शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

कामकाजात भाग घेण्याचा मार्ग मोकळा कोल्हापूर महापालिकेच्या १८ नगरसेवकांचा जीव भांड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 11:25 IST

निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र न देणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेतील १८ नगरसेवकांना राज्य सरकारने कायद्यात बदल केल्याने जीवदान मिळाले असून,

ठळक मुद्दे१८ नगरसेवकांना महापालिकेच्या कामकाजापासून दूर राहावे लागले होते. निवडून आलेल्या २० नगरसेवकांची तब्बल तीन वर्षे केवळ न्यायालयीन लढाई लढण्यात गेली

कोल्हापूर : निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र न देणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेतील १८ नगरसेवकांना राज्य सरकारने कायद्यात बदल केल्याने जीवदान मिळाले असून, यासंबंधीचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या सहीचे राजपत्र प्राप्त झाल्यामुळे सर्व नगरसेवकांना महापालिकेच्या नियमित कामकाजात भाग घेण्याचा मार्ग मोकळा झाला.

कोल्हापूर महानगरपालिकेतील १८ नगरसेवक सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे अडचणीत आले होते; त्यामुळे या सर्वांनी पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन तांत्रिक चुकीचा फटका नगरसेवकांना बसू नये, अशी विनंती केली होती. मंत्री पाटील यांनीही सकारात्मक दृष्टीने हा विषय हाताळून कायद्यात भूतलक्षीप्रभावाने बदल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने निर्णय घेतला; परंतु यासंबंधीचे अधिकृत वटहुकूम अथवा राजपत्र मिळाले नसल्यामुळे १८ नगरसेवकांना महापालिकेच्या कामकाजापासून दूर राहावे लागले होते.

कायद्यात बदल केल्याचा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या सहीचा अध्यादेश २७ सप्टेंबर २०१८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध झाला. त्याची अधिकृत माहिती सोमवारी महापालिका प्रशासनास प्राप्त झाली. नगरसचिव दिवाकर कारंडे, निवडणूक अधिकारी विजय वणकुद्रे यांनी हा अध्यादेश वाचून पाहिला. त्यानंतर त्यांनी १८ नगरसेवकांना आजपासून नियमित कामकाजात भाग घेता येईल, असे स्पष्ट केले.तीन वर्षे गेली न्यायालयीन लढाईतमहानगरपालिकेवर निवडून आलेल्या २० नगरसेवकांची तब्बल तीन वर्षे केवळ न्यायालयीन लढाई लढण्यात गेली. आधी जातीचे दाखले वैध की अवैध यावर न्यायालयात फेºया झाल्या. त्यातून मोकळे होतात न होतात तोच सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्रे निवडणूक आयोगास सादर न केल्यामुळे पुन्हा एकदा न्यायालयीन लढाई झाली. एका नगरसेवकास मात्र घरी जावे लागले, तर एक नगरसेविकेची लढाई अद्याप सुरुच आहे. तीन वर्षे आणि लाखो रुपये नगरसेवक पद टिकविण्यात गेल्यानंतर आता कुठे सर्व संकटे दूर झाल्याने नगरसेवकांचा जीव भांड्यात पडला.मार्ग मोकळा झालेले नगरसेवक -* कॉँग्रेस - स्वाती यवलुजे, संदीप नेजदार, सुभाष बुचडे, दीपा मगदूम, वृषाली कदम, रिना कांबळे

* राष्टवादी कॉँग्रेस - हसिना फरास, सचिन पाटील, अफजल पीरजादे, शमा मुल्ला

* ताराराणी आघाडी - किरण शिराळे, सविता घोरपडे, कमलाकर भोपळे

* भारतीय जनता पक्ष - मनीषा कुंभार, अश्विनी बारामते, विजयसिंह खाडे, संतोष गायकवाड

* शिवसेना - नियाज खान

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर