दल अशा मित्रपक्षांनी दिलेला पाठिंबा कामी आलेला नाही. सर्वांत जास्त वाताहत झाली ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची. त्यांची अनामत जप्त झाली. गतवेळी राष्ट्रवादीला साथ दिलेल्या आजरा तालुक्याची राजकीय फेरमांडणी झाली. त्यामुळे मोजकी गावे वगळता सर्वत्र एकतर्फी मतदान झाल्याचे स्पष्ट झाले. आजही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या गावांतूनही शिवसेनेला मताधिक्य मिळाले.तरुण आबिटकर यांना नवमतदारांसह तरुणांचा मोठा पाठिंबा मिळाला. परिवर्तन करायचेच, अशा ईर्ष्येने पेटलेल्या तरुणांमध्ये आपला उमेदवार अशी प्रतिमा निर्माण करण्यात यश आल्याने प्रकाश आबिटकर यांना मोठे यश मिळाले. त्यांच्यावर विश्वास टाकलेल्या तरुणाईला अपेक्षित असलेला विकास करण्याचे मोठे शिवधनुष्य ते कसे पेलतात, यावर त्यांची पुढील वाटचाल अवलंबून असणार आहे.