शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘के. पीं.’ना नडला अती आत्मविश्वास

By admin | Updated: October 24, 2014 00:16 IST

विरोधक एकत्र : के .पी. हटाव मोहीम यशस्वी

संजय पारकर - राधानगरी -विरोधक कधी एकत्र येऊच शकत नाहीत. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे, अशा फाजील आत्मविश्वासामुळेच गाफील राहिलेल्या के. पी. पाटील यांचा पराभव झाला. ऐनवेळी कॉँग्रेसच्या काही नेत्यांना गळाला लावण्यात यशस्वी होऊनही तरुणाईचा उत्साह व के. पी. हटावसाठी काय पण, ही कॉँग्रेसची खेळी यशस्वी ठरल्याने प्रकाश आबिटकर यांना दुसऱ्या प्रयत्नातच आमदारकी मिळालीे.१९९९ च्या पराभवानंतर २००४ च्या निवडणुकीत तत्कालीन आमदार बजरंग देसाई यांना हटविण्यासाठी काही कॉँग्रेस नेत्यांनी अपक्ष लढलेल्या के. पीं.ना साथ दिली होती. त्यामुळे त्यांचा विजय झाला. पाच वर्षांपूर्वी षट्कोनी लढतीमुळे पुन्हा त्यांचा एकतर्फी विजय झाला. या दोन्ही वेळा विखुरलेले विरोधक हेच प्रमुख कारण त्यांच्या विजयात महत्त्वाचे ठरले होते. एकूण मतदानांपैकी सुमारे ३५ ते ४० टक्के मतदान राष्ट्रवादीला मानणारे होते. विरोधातील मतांची विभागणी झाली असती तर चित्र वेगळे असते.गतवेळी अपक्ष लढून सुमारे ३५ हजार मतांपर्यंत मजल मारणाऱ्या प्रकाश आबिटकर यांना लोकसभा निवडणुकीत अंदाज घेण्याची संधी मिळाली. राष्ट्रवादीच्या मतात कॉँग्रेसची मतेही होती; पण त्याचे श्रेय घेताना राष्ट्रवादीने कॉँग्रेसला बेदखल केले. तेथूनच पुन्हा ठिणगी पडली. शिवसेनेला लोकसभेवेळी मिळालेल्या मतांमध्ये फारशी घट होण्याचे काहीच कारण नसल्याने आबिटकर यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली. येथेच त्यांना निम्मे यश मिळाले होते. दोन महिने निकराचे प्रयत्न करूनही आघाडी तुटल्याने बजरंग देसाई यांना उमेदवारी मिळाली; पण त्यात के. पीं.नाच फायदा होणार हे स्पष्ट होते. शिवाय करवीरमधील खेळीमुळे बजरंग देसाई यांनी माघार घेतली. देसाई व अरुण डोंगळे वगळता कॉँग्रेस नेत्यांनी के. पी. हटावसाठीच आबिटकर यांची पाठराखण केली.पाच वर्षांत २६६ कोटींची कामे केल्याचा दावा के. पीं.कडून ठळकपणे झाला; पण मतदारसंघातील रस्ते व्यवस्थित नाहीत. भोगावती कारखान्याच्या नोकरभरतीचे पडसादही उमटले. ‘बिद्री’ची जादा दर देण्याची खेळी अयशस्वी झाली. शेकाप-जनता दल अशा मित्रपक्षांनी दिलेला पाठिंबा कामी आलेला नाही. सर्वांत जास्त वाताहत झाली ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची. त्यांची अनामत जप्त झाली. गतवेळी राष्ट्रवादीला साथ दिलेल्या आजरा तालुक्याची राजकीय फेरमांडणी झाली. त्यामुळे मोजकी गावे वगळता सर्वत्र एकतर्फी मतदान झाल्याचे स्पष्ट झाले. आजही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या गावांतूनही शिवसेनेला मताधिक्य मिळाले.तरुण आबिटकर यांना नवमतदारांसह तरुणांचा मोठा पाठिंबा मिळाला. परिवर्तन करायचेच, अशा ईर्ष्येने पेटलेल्या तरुणांमध्ये आपला उमेदवार अशी प्रतिमा निर्माण करण्यात यश आल्याने प्रकाश आबिटकर यांना मोठे यश मिळाले. त्यांच्यावर विश्वास टाकलेल्या तरुणाईला अपेक्षित असलेला विकास करण्याचे मोठे शिवधनुष्य ते कसे पेलतात, यावर त्यांची पुढील वाटचाल अवलंबून असणार आहे.