शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

...अन्यथा ‘भाजप’ ला मत नाही : पेन्शनर, गिरणी कामगारांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 18:21 IST

कोशियारी कमिटीच्या शिफारशींप्रमाणे ईपीएस पेन्शनधारकांना महिन्याला ३००० रुपये पेन्शन व महागाई भत्ता मिळावा, तसेच मुंबईतील गिरणी कामगारांसाठी घराचा आराखडा सरकारने लवकर जाहीर करावा, अन्यथा येणाऱ्या लोकसभेत भाजपला मत देणार नाही, असा इशारा पेन्शनधारक व गिरणी कामगारांनी मंगळवारी येथे दिला.

ठळक मुद्दे: भाजप कार्यालयावर धडक मोर्चा

कोल्हापूर : कोशियारी कमिटीच्या शिफारशींप्रमाणे ईपीएस पेन्शनधारकांना महिन्याला ३००० रुपये पेन्शन व महागाई भत्ता मिळावा, तसेच मुंबईतील गिरणी कामगारांसाठी घराचा आराखडा सरकारने लवकर जाहीर करावा, अन्यथा येणाऱ्या लोकसभेत भाजपला मत देणार नाही, असा इशारा पेन्शनधारक व गिरणी कामगारांनी मंगळवारी येथे दिला. बिंदू चौक येथील भाजप कार्यालयावर धडक मोर्चा काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आमच्या भावना कळवाव्यात, अशी मागणी आंदोलकांनी निवेदनाद्वारे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्याकडे केली.

दुपारी साडेबाराच्या सुमारास लक्ष्मीपुरी येथील सर्व श्रमिक संघाच्या कार्यालय येथून मोर्चाला सुरुवात झाली. रणरणत्या उन्हातही जिल्ह्याच्या कानाकोपºयातून मोठ्या संख्येने पेन्शनर व गिरणी कामगार कुटुंबीयांसह मोर्चात सहभागी झाले होते. ‘नो कोशियारी... नो व्होट’, ‘घर नाही तर मत नाही’ अशा घोषणा देत आंदोलकांचा हा मोर्चा फोर्ड कॉर्नर, आईसाहेब महाराज पुतळा चौक, छत्रपती शिवाजी चौक, बिंदू चौकमार्गे राजाराम रोडवरील भाजप कार्यालयाकडे निघाला. दरम्यान, सबजेल येथे मोर्चाचे रूपांतर ठिय्यात झाले. या ठिकाणी ‘आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर भाजपला मत नाही,’ अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून निघाला.

या ठिकाणी संदीप देसाई हे मोर्चाला सामोरे गेले. यावेळी सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी पंतप्रधान मोदींना पाठविण्यासाठीपेन्शनरांचे व मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविण्यासाठी गिरणी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे दिले.अतुल दिघे म्हणाले, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी निवडणुकीपूर्वी ९० दिवसांत कोशियारी कमिटी लागू करून प्रश्न मार्गी लावला जाईल, असे सांगितले होते; परंतु साडेचार वर्षे उलटली तरी काहीच निर्णय झालेला नाही. ५८ लाख पेन्शनर या निर्णयावर अवलंबून आहेत. तसेच राज्यातील गिरणी कामगारांनाही अद्याप घरे मिळालेली नाहीत. सरकारकडे पैसे नाहीत असे नाही. त्यामुळे त्यांनी गिरणी कामगारांसाठी घराचा आराखडा जाहीर करावा. यासह पेन्शनर व गिरणी कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास भाजप सरकारला मत मिळणार नाही.

संदीप देसाई म्हणाले, पेन्शनर व गिरणी कामगारांच्या मागण्यांबाबत श्रमिक संघातर्फे देण्यात आलेले निवेदन हे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठविले जाईल. या मागण्यांबाबतचे काम अंतिम टप्प्यात असून, शासनपातळीवर त्याचा पाठपुरावा केला जाईल.आंदोलनात दत्तात्रय अत्याळकर, नारायण मिरजकर, अनंत कुलकर्णी, विलास चव्हाण, शांताराम पाटील, अमृत कोकितकर, रामजी देसाई, बाजीराव पाटील, आदींसह गिरणी कामगार व पेन्शनर सहभागी झाले होेते. 

आमच्या वाटणीचे आम्हाला द्यामुंबई ही कामगारांच्या परिश्रमाने सोन्याची बनली; परंतु ती आता बिल्डर लुटायला निघाले आहेत; त्यामुळे यातील आमच्या गिरणी कामगारांच्या वाटणीचे सरकारने द्यावे, असे म्हणणे चुकीचे होणार नाही, असे अतुल दिघे यांनी सांगितले.सरकारने निवडणुकीपूर्वी निर्णय घ्यावापेन्शनर व गिरणी कामगारांच्या मागण्यांबाबत सरकारने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घ्यावा, आम्ही अच्छे दिनच मागायला आलो आहे, असे दिघे यांनी सांगितले. पेन्शनर व गिरणी कामगारांच्या मागण्यांसाठी मंगळवारी सर्व श्रमिक संघातर्फे बिंदू चौक येथील भाजपच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पेन्शनर व गिरणी कामगारांच्या कुटुंबातील महिलांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

टॅग्स :Strikeसंपkolhapurकोल्हापूर