शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

अन्यथा धुराडी पेटणार नाहीत

By admin | Updated: August 3, 2014 01:45 IST

साखर कामगारांचा इशारा : वेतनवाढीसाठी ८ आॅगस्टला आयुक्त कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर : त्रिपक्षीय कमिटी स्थापन करून वेतनाचा प्रश्न मार्गी लावा; अन्यथा आगामी गळीत हंगामात एकाही साखर कारखान्याचे धुराडे पेटणार नाही, असा इशारा राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला. साखर कारखानदार व आयुक्तांना जाग आणण्यासाठी ८ आॅगस्टला पुणे येथील आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भोसले म्हणाले, राज्यातील साखर कामगारांच्या वेतनवाढीचा करार मार्च २०१४ मध्ये संपला आहे. याबाबत मुख्यमंत्री, साखर संघाचे अध्यक्ष, सहकारमंत्री, कामगारमंत्री व साखर आयुक्तांना कळविले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही वेतन कमिटी स्थापन करण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या आहेत. पण, पाच महिने उलटले तरी अद्याप शासनाने कमिटी स्थापन केलेली नाही. यामुळे कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. शासन व साखरसम्राटांना जाग आणण्यासाठी ८ आॅगस्टला सकाळी अकरा वाजता साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही भोसले यांनी सांगितले. अनेक कारखान्यांत दहा-दहा वर्षे रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी आहेत. त्यांना किमान वेतनसुद्धा मिळत नाही. या कामगारांना कायम करण्याचा प्रयत्न आहे. शासन ग्रामसेवक, गटसचिव, शिक्षकांच्या प्रश्नांबाबत तातडीने लक्ष घालून सोडवते; पण साखर कामगारांच्या प्रश्नांबाबत दुर्र्लक्ष करीत आहे. सरकारला जाग आणण्यासाठी राज्यातील ५० हजार साखर कामगार मोर्चात सहभागी होणार असल्याचे शंकरराव भोसले यांनी सांगितले. साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे राज्य उपाध्यक्ष राऊसो पाटील, चिटणीस रावसाहेब भोसले, विठ्ठलराव परबकर, पंडित चव्हाण, सुभाष गुरव, यशवंत पाटील, तात्या पाटील, संजय मोरबाळे, विलास गुरव, महादेव बच्चे, एम. एस पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)