शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

पंचगंगेसह सर्वच नद्या पात्राबाहेर, गगनबावड्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 18:21 IST

: कोल्हापूर शहरात रिपरिप असली तरी डोंगरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस बरसत आहे. गगनबावड्यात अतिवृष्टी झाली असून राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले झाले आहेत. त्यातून ८५४० क्युसेक विसर्ग सुरू आहे. सर्वच धरणे ओसंडून वाहत असून, विसर्ग वाढल्याने पंचगंगेसह सर्वच नद्या पात्राबाहेरून वाहत आहेत.

ठळक मुद्देपंचगंगेसह सर्वच नद्या पात्राबाहेर, गगनबावड्यात अतिवृष्टी‘राधानगरी’चे पाच दरवाजे खुले, ४२ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रिपरिप असली तरी डोंगरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस बरसत आहे. गगनबावड्यात अतिवृष्टी झाली असून राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले झाले आहेत. त्यातून ८५४० क्युसेक विसर्ग सुरू आहे. सर्वच धरणे ओसंडून वाहत असून, विसर्ग वाढल्याने पंचगंगेसह सर्वच नद्या पात्राबाहेरून वाहत आहेत.

गेल्या महिन्याभरात तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडलेल्या पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत एका दिवसात तब्बल आठ फुटांनी वाढ झाली आहे. राजाराम बंधाऱ्याजवळ सायंकाळी ती ३० फुटांवर पोहोचली आहे. ४२ बंधारे पाण्याखाली गेले असून दोन राज्यमार्ग आणि पाच जिल्हा मार्ग वाहतुकीस बंद झाले आहेत. नृसिंहवाडीतील दत्तमंदिरात पुन्हा पाणी आले आहे.शिरोळ, हातकणंगले वगळता जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर शहरात सकाळपासून पावसाची उघडझाप राहिली. सायंकाळी पुन्हा त्याचा जोर वाढू लागला. जिल्ह्यात विशेषत: गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा या तालुक्यांत तुफानी पाऊस सुरू आहे.

कागल, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, गडहिंग्लजमध्ये जोर नसला तरी पावसात सातत्य आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदविलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ४७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गगनबावड्यात सर्वाधिक १४२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तेथे अतिवृष्टी झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.दरम्यान, पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणाचा सातव्या क्रमांकाचा दरवाजा गुरुवारी दुपारी खुला झाला. खुले झालेल्या दरवाजांची संख्या पाच झाली आहे. सातपैकी पाच दरवाजातून आठ हजार ५४० क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. हीच परिस्थिती अन्य धरणांचीही आहे.

जिल्ह्यातील सर्वच धरणे काठोकाठ भरली असल्याने त्यातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. वारणेतून ११ हजार ७०३, काळम्मावाडी धरणातून १५ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. कासारीतून १२००, पाटगावमधून १८७४, कुंभीतून १४००, तुळशीतून ११०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोयनेतून ८७ हजार, अलमट्टीतून एक लाख नऊ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.पाणीपातळीत वेगाने वाढबुधवारी (दि. ४) सायंकाळी पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणीपातळी २२ फुटांवर होती. ती गुरुवारी सायंकाळपर्यंत ३० फुटांवर पोहोचली आहे. एका दिवसात पाणीपातळीत तब्बल आठ फुटांनी वाढ झाली आहे. पाणी वेगाने वाढत असून पाण्याखाली जाणाऱ्या बंधाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. ती संख्या काल १६ होती, आज ती ४२ वर पोहोचली आहे.सोमवारपर्यंत अतिवृष्टीचा इशाराभारतीय हवामान खात्याने ५ ते ९ आॅगस्ट या काळात कोल्हापूर, साताऱ्यासह घाटमाथ्यावर अतिवृष्टी होईल, असा अंदाज वर्तविला आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर