शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

...अन्यथा ‘भाजप’ ला मत नाही : पेन्शनर, गिरणी कामगारांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 18:21 IST

कोशियारी कमिटीच्या शिफारशींप्रमाणे ईपीएस पेन्शनधारकांना महिन्याला ३००० रुपये पेन्शन व महागाई भत्ता मिळावा, तसेच मुंबईतील गिरणी कामगारांसाठी घराचा आराखडा सरकारने लवकर जाहीर करावा, अन्यथा येणाऱ्या लोकसभेत भाजपला मत देणार नाही, असा इशारा पेन्शनधारक व गिरणी कामगारांनी मंगळवारी येथे दिला.

ठळक मुद्दे: भाजप कार्यालयावर धडक मोर्चा

कोल्हापूर : कोशियारी कमिटीच्या शिफारशींप्रमाणे ईपीएस पेन्शनधारकांना महिन्याला ३००० रुपये पेन्शन व महागाई भत्ता मिळावा, तसेच मुंबईतील गिरणी कामगारांसाठी घराचा आराखडा सरकारने लवकर जाहीर करावा, अन्यथा येणाऱ्या लोकसभेत भाजपला मत देणार नाही, असा इशारा पेन्शनधारक व गिरणी कामगारांनी मंगळवारी येथे दिला. बिंदू चौक येथील भाजप कार्यालयावर धडक मोर्चा काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आमच्या भावना कळवाव्यात, अशी मागणी आंदोलकांनी निवेदनाद्वारे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्याकडे केली.

दुपारी साडेबाराच्या सुमारास लक्ष्मीपुरी येथील सर्व श्रमिक संघाच्या कार्यालय येथून मोर्चाला सुरुवात झाली. रणरणत्या उन्हातही जिल्ह्याच्या कानाकोपºयातून मोठ्या संख्येने पेन्शनर व गिरणी कामगार कुटुंबीयांसह मोर्चात सहभागी झाले होते. ‘नो कोशियारी... नो व्होट’, ‘घर नाही तर मत नाही’ अशा घोषणा देत आंदोलकांचा हा मोर्चा फोर्ड कॉर्नर, आईसाहेब महाराज पुतळा चौक, छत्रपती शिवाजी चौक, बिंदू चौकमार्गे राजाराम रोडवरील भाजप कार्यालयाकडे निघाला. दरम्यान, सबजेल येथे मोर्चाचे रूपांतर ठिय्यात झाले. या ठिकाणी ‘आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर भाजपला मत नाही,’ अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून निघाला.

या ठिकाणी संदीप देसाई हे मोर्चाला सामोरे गेले. यावेळी सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी पंतप्रधान मोदींना पाठविण्यासाठीपेन्शनरांचे व मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविण्यासाठी गिरणी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे दिले.अतुल दिघे म्हणाले, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी निवडणुकीपूर्वी ९० दिवसांत कोशियारी कमिटी लागू करून प्रश्न मार्गी लावला जाईल, असे सांगितले होते; परंतु साडेचार वर्षे उलटली तरी काहीच निर्णय झालेला नाही. ५८ लाख पेन्शनर या निर्णयावर अवलंबून आहेत. तसेच राज्यातील गिरणी कामगारांनाही अद्याप घरे मिळालेली नाहीत. सरकारकडे पैसे नाहीत असे नाही. त्यामुळे त्यांनी गिरणी कामगारांसाठी घराचा आराखडा जाहीर करावा. यासह पेन्शनर व गिरणी कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास भाजप सरकारला मत मिळणार नाही.

संदीप देसाई म्हणाले, पेन्शनर व गिरणी कामगारांच्या मागण्यांबाबत श्रमिक संघातर्फे देण्यात आलेले निवेदन हे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठविले जाईल. या मागण्यांबाबतचे काम अंतिम टप्प्यात असून, शासनपातळीवर त्याचा पाठपुरावा केला जाईल.आंदोलनात दत्तात्रय अत्याळकर, नारायण मिरजकर, अनंत कुलकर्णी, विलास चव्हाण, शांताराम पाटील, अमृत कोकितकर, रामजी देसाई, बाजीराव पाटील, आदींसह गिरणी कामगार व पेन्शनर सहभागी झाले होेते. 

आमच्या वाटणीचे आम्हाला द्यामुंबई ही कामगारांच्या परिश्रमाने सोन्याची बनली; परंतु ती आता बिल्डर लुटायला निघाले आहेत; त्यामुळे यातील आमच्या गिरणी कामगारांच्या वाटणीचे सरकारने द्यावे, असे म्हणणे चुकीचे होणार नाही, असे अतुल दिघे यांनी सांगितले.सरकारने निवडणुकीपूर्वी निर्णय घ्यावापेन्शनर व गिरणी कामगारांच्या मागण्यांबाबत सरकारने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घ्यावा, आम्ही अच्छे दिनच मागायला आलो आहे, असे दिघे यांनी सांगितले. पेन्शनर व गिरणी कामगारांच्या मागण्यांसाठी मंगळवारी सर्व श्रमिक संघातर्फे बिंदू चौक येथील भाजपच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पेन्शनर व गिरणी कामगारांच्या कुटुंबातील महिलांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

टॅग्स :Strikeसंपkolhapurकोल्हापूर