शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

...अन्यथा १ जूनपासून पुन्हा शेतकरी संप - नवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 04:56 IST

लाँगमार्चच्या दरम्यान राज्य सरकारने लेखी आश्वासन दिले; पण त्यामध्ये गद्दारी केली.

कोल्हापूर : लाँगमार्चच्या दरम्यान राज्य सरकारने लेखी आश्वासन दिले; पण त्यामध्ये गद्दारी केली. अजूनही त्यांनी शहाणपणा दाखवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा शेतकरी संपाची पुनरावृत्ती होईल १ जूनपासून शेतकरी संपावर जातील, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी दिला. येत्या महिनाभर संपूर्ण राज्य पिंजून काढणार असून, शेतकरी बापाच्या रणसंग्रामासाठी सज्ज राहा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

किसान सभेच्यावतीने रविवारी कोल्हापुरात आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य ए. बी. पाटील होते. नवले म्हणाले, शेतकºयांच्या मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई लॉँग मार्च काढल्याने राज्य सरकार खडबडून जागे झाले आणि मागण्यांबाबत त्यांनी लेखी आश्वासन दिले. किसान सभेच्या ताकदीने सरकार नमले, हे अर्धसत्य असून जात, पात, राजकीय अभिलाषा बाजूला ठेवून शेतकरी लॉँग मार्चमध्ये सहभागी झाला म्हणूनच सरकार नमले; पण सरकारने शेतकºयांशी गद्दारी केली. ८९ लाख शेतकºयांना ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीची घोषणा केली. प्रत्यक्षात ४० लाख शेतकºयांना १३ हजार ७०० कोटींची कर्जमाफी झाली. महिलांच्या नावावरील आणि कुटुंबातील एकाचीच कर्जमाफी, अशा जाचक अटी घालून भाजप सरकारने आईच्या खांद्यावर बंदूक ठेवून बापाची शिकार केली असून, त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहे. विविध संघटनांना सोबत घेऊन राज्यातील वीस लाख, तर देशातील दहा कोटी शेतकºयांच्या स्वाक्षरीची मोहीम हातात घेतली आहे. सरकारकडून लूटवापसी होत नाही तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही. सरकारने गद्दारी करू नये. आश्वासने पाळावीत अन्यथा १ जून २०१७ च्या शेतकरी संपाची पुनरावृत्ती होईल.चंद्रकांत पाटील म्हणजे ‘फायर ब्रिगेड’शेतकरी आंदोलनाची आग विझविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ‘फायर ब्रिगेड’सारखा वापर केल्याची टीका डॉ. अजित नवले यांनी यावेळी केली. ते म्हणाले, आम्हाला वाटले चंद्रकांत पाटील यांच्या अंगात कोल्हापूरचे पाणी असल्याने त्यांच्यावर विश्वास टाकला; पण शेतकºयांची फसवणूक केली. पाटीलसाहेब जरा जपून, देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील अनेकांना नेम धरून गार केले आहे, तुम्हालाही कधी गार करतील हे सांगता येत नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला.शेतकºयांचे डोळे पाणावलेनवले यांनी तासाभराच्या भाषणात सरकारचे वाभाडे काढत लॉँग मार्च वर्णन अत्यंत भावनिकरीत्या केले. मोर्चातील शेतकºयांच्या वेदनांचे वर्णन ऐकून उपस्थित शेतकºयांचे डोळे पाणावले.दुधाचा सप्ताह अन्मोदी ग्लासदूध दरवाढीसाठी ३ ते ९ मे दरम्यान तहसीलदार कार्यालयासमोर ‘दूध सप्ताह’ करायचा आहे. रोज एका गावातील दूध आणून ते गरम करून भाजपचे पदाधिकारी, नेत्यांसह अधिकाºयांना वाटायचे. ‘दुधाची लूट थांबवा; अन्यथा शरम नसेल तर फुकट न्या,’ असे आंदोलन करा आणि १ मेच्या गावसभेत तसा ठराव करा. दूध वाटपासाठी उंचीने जास्त पण दूध कमी बसणारे ‘मोदी ग्लास’ वापरा आणि ते गुजरातमधूनच आणा, असा टोलाही नवले यांनी लगावला.

टॅग्स :Farmerशेतकरी