शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

‘पी. एम. किसान’च्या बोगस ८१०० खातेदारांवर कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:29 IST

राजाराम लोंढे, लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पी. एम. किसान योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील १६७०० बोगस खातेदारांपैकी अद्याप ...

राजाराम लोंढे, लाेकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पी. एम. किसान योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील १६७०० बोगस खातेदारांपैकी अद्याप ८१०० खातेदार हे योजनेचा लाभ घेत आहेत. शासनाने मुदत देऊनही त्यांनी लाभाची रक्कम परत न केल्याने संबंधितांवर थेट कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने खातेदार शेतकऱ्यांसाठी ‘पी. एम. किसान’ योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून महिन्याला पाचशे असे चार महिन्यांचे दोन हजार रुपये वर्षातून तीन हप्त्यांत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात. मात्र यामध्ये आयकर परतावा करणारे, शासकीय कर्मचारी, शिक्षक, आदींनी लाभ घेतल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. कोल्हापूर जिल्ह्यात १६७०० खातेदार हे बोगस असल्याचे चौकशीत उघड झाले होते. संबंधितांना नोटिसा काढून लाभ घेतलेली रक्कम जमा करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. त्यासाठी तहसीलदार कार्यालयाच्या वतीने बँकेचा खाते क्रमांक सुरू करून त्यामध्ये लाभ घेतलेली रक्कम भरण्याबाबत सूचना केली होती. मात्र ८६०० बोगस लाभार्थ्यांनी पैसे परत केले व लाभ घेण्याचे बंद केले. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी लावून वर्ष होत आले आहे.

हा घोटाळा संपूर्ण देशात झाला असून त्याची व्याप्ती खूपच मोठी आहे. याबाबत लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी बोगस लाभ घेणाऱ्यांवर कारवाईचे आदेश राज्यांना दिले होते. राज्य शासनाने वसुलीची कारवाई तातडीने करण्याचे आदेश जिल्हा पातळीवर दिले असून तिची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंडल कृषी अधिकारी व तलाठ्यांची बैठक घेऊन संबंधितांना वसुलीच्या सूचना दिल्या आहेत. जे पैसे भरणार नाहीत, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

बॅकांच्या पातळीवर कारवाईची चाचपणी

पी. एम. किसान योजनेची बहुतांशी खाती ही जिल्हा बँकेत आहेत. त्यामुळे बँकेच्या पातळीवर संबधित खात्यांची पडताळणी करून पेन्शनचे पैसे थांबवले जाऊ शकतात का, याविषयी चाचपणी करण्यात आली. मात्र शासनाने मंजूर करून दिलेल्या पेन्शनचे पैसे न देण्याचा अधिकार बँकांना नसल्याने हा पर्याय मागे पडला.

तलाठी, ग्रामसेवकांना जबाबदार धरणार

बोगस खातेदारांकडून वसुलीची जबाबदारी तलाठी, मंडल कृषी अधिकारी व ग्रामसेवकांवर सोपवली आहे. जे पैसे भरणार नाहीत, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश तिघांना दिले आहेत. यामध्ये हयगय केल्यास तिघांना जबाबदार धरले जाणार आहे.