शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

..अन्यथा पन्हाळ्याचा पाणीपुरवठा बंद करू

By admin | Updated: October 16, 2015 22:22 IST

जीवन प्राधिकरणाचा नगरपालिकेला इशारा : पाणीपुरवठ्यासाठी नगरपालिकेने कर्मचारी उपलब्ध करावेत; याप्रश्नी नगरपालिकेची विशेष सभा

पन्हाळा : पन्हाळा नळ पाणीपुरवठा योजनेसाठी कमी पडणारे कर्मचारी नगरपरिषदेने उपलब्ध करून द्यावेत. ते न दिल्यास १ नोव्हेंबरपासून पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा जीवन प्राधिकरणने पन्हाळा नगरपरिषदेस पत्र पाठवून दिल्याचे नगराध्यक्ष असिफ मोकाशी यांनी सांगितले. तसेच याप्रश्नी नगरपालिकेने २१ आॅक्टोबरला विशेष सभा आयोजित केली आहे.पन्हाळा शहर आणि पन्हाळ्यावर येणारे पर्यटक यांचा विचार करून १९८० साली सध्या वापरात असलेली पाणीपुरवठा योजना शासनाने सुरू केली. कासारी नदीवरून पाच टप्प्यांत पाणी खेचून पन्हाळा शहरासाठी पाणीपुरवठा केला जातो. या सर्व टप्प्यांत शासनाचे पंधरा कर्मचारी, दोन ज्युनिअर इंजिनिअर, एक मुख्य इंजिनिअर व चार प्लंबर, असे २२ कर्मचारी या योजनेवर काम करीत होते. पन्हाळा शहरात या पाणी योजनेवर केवळ ७०० कनेक्शनधारक झाल्याने ही पाणीपुरवठा योजना सुरुवातीपासूनच तोट्याची निघाली.तोट्यात चाललेल्या या योजनेचे बरेच वरिष्ठ व कनिष्ठ कर्मचारी दुसऱ्या पाणी योजनेकडे वर्ग केले व केवळ १५ कर्मचारी शिफ्टनुसार काम करू लागले. या योजनेत सलग १८ तास पंपिंग झाले तरच पन्हाळावासीयांना पाणी केवळ एक तास मिळू शकते; पण वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित स्वरूपात होऊ लागला. शेतीसाठी पाणी खेचणारे शेतकरी यांच्यासाठी सिंगल फेज पद्धतीचा अवलंब. यामुळे गेल्या दहा वर्षांपासून पन्हाळावासीयांना एक दिवसा आड ३० मिनिटे पाणी मिळू लागले. यासाठी नगरपरिषदेने पाठपुरावा करून विनय कोरे यांच्या फंडातून १४ लाख रुपये वीज कंपनीला पन्हाळा ते आसुर्ले जॅकवेलपर्यंत स्वतंत्र वीज मिळावी म्हणून भरले. तथापि, आजअखेर या कंपनीने हे काम केलेले नाही.३५ वर्षांपूर्वीची ही गळकी, वारंवार बंद पडणारी योजना नगरपरिषदेच्या माथी मारण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. तथापि, नगराध्यक्ष असीफ मोकाशी यांनी तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून ही योजना हस्तांतरित होण्याचे थांबविले व नवी योजना मंजूर करून घेतली. ही योजना उत्रे ते पन्हाळा अशी होती. यासाठी लोकवर्गणी ५८ लाख रुपये १० टक्क्यांप्रमाणे भरली गेली. नव्या शासनाने जुन्या शासनाची सर्व कामे थांबविली, रद्द केली. त्यात ही योजना लालफितीत अडकली.संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पाणीपट्टी दर हजार लिटरसाठी पन्हाळावासीय भरतात, तर ३५ वर्षांपूर्वीपासून पाण्याचे मीटर स्वखर्चाने बसवून घेतात. इतके असूनदेखील जीवन प्राधिकरणचे उपअभियंता पाटील यांनी नगरपालिका प्रशासनास पत्र पाठवून कर्मचारी द्या, अन्यथा १ नोव्हेंबरपासून ही योजना बंद करीत आहोत, असे कळविले आहे. याबाबत नगरपरिषदेने विशेष सभा २१ आॅक्टोबरला बोलविल्याचे नगराध्यक्ष असीफ मोकाशी यांनी सांगितले. योजना पालिका चालवेल अन्यथा बंदपन्हाळा शहरवासीयांचा सहनशीलतेचा अंदाज जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आल्याने कर्मचारी अपुरे असल्याचे कारण देत ही पाणीपुरवठा योजना एक तर नगरपरिषद चालवेल, अन्यथा बंद करून टाका, असा सुरुवातीला तोंडी आदेश दिला. दरम्यान, या पाणीपुरवठा योजनेच्या दोन मोटारी जळाल्या. देखभाल व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नाही. यावेळी नगरपरिषदेने १२ लाख रुपये आमदार फंडातून विशेष निधी मंजूर करून घेऊन तातडीने दोन नव्या मोटारी आणून बसविल्या. सध्या जवळपास कर्मचाऱ्यांचा पगार सोडला, तर पाणी योजनेची देखभाल दुरुस्ती नगरपरिषदच करते.