शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

पडद्यामागील ‘हाता’ने ‘पी. एन.’ यांचा विजय सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 11:39 IST

मागील दोन पराभवामुळे यावेळची निवडणूक पाटील यांच्यासाठी अस्तित्वाची होती; त्यामुळे ‘यंदा साहेबच’ ही टॅगलाईन घेऊन कार्यकर्त्यांनीच निवडणूक हातात घेतली होती.

ठळक मुद्देपराभव खंडित करत पी. एन. पाटील यांना विजयी गुलाल लागण्यात या टीमचे योगदान फार मोठे आहे.

कोल्हापूर : कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी ‘करवीर’मधून दणदणीत विजय संपादन केला. यामागे त्यांच्यासह कुटुंबाचे कष्ट आहेच; पण गेली दोन महिने पडद्यामागील जोडण्या लावत, त्या यशस्वी करून पाटील यांना गुलाल लावण्यापर्यंत राबणारे ‘हात’ अनेक आहेत. यामध्ये प्रामुख्याने ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, ‘करवीर’चे सभापती राजेंद्र सूर्यवंशी, भारत पाटील-भुयेकर, अ‍ॅड. शाहू काटकर, बाळासाहेब मोळे, जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील या प्रमुखांचा उल्लेख करावाच लागेल. ‘यंदा साहेबच’ ही टॅगलाईन हातात घेत कार्यकर्त्यांनीच निवडणूक हातात घेतली आणि विजयश्री खेचून आणला.

राजकारणात यशस्वी व्हायचे असल्यास कुटुंबाची भक्कम साथ लागते, त्याचबरोबर विश्वासू कार्यकर्त्यांची ताकदही महत्त्वाची असते. पी. एन. पाटील यांनी आतापर्यंत विधानसभेच्या सहा निवडणुका लढविल्या; पण त्यांच्या भोवतीच्या कार्यकर्त्यांचे मोहोळ कधी कमी झाले नाही. कार्यकर्त्यांसाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असते; त्यामुळेच कार्यकर्तेही त्यांच्यासाठी जीवावर उदार होऊन मैदानात उतरतात. मागील दोन पराभवामुळे यावेळची निवडणूक पाटील यांच्यासाठी अस्तित्वाची होती; त्यामुळे ‘यंदा साहेबच’ ही टॅगलाईन घेऊन कार्यकर्त्यांनीच निवडणूक हातात घेतली होती. गेली तीन-चार महिने ‘गोकुळ’चे संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे व त्यांच्या टीमने अतिशय नियोजनबद्धरीत्या बांधणी केली.

विश्वास पाटील यांचा गेली ३0 वर्षे ‘गोकुळ’च्या माध्यमातून मतदारसंघात संपर्क आहे; त्यामुळे कोणता गट जवळ येऊ शकतो; त्यासाठी कोणत्या क्लृप्त्या वापरल्या पाहिजेत, याचा ठोकताळा त्यांच्याकडे होता. महिला मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी वातावरण निर्मितीस सुरुवात केली. विरोधकांच्या आरोपाबरोबरच डाव प्रतिडावावर त्याच ताकदीने प्रहार करण्याची रणनीती त्यांच्या टीमने अतिशय चाणाक्षपणे हाताळली. महिनाभर तर घरदार सोडून अतिशय आक्रमकपणे प्रचारयंत्रणा यशस्वी केली. पराभव खंडित करत पी. एन. पाटील यांना विजयी गुलाल लागण्यात या टीमचे योगदान फार मोठे आहे. 

जनतेमधूनच मोठा उठाव होता, आमदार पी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचारयंत्रणा दिवसेंदिवस गतिमान करत गेलो. विशेष म्हणजे गावागावांतील कार्यकर्त्याने जीवाचे रान केल्याने मोठे मताधिक्य मिळाले.- विश्वास पाटील (संचालक, ‘गोकुळ’) 

 

टॅग्स :karvir-acकरवीरElectionनिवडणूकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019