शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

देवस्थानच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

By admin | Updated: May 14, 2015 01:13 IST

कारवाई होणार : पंधरा दिवसांत आदेश मिळणार ?

कोल्हापूर : अंबाबाई, जोतिबासह तीन हजार देवस्थानांचे व्यवस्थापन करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतील गैरव्यवहारांच्या चौकशीचे आदेश मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याला दिले. राज्य गुन्हा अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाद्वारे ही चौकशी करण्यात येणार असून, येत्या पंधरा दिवसांत कोल्हापूर विभागाला हे आदेश प्राप्त होऊन प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये जमिनींची परस्पर विक्री, उत्खननातील घोटाळा, दागिन्यांच्या नोंदीत फारकत, लेखापरीक्षणच नाही अशा अनेक प्रकारचे गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. ‘लोकमत’मध्ये या सगळ््यांवर प्रकाशझोत टाकणारी ‘देवस्थानमधील अनागोंदी’ ही मालिका प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभा अधिवेशनात ८ एप्रिलला हा प्रश्न लक्षवेधीद्वारे मांडला होता. त्यात राज्यातील विविध मंत्र्यांनी सहभाग घेतला होता. तब्बल अर्धा तास चाललेल्या या प्रश्नोत्तरानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवस्थान समितीमधील गैरव्यवहाराची राज्य गुन्हा अन्वेषण शाखेच्या एसआयटी विभागामार्फत चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केले होते. आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निर्णयाच्या अंमलबजावणीची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गृहखात्याला हा आदेश दिला आहे. तो पोलीस महासंचालकांकडून पुणे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) यांच्याकडे प्राप्त होईल तेथून या आदेशाची अंमलबजावणी कोल्हापूर परिक्षेत्रातील कार्यालय करील. या संपूर्ण प्रक्रियेला किमान आठ ते पंधरा दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे समजते.भरत सूर्यवंशी यांना पदभार द्या...देवस्थान समितीच्या सचिवपदी चार वर्षांपूर्वी भरत सूर्यवंशी यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी देवस्थानमधील एक-एक गैरकारभार उघड करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी मंत्रालयातून दबाव आणून त्यांची बदली करण्यात आली. याच भरत सूर्यवंशी यांची पुन्हा समितीच्या सचिवपदी नेमणूक केली जावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. समितीच बरखास्त कराकेंद्र व राज्यात युतीचे शासन आहे. मात्र, देवस्थान समितीवर काँग्रेस व राष्ट्रवादीचे सदस्य आहे. वर्षानुवर्षे देवस्थान समितीच्या अध्यक्ष व सदस्यपदावर ठाण मांडलेल्या या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात देवस्थान समितीत सर्वाधिक गैरव्यवहार झाले. त्यामुळे ही समितीच बरखास्त करून त्याठिकाणी नव्याने समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी देवस्थानच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या पंधरा दिवसांत चौकशीसाठीची कागदोपत्री कार्यवाही पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. - आमदार राजेश क्षीरसागर