शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्यातील १६ हजार शिक्षकांचे पगार थकले शिक्षण विभागाचा कारभार : आॅनलाईन देयके प्रणालीचा घोळ; सहा महिन्यांपासून शिक्षक मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:03 IST

कोल्हापूर : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या आॅनलाईन देयके प्रणालीचा घोळ सुरू असल्याने राज्यभरातील १६ हजार माध्यमिक शिक्षकांचा पगार किमान सहा

कोल्हापूर : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या आॅनलाईन देयके प्रणालीचा घोळ सुरू असल्याने राज्यभरातील १६ हजार माध्यमिक शिक्षकांचा पगार किमान सहा महिन्यांपासून थकीत आहे. कोल्हापूरसह काही जिल्ह्यांत

११ महिन्यांचे पगार थकले आहेत. त्यामुळे शिक्षक चांगलेच मेटाकुटीला आले आहेत. हा पगार मिळण्यास मार्च उजाडेल, असे ‘पे युनिट’चे अधीक्षक शंकरराव मोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.राज्य शासनाकडून ‘प्लॅन’ व ‘नॉन प्लॅन’मधील शाळांतील शिक्षकांचा पगार वेगळा वेगळा होतो. या शिक्षकांना सरासरी प्रत्येकी ४० हजार रुपये पगार आहे. प्लॅनमधील अनुदानित शाळांचा पगार आजपर्यंत प्रत्येक महिन्यांत ६ ते ८ तारखेपर्यंत होत होता; परंतु शालार्थ आॅनलाईन सॉफ्टवेअर प्रणाली उपलब्ध करून देणारी एजन्सी शासनाने बदलली आहे.

आता तर गेल्या १० जानेवारीपासून ही प्रणालीच बंद आहे. त्याशिवाय यासाठी शासनाने निधीही उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे हा पगार थकला आहे. एक-दोन महिन्यांचा पगार थकल्यास काहीतरी व्यवस्था करणे शक्य होते; परंतु इतक्या महिन्याचा पगार थकल्यामुळे शिक्षक चांगलेच मेटाकुटीला आले आहेत.दर महिन्याचे विमा, गृहकर्ज व इतर मासिक खर्च भागवताना त्यांच्या नाकात दम येऊ लागला आहे. काहींनी सोने तारण कर्जावर पैसे उचलले आहेत. त्यांच्याही मागे सराफांकडून तगादा सुरू झालाआहे.कोल्हापुरात जून २०१७ चे पगार बिल २६ डिसेंबरला पे युनिटला जमा केले आहे; परंतु ते देखील अद्याप मंजूर झालेले नाही.याबाबत अधीक्षक मोरे यांनी सांगितले की, ‘आॅनलाईन वेतन देयके मंजूर करण्यात अडचणी येत असल्याने पगार थकीत आहे, शिवाय निधीही अजून उपलब्ध झालेला नाही. आमच्या पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.’कमिशनसाठी विलंब : शिक्षकांची तक्रारपगार थकला की शिक्षकांची कुतरओढ होते; परंतु हीच काही अधिकाºयांसाठी कमाईची संधी असल्याची तक्रार काही शिक्षकांनी केली. थकीत पगाराचे अमूक एवढी रक्कम तुम्हाला आता एकदम मिळणार आहे तर त्यातील दहा टक्के आम्हाला द्या, असा दर काढला जातो. काहीवेळा ही टक्केवारी मिळत नाही म्हणूनही पगार थकीत ठेवला जात असल्याच्या तक्रारी आहेत. ही साखळी कोल्हापूरपासून पुणे कार्यालयापर्यंत मजबूत आहे. काही अधिकाºयांची शिक्षकांच्या पगाराला मगरमिठ्ठीच पडल्याची चर्चा शिक्षकांत आहे. 

शिक्षकांचा पगार शासनाच्या चुकीमुळेच थकीत राहतो आणि थकीत पगार मंजुरीसाठी शिक्षण संचालकांची परवानगी घ्यावी, असा आदेश शासनाने १५ जुलै २०१७ ला काढला आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी हे शासनाचेच प्रतिनिधी असताना पुन्हा संचालकांची परवानगी घ्यायची गरज काय?- राजेश वरक अध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघ