शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

...अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात निदर्शने

By admin | Updated: May 12, 2015 00:34 IST

साखर, ऊसकामगार परिषद : प्रश्न दहा दिवसांत सोडविण्याची ‘डेडलाईन’

कोल्हापूर : शासनाने ऊस उत्पादक, ऊस तोडणी वाहतूक कामगार व साखर कामगार यांच्या प्रश्नांबाबत दिलेल्या आश्वासनांची येत्या दहा दिवसांत सोडवणूक न केल्यास मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांच्या जाहीर कार्यक्रमांत निदर्शने करू, असा इशारा सोमवारी देण्यात आला. ऊस उत्पादक, साखर कामगार व ऊस तोडणी-वाहतूक कामगार यांच्या राज्यव्यापी परिषदेत हा वज्रनिर्धार करण्यात आला.राजर्षी शाहू स्मारक भवनात झालेल्या या परिषदेचे उद्घाटन ‘सिटू’चे जनरल सेक्रेटरी डॉ. डी. एल. कराड यांच्या हस्ते झाले. यावेळी साखर कामगार संघटना समन्वय समितीचे उद्धव भवलकर, ऊस तोडणी-वाहतूक कामगार संघटनेचे प्रा. सुभाष जाधव, प्रा. आबासाहेब चौगले, डॉ. अजित नवले, संभाजी यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.परिषदेत, शासनाने ऊसतोडणी वाहतूक कामगारांच्या मजूरवाढीसाठीचा करार केलेला नाही. उत्पादक शेतकऱ्यांची तीन हजार कोटी रुपयांहून अधिक ऊस बिले कारखान्याकडे थकीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी ऊसतोडणी व वाहतुकीच्या दरात २० टक्के हंगामी वाढ जाहीर करूनही त्यांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. ऊस उत्पादकांसाठी राज्य सरकारने दोन हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज जाहीर केले आहे; परंतु त्यामधील एक रुपयादेखील सरकारने दिलेला नाही. येत्या दहा दिवसांत म्हणजे २२ मेपर्यंत या तिन्ही घटकांचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या जाहीर कार्यक्रमात निदर्शने करून जाब विचारण्याचा निर्णय घेण्यात आला.डॉ. डी. एल. कराड म्हणाले, राज्यातील आमदार-खासदारांनी सहकारी साखर कारखाने मोडीत काढून स्वत:च्या ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांची संख्या २०२ वरून १३२ वरती पोहोचली आहे, तर खासगी साखर कारखान्यांची संख्या २ वरून ८१ वरती पोहोचली आहे. अनेक साखर कारखान्यांमधील दहा वर्षांपासून पगार मिळालेला नाही. राज्यातील ८० टक्के कारखान्यांनी ‘एफआरपी’प्रमाणे दर दिलेला नाही. अशा कारखान्यांवर कारवाईचे अधिकार असताना मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांकडून कोणतीच कारवाई केली जात नाही.सुभाष जाधव यांनी साखर उद्योगातील प्रलंबित दहा मागण्या पूर्ण करण्याची मागणी सरकारकडे केली. प्रा. आबासाहेब चौगले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आण्णा सावंत, नामदेव राठोड, दत्ता डाके, सय्यद रझाक, अशोक लहाने, आप्पा परीट, दिनकर आदमापुरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)साखर कामगारांचे भवितव्य गंभीरउद्धव भवलकर म्हणाले, सरकारने घोषणा करून एक वर्ष झाले तरी साखर कामगारांच्या वेतन पुनर्रचनेसाठी अद्याप कमिटी स्थापन केलेली नाही. तुटपुंज्या वेतनावर साखर कामगारांना गुजराण करावी लागत आहे. बंद व आजारी साखर कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यास सरकार पुढाकार घेत नाही. त्यामुळे शेतकरी आणि कामगार वर्गाच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यातील ४२ साखर कारखान्यांची कवडीमोल दराने विक्री झाली आहे. त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे समजते. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी तिन्ही घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे.