शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

सेंद्रिय शेतीचे तुणतुणं वाजवलं, देशाच्या 'बजेट'वर राजू शेट्टींची तिखट प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 16:35 IST

निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता प्रतिक्रिया येत आहेत.

लोकसभा निवडणुकीआधीचा शेवटचा पूर्णवेळ अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. त्यामध्ये मध्यमवर्गाला दिलासा मिळण्यासाठी करसवलतीची मर्यादा ५ लाखांवरून ७ लाख करण्यात आली आहे. याशिवाय काही गोष्टी महाग झाल्यात, तर काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. विरोधकांकडून टीका केली जात आहे. भाजप नेत्यांकडून या बजेटचं स्वागत करण्यात येत असून सर्वजनहिताय असा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र, शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी या बजेटवर आपण समधानी नसल्याचं म्हटलंय. 

निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता प्रतिक्रिया येत आहेत. सत्ताधारी भाजसह मित्र पक्षांकडून या बजेटचं स्वागत केलं जात असून विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेत अर्थसंकल्पाचे स्वागत केले. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनीही हा अर्थसंकल्प शेवटच्या व्यक्तीपर्यंतचा असल्याचे म्हटले आहे. मात्र, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या अनुषंगाने धोरण नसल्याची टीका केली. 

या बजेटवर मी तरी समाधानी नाही. सेंद्रिय शेतीचे तुणतुणं वाजवले आहे. तर, रासायनिक खाताच्या वाढत्या किंमती नियंत्रणात कस आणणार या प्रश्नाचे उत्तर बजेटमध्ये नाही. डेअरी आणि पोल्ट्रीसाठी तोकडी तरतूद करण्यात आल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटलंय. तसेच, या देशातील केवळ 4% लोकांनाच हमीभाव मिळतो. शेतीसाठी सरकार करतंय काय? ४ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात तुमचं समाधान नाही झाल का? भरड धान्य शेतकऱ्याला परवडतं का?, असे अनेक सवाल शेट्टी यांनी विचारले आहेत. 

ऊसाचा एफआरपीप्रमाणे हमीभाव कायदेशीर करा. ऊस वजन करणारे काटे डिजिटल करण्याची मागणी होतं नाही. तर, मग प्रत्यक्ष डिजिटलायझेशन होणार का?. कापूस उत्पादकसाठी नवनवीन बियाणे आणि संशोधन कारण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला माल साठवून ठेवण्यासाठी गोडाऊन उपलब्ध नाहीत. किमान हमीभाव कायदा करावा तरच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील, असे मुद्दे मांडत राजू शेट्टींनी बजेटवर आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाले सुजय विखे पाटील

विरोधक बजेटबाबत चांगले बोलतील, याची अपेक्षाच नाही. मात्र, या अर्थसंकल्पात करसवलतीची वाढवलेली मर्याचा महत्त्वाची आहे. करसवलतीतून जे पैसे सामान्य जनतेचे वाचतील, ते पैसे गुंतवणुकीच्या माध्यमातून बाजारात येतील. या वेगळ्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास वाढवण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी करत आहेत, असे सुजय विखे-पाटील यांनी सांगितले

 

टॅग्स :FarmerशेतकरीRaju Shettyराजू शेट्टीBudgetअर्थसंकल्प 2023Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन