शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

..अन्यथा वाहन जप्तीची कारवाई अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : संचारबंदीच्या काळात प्रशासनाने दोन दिवस नागरिकांना सहकार्याची भावना ठेवली होती. मात्र, अनेकजण गरज ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : संचारबंदीच्या काळात प्रशासनाने दोन दिवस नागरिकांना सहकार्याची भावना ठेवली होती. मात्र, अनेकजण गरज नसताना बाहेर फिरत असल्याचे चित्र पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. त्यामुळे कोरोनाचे आलेले संकट थोपविण्यासाठी विनाकारण फिरणाऱ्यांवर वाहन जप्तीची कारवाई अटळ आहे. राज्य शासनाने जी नियमावली घालून दिली आहे. त्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी केले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये राज्य शासनाने काही निर्बंध लादले आहेत. कोल्हापूर शहरातही या संचारबंदीची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, दोन दिवसांमध्ये प्रशासनाने सहकार्याची भावना ठेवून या संचारबंदीत काम केले. मात्र, शहरातील गर्दी कमी होत नसल्यामुळे शुक्रवारी पोलिसांनी कारवाईची धडक मोहीम राबविली. यात एक लाख रुपयांचा दंड वसूल केला. आलेले संकट थोपविण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलावी लागत आहेत. त्यामुळे आता विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई अटळ असून, जे लोक विनाकारण फिरतील त्यांच्यावर वाहन जप्तीची कारवाई केली जाईल. कारण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने जी नियमावली घालून दिली आहे. त्याचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.