शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

कामकाजात भाग घेण्याचा मार्ग मोकळा कोल्हापूर महापालिकेच्या १८ नगरसेवकांचा जीव भांड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 11:25 IST

निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र न देणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेतील १८ नगरसेवकांना राज्य सरकारने कायद्यात बदल केल्याने जीवदान मिळाले असून,

ठळक मुद्दे१८ नगरसेवकांना महापालिकेच्या कामकाजापासून दूर राहावे लागले होते. निवडून आलेल्या २० नगरसेवकांची तब्बल तीन वर्षे केवळ न्यायालयीन लढाई लढण्यात गेली

कोल्हापूर : निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र न देणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेतील १८ नगरसेवकांना राज्य सरकारने कायद्यात बदल केल्याने जीवदान मिळाले असून, यासंबंधीचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या सहीचे राजपत्र प्राप्त झाल्यामुळे सर्व नगरसेवकांना महापालिकेच्या नियमित कामकाजात भाग घेण्याचा मार्ग मोकळा झाला.

कोल्हापूर महानगरपालिकेतील १८ नगरसेवक सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे अडचणीत आले होते; त्यामुळे या सर्वांनी पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन तांत्रिक चुकीचा फटका नगरसेवकांना बसू नये, अशी विनंती केली होती. मंत्री पाटील यांनीही सकारात्मक दृष्टीने हा विषय हाताळून कायद्यात भूतलक्षीप्रभावाने बदल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने निर्णय घेतला; परंतु यासंबंधीचे अधिकृत वटहुकूम अथवा राजपत्र मिळाले नसल्यामुळे १८ नगरसेवकांना महापालिकेच्या कामकाजापासून दूर राहावे लागले होते.

कायद्यात बदल केल्याचा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या सहीचा अध्यादेश २७ सप्टेंबर २०१८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध झाला. त्याची अधिकृत माहिती सोमवारी महापालिका प्रशासनास प्राप्त झाली. नगरसचिव दिवाकर कारंडे, निवडणूक अधिकारी विजय वणकुद्रे यांनी हा अध्यादेश वाचून पाहिला. त्यानंतर त्यांनी १८ नगरसेवकांना आजपासून नियमित कामकाजात भाग घेता येईल, असे स्पष्ट केले.तीन वर्षे गेली न्यायालयीन लढाईतमहानगरपालिकेवर निवडून आलेल्या २० नगरसेवकांची तब्बल तीन वर्षे केवळ न्यायालयीन लढाई लढण्यात गेली. आधी जातीचे दाखले वैध की अवैध यावर न्यायालयात फेºया झाल्या. त्यातून मोकळे होतात न होतात तोच सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्रे निवडणूक आयोगास सादर न केल्यामुळे पुन्हा एकदा न्यायालयीन लढाई झाली. एका नगरसेवकास मात्र घरी जावे लागले, तर एक नगरसेविकेची लढाई अद्याप सुरुच आहे. तीन वर्षे आणि लाखो रुपये नगरसेवक पद टिकविण्यात गेल्यानंतर आता कुठे सर्व संकटे दूर झाल्याने नगरसेवकांचा जीव भांड्यात पडला.मार्ग मोकळा झालेले नगरसेवक -* कॉँग्रेस - स्वाती यवलुजे, संदीप नेजदार, सुभाष बुचडे, दीपा मगदूम, वृषाली कदम, रिना कांबळे

* राष्टवादी कॉँग्रेस - हसिना फरास, सचिन पाटील, अफजल पीरजादे, शमा मुल्ला

* ताराराणी आघाडी - किरण शिराळे, सविता घोरपडे, कमलाकर भोपळे

* भारतीय जनता पक्ष - मनीषा कुंभार, अश्विनी बारामते, विजयसिंह खाडे, संतोष गायकवाड

* शिवसेना - नियाज खान

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर