शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

संकटांवर मात करीत अखेर ‘आयईएस’ बनला

By admin | Updated: September 17, 2014 23:42 IST

इच्छाशक्ती अन् जिद्दीने घडविले : भविष्यात तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणार

शिवाजी सावंत - गारगोटी -‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ या काव्यपंक्तीची यथार्थता पटते ती टिक्केवाडी (ता. भुदरगड) येथील सुनील आसबे याने ‘आयइएस’ परीक्षेत देशात ७८वा येऊन पात्रता सिद्ध केलेली पाहिली की, एकदा मनाने आत्मविश्वासपूर्वक ध्येय ठरवले की, तेथे परिस्थितीची कुबडी निखळून पडते, हे प्रत्ययास येते.भुदरगड तालुक्यातील डोंगरमाथ्यावर वसलेल्या टिक्केवाडी या खेडेगावातील मधुकर आसबे हे गरीब शेतकरी. त्यांना एक मुलगा व दोन मुली. थोरला मुलगा सुनील या निसर्गधर्माप्रमाणे वाढत होता. तो इतर मुलांबरोबर गावातील प्राथमिक शाळेत जाऊ लागला. लहानपणी शाळेत एक ‘एमपीएससी’चे अधिकारी आले असता त्यांनी शाळेत मुलांना प्रश्नपत्रिकेविषयी सांगितले. सुनीलने ते प्रश्न तातडीने सोडविले, तेव्हा त्याच्या मनात अधिकारी होण्याचे ‘बीज’ रोवले गेले. सुनील पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात आला. त्याला अधिकारी व्हायचे होते. मात्र, मधुकर आसबे यांना आर्थिक स्थितीबाबत काय करायचे, हा प्रश्न पडला. व्यवसाय करावा तर भांडवल नव्हते, म्हणून त्यांनी ‘एलआयसी’चा एजंट म्हणून बिनभांडवली व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात जम बसवत असतानाच सुनीलचे प्राथमिक शिक्षण संपत आले होते. विविध स्पर्धा परीक्षा, चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धेत सुनील अव्वल येऊन नाव कमवित होता. त्यामुळे वडिलांचाही हुरूप वाढत होता. त्याने माध्यमिक शिक्षणासाठी गारगोटी येथील शाहू कुमार भवनमध्ये प्रवेश घेतला. तेथे विज्ञान शाखेतून बारावी पूर्ण केल्यानंतर औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. गुणानुक्रमाने तेथे आलेले प्रतिनिधिपद नाकारले, तर शेवटच्या वर्षी ते स्वीकारले. पहिल्या वर्षापासून वर्गात पहिला येण्याचा मान त्याने हुकू दिला नाही. शेवटच्या वर्षी १० ग्रेडपैकी ९.९ ग्रेड मिळवून अभियांत्रिकी विश्वात एक वेगळा विक्रम केला. ध्येयवेड्या सुनीलने ‘यूपीएससी’मध्ये इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसची निवड केली. तिथेही पहिल्यांदा यश मिळाले. मात्र, त्यामधून डॉ. होमी भाभा अणुशक्ती केंद्रात मिळालेली संशोधकाची नोकरी स्वीकारली नाही. नंतर ‘एमपीएससी’मधून मिळालेली जलसंपदा विभागातील इंजिनिअरची निवडही नाकारली. ‘यूपीएससी’च्या परीक्षेत तो दोनवेळा अपात्र ठरला. मात्र, अपयशाने न खचता त्याचा अभ्यास व प्रयत्न सुरूच होते. अखेर चौथ्या प्रयत्नात त्याची ‘आयईएस आॅर्डनन्स फॅक्टरी बोर्ड डिपार्टमेंट आॅफ डिफेन्स प्रॉडक्शन, संरक्षण मंत्रालय’ येथे निवड झाली. या परीक्षेत एकूण १५४ विद्यार्थी पास झाले. त्यामध्ये तो ७८ वा, तर महाराष्ट्रातील पाच विद्यार्थ्यांत तो तिसरा आहे.घरच्या गरिबीवर मात करीत जिद्द, चिकाटी, सातत्य, तसेच आई-वडील, शिक्षक नामदेव गुरव, एन. डी. पाटील, जी. के. पाटील, बाळकाका देसाई व माजी आमदार बजरंग देसाई यांचे मार्गदर्शन घडले. भविष्यात तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणार, कारण मला इथवर पोहोचताना मार्गदर्शक नव्हता. त्यामुळे मी चाचपडत गेलो; पण तालुक्यातील भावी पिढीसाठी मार्गदर्शन करून समाजाचे ऋण फेडणार आहे. - सुनील आसबे