शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
3
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
4
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
5
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
6
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
7
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
8
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
9
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
10
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
11
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
12
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
13
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
14
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
15
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
16
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
17
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
18
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
19
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
20
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  

नेतृत्वावरून विरोधकांत दुफळी ?

By admin | Updated: June 29, 2015 00:16 IST

कुंभी-कासारी कारखाना निवडणूक : विरोधकांच्या बैठकीत शाहू आघाडी, बचाव मंचमध्ये दरी स्पष्ट

प्रकाश पाटील ल्ल कोपार्डे -कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या होऊ घातलेल्या २०१५ ते २०२०च्या निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत विरोधकात शाहू आघाडी व बचाव मंच अशी दरी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये प्रस्थापितांपेक्षा सामान्य कार्यकर्त्यांना महत्त्व द्या, अशी बचाव मंचची संकल्पना स्पष्टपणे फेटाळताना राजकारण आणि काम यांच्यामध्ये फारकत असून राजकीय प्रतिमा असलेल्यांनाच नेते म्हणा, असा रेटा प्रस्थापितांनी लावल्याने कार्यकर्त्यांनी खडेबोल सुनावले. यातूनच सत्ताधारी आमदार चंद्रदीप नरके गटाला एकसंध होऊन सत्तेतून पायउतार करण्याची योजना विरोधक पूर्ण करणार काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. चंद्रदीप नरके यांनी २००४ मध्ये कुंभी-कासारीवर सत्ता मिळविल्यानंतर सलग दहा वर्षे एकतर्फी सत्ता मिळविताना करवीरची आमदारकीही दोन वेळा आपल्या ताब्यात ठेवली. त्याचबरोबर जिल्हा परिषदेतील पाच मतदारसंघ व पंचायत समितीच्या दहा मतदारसंघात शिवसेनेचा झेंडा फडकावला. सध्या २०१५ ते २०२० साठी कुंभीची निवडणूक होऊ घातली असून कोणत्याही परिस्थितीत आमदार चंद्रदीप नरके यांचे सत्ताकेंद्र हस्तगत करण्याचा चंग विरोधकांनी बांधला असला तरी यासाठी लागणारे एकजुटीचे नेतृत्व ही कुमकुवत बाजू विरोधकांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुडित्रे येथे झालेल्या बैठकीत नेतेपदाचा मुद्दाच प्रकर्षाने चर्चेला गेला. निवडणुकीमध्ये कोण उमेदवार, कोणत्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवयाची, कोणती कामे सभासदापर्यंत घेऊन जायची, विरोधकांची कोणती चूक सभासदांपुढे आणल्यास त्याचा फायदा होईल. यापेक्षा मी नेता की तू नेता यावरच चर्चा होऊन दोन टोके विरोधकांत निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी एक नेता, राजकीयदृष्ट्या स्वच्छ चारित्र्य, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सातत्याने सभासदांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे नेतृत्व व प्रस्थापितांनी जरा बाजूला राहून नवीन चेहरे द्यावेत यासाठी चर्चा उपस्थित केली. मात्र, प्रस्थापितांनी या संकल्पनेला राजकीयदृष्टया फार महत्त्व नसते. तेव्हा फक्त राजकीय प्रतिमा असणाऱ्यांनाच नेतृत्व देऊ असे सांगताच विरोधी सत्ताधारी गट एका व्यक्तीच्या नेतृत्वाखाली चालत असताना हे आपल्यला का शक्य होत नाही, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली. सत्तेत नसताना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व हवे. केवळ निवडणुकीसाठी ही मंडळी आल्यास १९९८ ते २००४ मध्ये पाच वर्षांतील पाच चेअरमन ही प्रतिमा आणून आमदार चंद्रदीप नरके आपले सत्तेचे स्वप्न साध्य करणार अशी भीती व्यक्त करण्यात आली. यासाठी ज्या व्यक्ती लोकांमध्ये डागाळलेल्या व्यक्तीत गणल्या जातात त्यांना थांबवून नवीन चेहरे दिल्यास विजय लांब नाही असा विचार मांडताना बचाव मंचने लोकशाही प्रक्रिया राबवून उमेदवार निवडीला प्राधान्य देऊ, अशी संकल्पना मांडली. मात्र, यावेळी काही प्रस्थापित मंडळीनी राजकारण आणि काम यांची गल्लत करू नका. निवडणुकीसाठी राजकीय प्रतिमा असणारे नेतृत्वच द्यावे असा रेटा लावल्याने विचार आणि स्वार्थ यातील संघर्ष चव्हाट्यावर आला.