शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

विरोधकांत नगराध्यक्ष उमेदवारीचा तिढा कायम

By admin | Updated: October 14, 2016 01:12 IST

इस्लामपूर नगरपालिका : आघाडीसंदर्भात मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील; राजकीय हालचाली गतिमान

अशोक पाटील-- इस्लामपूर --आगामी इस्लामपूर पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीविरोधात भाजप, काँग्रेस, शिवसेना, मनसे, स्वाभिमानी आणि इतर घटक पक्षांची विस्कटलेली मोट बांधण्यात खासदार राजू शेट्टी यशस्वी झाले आहेत. मात्र जनतेतून निवडून द्यायच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा तिढा अद्यापही कायम आहे. या आघाडीसंदर्भात गुरुवारी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आघाडीला हिरवा कंदील दाखवला.पालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी गेल्या ३० वर्षांत विरोधकांना तारेवरची कसरत करावी लागली आहे. निवडणूक तोंडावर आल्यानंतरच विरोधकांची मोट बांधण्याची तयारी सुरु होते. याचा फटका त्यांना निवडणुकीत बसतो. आगामी निवडणुकीतही तशीच परिस्थिती आहे. प्रारंभीच्या टप्प्यात भाजप, शिवसेना आणि काँग्रेसमधील नेत्यांनी स्वबळाची भाषा सुरू केली होती. त्यानंतर महाडिक युवा शक्तीने मेळावा घेऊन सन्मानजनक तोडगा निघाला तर आघाडी करू अथवा स्वबळावर लढू, असा इशारा दिला होता. त्यानंतर दोनच दिवसात राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सर्व विरोधकांना एकत्र करत बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी विक्रम पाटील, आनंदराव पवार, वैभव पवार यांनी इच्छुक असल्याचे सांगितले. परंतु या विषयावर बोलणे टाळत शेट्टी यांनी अगोदर एक व्हा, नंतरच यावर तोडगा काढू, असे स्पष्ट केले.राष्ट्रवादीतून पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे. आ. जयंत पाटील यांचा निर्णय अंतिम असेल. पाटील यांच्याविरोधात विरोधकांत खमक्या नेतृत्वाचा अभाव असल्याने शेट्टी यांनी उमेदवार निवडीसंदर्भात सावध भूमिका घेतली आहे. गुरुवारी मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी खा. शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन आघाडीबाबत माहिती दिली. यावेळी निवडणुकीत लागेल ती मदत करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे खा. शेट्टी यांनी स्पष्ट केले.