शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक!, वर्षात दीड हजारांवर आत्महत्या, कोल्हापूर जिल्ह्यात चिंताजनक स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:01 IST

बेरोजगारी, अपेक्षाभंग, व्यसनाधिनता, दुर्धर आजार, आर्थिक चणचण आणि अपयशाने खचून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले

उद्धव गोडसेकोल्हापूर : बेरोजगारी, अपेक्षाभंग, व्यसनाधिनता, दुर्धर आजार, आर्थिक चणचण आणि अपयशाने खचून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात १५१० जणांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याची नोंद पोलिस ठाण्यांमध्ये झाली. विशेष म्हणजे यात २० ते ४० वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. सहज उठून जीवन संपवण्याची वृत्ती वाढल्याने मरण स्वस्त झाल्याचे दिसत आहे. मात्र, यावर कुटुंब, समाज आणि सरकारलाही वेळीच उपाययोजना कराव्या लागतील, असे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.दगड, विटा भरलेली सॅक पाठीवर बांधून जयसिंगपूरमधील एका डॉक्टरने राजाराम तलावात उडी घेतली. गोव्यातून आलेल्या गर्भवती महिलेने रंकाळ्यात उडी घेऊन जीवन संपवले. या दोन्ही घटना शनिवारी (दि. १३) सकाळी उघडकीस आल्या. दोन्ही घटनांमधील व्यक्ती सुशिक्षित होत्या. स्वतंत्र आणि साधकबाधक विचार करू शकणाऱ्या होत्या, तरीही त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारून जीवन संपवले. चार दिवसांपूर्वी कसबा बावडा येथे एका शेतकऱ्याने गळफास घेतला. गंगावेशीत एका वृद्धाने राहत्या अपार्टमेंटवरून उडी घेऊन स्वत:ला संपवले, तर पन्हाळा तालुक्यातील माजगाव येथे ८२ वर्षीय वृद्धाने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली.या काही प्रातिनिधिक घटनांवरून वाढत्या आत्महत्यांची समस्या स्पष्ट होते. शालेय मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना जीवनातील संघर्ष नकोसा झाल्याचे दिसत आहे. आत्महत्या करण्यासाठी क्षुल्लक कारणेही पुरेशी ठरत आहेत. परीक्षेत कमी गुण मिळाले किंवा अभ्यासाच्या भीती, स्पर्धा परीक्षांमध्ये मिळालेले अपयश, अपेक्षाभंग, आर्थिक अडचणी, कौटुंबिक वाद, व्यसनाधिनता आणि वाढते मानसिक तणाव आत्महत्यांना कारणीभूत ठरत असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.संवादाचा अभावसोशल मीडियातून आभासी संवादाची साधने वाढली तरी प्रत्यक्षात कुटुंब, नातेवाईक, मित्रांसोबत संवाद कमी झाला आहे. विशेषत: घरात मुलं आई-वडिलांशी मोकळेपणाने बोलत नाहीत. यातून मनाची घुसमट वाढते. त्यामुळे संकट काळात आत्महत्येची प्रवृत्ती वाढते, असे तज्ज्ञांचे मत आहे.गांभीर्याचा अभावगळफास, तणनाशक प्राशन करणे, स्वत:ला पेटवून घेणे, नदीत किंवा तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्यानंतर बहुतांश वेळा आकस्मिक मृत्यू अशी नोंद पोलिसांच्या कागदोपत्री होते. आत्महत्यांची नेमकी आकडेवारी स्पष्ट होत नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणांकडून ही समस्या गांभीर्याने घेतली जात नसल्याचे दिसत आहे.

गेल्या चार वर्षांत ६,२७७ आत्महत्यावर्ष - आत्महत्या२०२२ - १,६४४२०२३ - १,५१३२०२४ - १,६१०२०२५ - १,५१०

निराशावादी दृष्टिकोन, अपयश पचवता न येणे, कुटुंबातील कमी झालेला संवाद आणि वाढती स्पर्धा यामुळे तरुणांमधील आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. ही समस्या आणखी तीव्र होण्यापूर्वीच यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. - कालिदास पाटील - मानसोपचार तज्ज्

English
हिंदी सारांश
Web Title : Alarming: Over 1500 Suicides in Kolhapur District This Year

Web Summary : Kolhapur faces a suicide crisis, with over 1510 deaths reported this year, predominantly among young adults. Reasons include unemployment, despair, addiction, and financial struggles. Experts emphasize the need for urgent family, societal, and governmental intervention to address this alarming trend.