शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

... तरच महाराष्ट्रालाही रणजी चषक जिंकता येईल--शंतनु सुगवेकर, माजी कर्णधार, महाराष्ट्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:11 IST

दीर्घकाळ क्रिकेटमध्ये टिकण्याकरिता जिल्हा विभाग, रणजी, इराणी करंडक हाच खरा आदर्श नमुना आहे. त्यामुळे नवोदित क्रिकेटपटूंनी खरे क्रिकेट काय आहे, हे समजून घेणे काळाची गरज आहे.

ठळक मुद्देचर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद

सचिन भोसले ।सध्या आयपीएल आणि महिन्याच्या शेवटी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेटचे वारे वाहू लागले आहे. यासह गेले कित्येक वर्षे महाराष्ट्र रणजी सामन्यात अपेक्षित अशी कामगिरी केलेली नाही. केदार जाधवचा अपवाद वगळता आजच्या घडीला एकाही महाराष्ट्रीयन खेळाडूची भारतीय संघात वर्णी लागलेली नाही. या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आलेले महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार शंतनु सुगवेकर यांच्याशी साधलेला थेट संवाद.राज्यातील क्रिकेटची सद्यस्थिती काय आहे ?

उत्तर : सध्या राज्यात पूर्वीसारख्या स्पर्धा होत नाहीत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धा होत नाहीत. विशेष म्हणजे रणजी संघातील संभाव्य खेळाडू निवडण्यासाठी जिल्हा निमंत्रित संघांची स्पर्धा फेबु्रवारीमध्ये होते. तर त्यातून निवडला जाणारा संघ नोव्हेंबरमध्ये राज्याचे रणजी स्पर्धेत प्रतिनिधीत्व करतो. या दरम्यानच्या कालावधीत खेळाडूचा परफॉर्मन्स कितपत टिकून राहील, याबाबत शंका असते; त्यामुळे रणजी करंडक स्पर्धेत अपेक्षित कामगिरी होत नाही.

क्रिकेटपटूंनी राष्ट्रीय संघात निवड होण्यासाठी काय केले पाहिजे ?उत्तर : सर्वांत आधी राज्यातील प्रत्येक क्रिकेटपटूंनी मनाशी ठरविले पाहिजे की, मला महाराष्ट्र संघासाठी खेळायचे आहे. त्यापुढे मला राष्ट्रीय संघासाठी खेळायचे आहे. हा अ‍ॅटिट्यूड ठेवल्यास तुम्ही यशस्वी होऊ शकता. सातत्य हीच तर क्रिकेटची खासियत आहे.महाराष्ट्र रणजी का जिंकू शकत नाही? उत्तर : विदर्भ क्रिकेट असोसिएशनने प्रशासन आणि क्रिकेट हे दोन वेगळे भाग केले आहेत. त्यांनी सलग दोन वर्षे रणजी विजेतेपद पटकाविले आहे. ही किमया करण्यासाठी त्यांनी गेली सहा ते सात वर्षे कष्ट घेतले आहेत. महाराष्ट्र संघालाही रणजी चषक स्पर्धेसाठी संघ निवडीचे स्वरूप बदलणे गरजेचे आहे.संडे स्पेशल मुलाखतसुगवेकर यांची कारकीर्दशंतनु यांनी १९८७ ते २००१ या १४ वर्षांच्या कालावधीत १९ वर्षांखालील भारतीय संघातून आॅस्ट्रेलियाविरूद्ध प्रतिनिधीत्व, तर रणजी, दुलिप करंडक, इराणी करंडक महाराष्ट्रकडून प्रतिनिधीत्व, कर्णधार पद सांभाळले. स्पर्धेत सार्क चषकमध्ये भारतीय संघाकडून बांग्लादेशविरूद्ध प्रतिनिधीत्व केले होते, तर बीसीसीआय बोर्ड अध्यक्षीय संघाचेही प्रतिनिधीत्व केले आहे. मध्यप्रदेश संघाविरोधात रणजीमध्ये नाबाद २९९ खेळी सर्वोत्कृष्ट खेळी ठरली आहे, तर प्रथमश्रेणीचे एकूण ८५ सामने खेळले आहेत. यात ६५८३ धावा ६१.१० सरासरीने केल्या आहेत. २००४ मध्ये १६, १९ व रणजी संघाच्या निवड समितीचे सदस्य म्हणूनही काम केले आहे.

टॅग्स :IPLआयपीएलMaharashtraमहाराष्ट्र