शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

अन्यथा धुराडी पेटणार नाहीत

By admin | Updated: August 3, 2014 01:45 IST

साखर कामगारांचा इशारा : वेतनवाढीसाठी ८ आॅगस्टला आयुक्त कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर : त्रिपक्षीय कमिटी स्थापन करून वेतनाचा प्रश्न मार्गी लावा; अन्यथा आगामी गळीत हंगामात एकाही साखर कारखान्याचे धुराडे पेटणार नाही, असा इशारा राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला. साखर कारखानदार व आयुक्तांना जाग आणण्यासाठी ८ आॅगस्टला पुणे येथील आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भोसले म्हणाले, राज्यातील साखर कामगारांच्या वेतनवाढीचा करार मार्च २०१४ मध्ये संपला आहे. याबाबत मुख्यमंत्री, साखर संघाचे अध्यक्ष, सहकारमंत्री, कामगारमंत्री व साखर आयुक्तांना कळविले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही वेतन कमिटी स्थापन करण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या आहेत. पण, पाच महिने उलटले तरी अद्याप शासनाने कमिटी स्थापन केलेली नाही. यामुळे कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. शासन व साखरसम्राटांना जाग आणण्यासाठी ८ आॅगस्टला सकाळी अकरा वाजता साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही भोसले यांनी सांगितले. अनेक कारखान्यांत दहा-दहा वर्षे रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी आहेत. त्यांना किमान वेतनसुद्धा मिळत नाही. या कामगारांना कायम करण्याचा प्रयत्न आहे. शासन ग्रामसेवक, गटसचिव, शिक्षकांच्या प्रश्नांबाबत तातडीने लक्ष घालून सोडवते; पण साखर कामगारांच्या प्रश्नांबाबत दुर्र्लक्ष करीत आहे. सरकारला जाग आणण्यासाठी राज्यातील ५० हजार साखर कामगार मोर्चात सहभागी होणार असल्याचे शंकरराव भोसले यांनी सांगितले. साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे राज्य उपाध्यक्ष राऊसो पाटील, चिटणीस रावसाहेब भोसले, विठ्ठलराव परबकर, पंडित चव्हाण, सुभाष गुरव, यशवंत पाटील, तात्या पाटील, संजय मोरबाळे, विलास गुरव, महादेव बच्चे, एम. एस पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)