शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

‘के. पीं.’ना नडला अती आत्मविश्वास

By admin | Updated: October 24, 2014 00:16 IST

विरोधक एकत्र : के .पी. हटाव मोहीम यशस्वी

संजय पारकर - राधानगरी -विरोधक कधी एकत्र येऊच शकत नाहीत. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे, अशा फाजील आत्मविश्वासामुळेच गाफील राहिलेल्या के. पी. पाटील यांचा पराभव झाला. ऐनवेळी कॉँग्रेसच्या काही नेत्यांना गळाला लावण्यात यशस्वी होऊनही तरुणाईचा उत्साह व के. पी. हटावसाठी काय पण, ही कॉँग्रेसची खेळी यशस्वी ठरल्याने प्रकाश आबिटकर यांना दुसऱ्या प्रयत्नातच आमदारकी मिळालीे.१९९९ च्या पराभवानंतर २००४ च्या निवडणुकीत तत्कालीन आमदार बजरंग देसाई यांना हटविण्यासाठी काही कॉँग्रेस नेत्यांनी अपक्ष लढलेल्या के. पीं.ना साथ दिली होती. त्यामुळे त्यांचा विजय झाला. पाच वर्षांपूर्वी षट्कोनी लढतीमुळे पुन्हा त्यांचा एकतर्फी विजय झाला. या दोन्ही वेळा विखुरलेले विरोधक हेच प्रमुख कारण त्यांच्या विजयात महत्त्वाचे ठरले होते. एकूण मतदानांपैकी सुमारे ३५ ते ४० टक्के मतदान राष्ट्रवादीला मानणारे होते. विरोधातील मतांची विभागणी झाली असती तर चित्र वेगळे असते.गतवेळी अपक्ष लढून सुमारे ३५ हजार मतांपर्यंत मजल मारणाऱ्या प्रकाश आबिटकर यांना लोकसभा निवडणुकीत अंदाज घेण्याची संधी मिळाली. राष्ट्रवादीच्या मतात कॉँग्रेसची मतेही होती; पण त्याचे श्रेय घेताना राष्ट्रवादीने कॉँग्रेसला बेदखल केले. तेथूनच पुन्हा ठिणगी पडली. शिवसेनेला लोकसभेवेळी मिळालेल्या मतांमध्ये फारशी घट होण्याचे काहीच कारण नसल्याने आबिटकर यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली. येथेच त्यांना निम्मे यश मिळाले होते. दोन महिने निकराचे प्रयत्न करूनही आघाडी तुटल्याने बजरंग देसाई यांना उमेदवारी मिळाली; पण त्यात के. पीं.नाच फायदा होणार हे स्पष्ट होते. शिवाय करवीरमधील खेळीमुळे बजरंग देसाई यांनी माघार घेतली. देसाई व अरुण डोंगळे वगळता कॉँग्रेस नेत्यांनी के. पी. हटावसाठीच आबिटकर यांची पाठराखण केली.पाच वर्षांत २६६ कोटींची कामे केल्याचा दावा के. पीं.कडून ठळकपणे झाला; पण मतदारसंघातील रस्ते व्यवस्थित नाहीत. भोगावती कारखान्याच्या नोकरभरतीचे पडसादही उमटले. ‘बिद्री’ची जादा दर देण्याची खेळी अयशस्वी झाली. शेकाप-जनता दल अशा मित्रपक्षांनी दिलेला पाठिंबा कामी आलेला नाही. सर्वांत जास्त वाताहत झाली ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची. त्यांची अनामत जप्त झाली. गतवेळी राष्ट्रवादीला साथ दिलेल्या आजरा तालुक्याची राजकीय फेरमांडणी झाली. त्यामुळे मोजकी गावे वगळता सर्वत्र एकतर्फी मतदान झाल्याचे स्पष्ट झाले. आजही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या गावांतूनही शिवसेनेला मताधिक्य मिळाले.तरुण आबिटकर यांना नवमतदारांसह तरुणांचा मोठा पाठिंबा मिळाला. परिवर्तन करायचेच, अशा ईर्ष्येने पेटलेल्या तरुणांमध्ये आपला उमेदवार अशी प्रतिमा निर्माण करण्यात यश आल्याने प्रकाश आबिटकर यांना मोठे यश मिळाले. त्यांच्यावर विश्वास टाकलेल्या तरुणाईला अपेक्षित असलेला विकास करण्याचे मोठे शिवधनुष्य ते कसे पेलतात, यावर त्यांची पुढील वाटचाल अवलंबून असणार आहे.