शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

...अन्यथा १ जूनपासून पुन्हा शेतकरी संप - नवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 04:56 IST

लाँगमार्चच्या दरम्यान राज्य सरकारने लेखी आश्वासन दिले; पण त्यामध्ये गद्दारी केली.

कोल्हापूर : लाँगमार्चच्या दरम्यान राज्य सरकारने लेखी आश्वासन दिले; पण त्यामध्ये गद्दारी केली. अजूनही त्यांनी शहाणपणा दाखवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा शेतकरी संपाची पुनरावृत्ती होईल १ जूनपासून शेतकरी संपावर जातील, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी दिला. येत्या महिनाभर संपूर्ण राज्य पिंजून काढणार असून, शेतकरी बापाच्या रणसंग्रामासाठी सज्ज राहा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

किसान सभेच्यावतीने रविवारी कोल्हापुरात आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य ए. बी. पाटील होते. नवले म्हणाले, शेतकºयांच्या मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई लॉँग मार्च काढल्याने राज्य सरकार खडबडून जागे झाले आणि मागण्यांबाबत त्यांनी लेखी आश्वासन दिले. किसान सभेच्या ताकदीने सरकार नमले, हे अर्धसत्य असून जात, पात, राजकीय अभिलाषा बाजूला ठेवून शेतकरी लॉँग मार्चमध्ये सहभागी झाला म्हणूनच सरकार नमले; पण सरकारने शेतकºयांशी गद्दारी केली. ८९ लाख शेतकºयांना ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीची घोषणा केली. प्रत्यक्षात ४० लाख शेतकºयांना १३ हजार ७०० कोटींची कर्जमाफी झाली. महिलांच्या नावावरील आणि कुटुंबातील एकाचीच कर्जमाफी, अशा जाचक अटी घालून भाजप सरकारने आईच्या खांद्यावर बंदूक ठेवून बापाची शिकार केली असून, त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहे. विविध संघटनांना सोबत घेऊन राज्यातील वीस लाख, तर देशातील दहा कोटी शेतकºयांच्या स्वाक्षरीची मोहीम हातात घेतली आहे. सरकारकडून लूटवापसी होत नाही तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही. सरकारने गद्दारी करू नये. आश्वासने पाळावीत अन्यथा १ जून २०१७ च्या शेतकरी संपाची पुनरावृत्ती होईल.चंद्रकांत पाटील म्हणजे ‘फायर ब्रिगेड’शेतकरी आंदोलनाची आग विझविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ‘फायर ब्रिगेड’सारखा वापर केल्याची टीका डॉ. अजित नवले यांनी यावेळी केली. ते म्हणाले, आम्हाला वाटले चंद्रकांत पाटील यांच्या अंगात कोल्हापूरचे पाणी असल्याने त्यांच्यावर विश्वास टाकला; पण शेतकºयांची फसवणूक केली. पाटीलसाहेब जरा जपून, देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील अनेकांना नेम धरून गार केले आहे, तुम्हालाही कधी गार करतील हे सांगता येत नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला.शेतकºयांचे डोळे पाणावलेनवले यांनी तासाभराच्या भाषणात सरकारचे वाभाडे काढत लॉँग मार्च वर्णन अत्यंत भावनिकरीत्या केले. मोर्चातील शेतकºयांच्या वेदनांचे वर्णन ऐकून उपस्थित शेतकºयांचे डोळे पाणावले.दुधाचा सप्ताह अन्मोदी ग्लासदूध दरवाढीसाठी ३ ते ९ मे दरम्यान तहसीलदार कार्यालयासमोर ‘दूध सप्ताह’ करायचा आहे. रोज एका गावातील दूध आणून ते गरम करून भाजपचे पदाधिकारी, नेत्यांसह अधिकाºयांना वाटायचे. ‘दुधाची लूट थांबवा; अन्यथा शरम नसेल तर फुकट न्या,’ असे आंदोलन करा आणि १ मेच्या गावसभेत तसा ठराव करा. दूध वाटपासाठी उंचीने जास्त पण दूध कमी बसणारे ‘मोदी ग्लास’ वापरा आणि ते गुजरातमधूनच आणा, असा टोलाही नवले यांनी लगावला.

टॅग्स :Farmerशेतकरी