शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

संकटांवर मात करीत अखेर ‘आयईएस’ बनला

By admin | Updated: September 17, 2014 23:42 IST

इच्छाशक्ती अन् जिद्दीने घडविले : भविष्यात तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणार

शिवाजी सावंत - गारगोटी -‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ या काव्यपंक्तीची यथार्थता पटते ती टिक्केवाडी (ता. भुदरगड) येथील सुनील आसबे याने ‘आयइएस’ परीक्षेत देशात ७८वा येऊन पात्रता सिद्ध केलेली पाहिली की, एकदा मनाने आत्मविश्वासपूर्वक ध्येय ठरवले की, तेथे परिस्थितीची कुबडी निखळून पडते, हे प्रत्ययास येते.भुदरगड तालुक्यातील डोंगरमाथ्यावर वसलेल्या टिक्केवाडी या खेडेगावातील मधुकर आसबे हे गरीब शेतकरी. त्यांना एक मुलगा व दोन मुली. थोरला मुलगा सुनील या निसर्गधर्माप्रमाणे वाढत होता. तो इतर मुलांबरोबर गावातील प्राथमिक शाळेत जाऊ लागला. लहानपणी शाळेत एक ‘एमपीएससी’चे अधिकारी आले असता त्यांनी शाळेत मुलांना प्रश्नपत्रिकेविषयी सांगितले. सुनीलने ते प्रश्न तातडीने सोडविले, तेव्हा त्याच्या मनात अधिकारी होण्याचे ‘बीज’ रोवले गेले. सुनील पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात आला. त्याला अधिकारी व्हायचे होते. मात्र, मधुकर आसबे यांना आर्थिक स्थितीबाबत काय करायचे, हा प्रश्न पडला. व्यवसाय करावा तर भांडवल नव्हते, म्हणून त्यांनी ‘एलआयसी’चा एजंट म्हणून बिनभांडवली व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात जम बसवत असतानाच सुनीलचे प्राथमिक शिक्षण संपत आले होते. विविध स्पर्धा परीक्षा, चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धेत सुनील अव्वल येऊन नाव कमवित होता. त्यामुळे वडिलांचाही हुरूप वाढत होता. त्याने माध्यमिक शिक्षणासाठी गारगोटी येथील शाहू कुमार भवनमध्ये प्रवेश घेतला. तेथे विज्ञान शाखेतून बारावी पूर्ण केल्यानंतर औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. गुणानुक्रमाने तेथे आलेले प्रतिनिधिपद नाकारले, तर शेवटच्या वर्षी ते स्वीकारले. पहिल्या वर्षापासून वर्गात पहिला येण्याचा मान त्याने हुकू दिला नाही. शेवटच्या वर्षी १० ग्रेडपैकी ९.९ ग्रेड मिळवून अभियांत्रिकी विश्वात एक वेगळा विक्रम केला. ध्येयवेड्या सुनीलने ‘यूपीएससी’मध्ये इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसची निवड केली. तिथेही पहिल्यांदा यश मिळाले. मात्र, त्यामधून डॉ. होमी भाभा अणुशक्ती केंद्रात मिळालेली संशोधकाची नोकरी स्वीकारली नाही. नंतर ‘एमपीएससी’मधून मिळालेली जलसंपदा विभागातील इंजिनिअरची निवडही नाकारली. ‘यूपीएससी’च्या परीक्षेत तो दोनवेळा अपात्र ठरला. मात्र, अपयशाने न खचता त्याचा अभ्यास व प्रयत्न सुरूच होते. अखेर चौथ्या प्रयत्नात त्याची ‘आयईएस आॅर्डनन्स फॅक्टरी बोर्ड डिपार्टमेंट आॅफ डिफेन्स प्रॉडक्शन, संरक्षण मंत्रालय’ येथे निवड झाली. या परीक्षेत एकूण १५४ विद्यार्थी पास झाले. त्यामध्ये तो ७८ वा, तर महाराष्ट्रातील पाच विद्यार्थ्यांत तो तिसरा आहे.घरच्या गरिबीवर मात करीत जिद्द, चिकाटी, सातत्य, तसेच आई-वडील, शिक्षक नामदेव गुरव, एन. डी. पाटील, जी. के. पाटील, बाळकाका देसाई व माजी आमदार बजरंग देसाई यांचे मार्गदर्शन घडले. भविष्यात तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणार, कारण मला इथवर पोहोचताना मार्गदर्शक नव्हता. त्यामुळे मी चाचपडत गेलो; पण तालुक्यातील भावी पिढीसाठी मार्गदर्शन करून समाजाचे ऋण फेडणार आहे. - सुनील आसबे