शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राजर्षी शाहू महाराजांचे विचारच ध्रुवीकरण रोखतील, शाहू छत्रपतींनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 12:07 IST

मशिदीवरील भोंगे आणि हनुमान दर्शनासारखे लोकशाहीमध्ये महत्त्व नसलेले विषय पुढे येत आहेत.

कोल्हापूर : मशिदीवरील भोंगे आणि हनुमान दर्शनासारखे लोकशाहीमध्ये महत्त्व नसलेले विषय पुढे येत आहेत. परंतु या सर्व ध्रुवीकरणाला छत्रपती शाहू महाराजांचे विचारच रोखतील, असा विश्वास शाहू छत्रपती यांनी व्यक्त केला.

राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दीनिमित्त आयोजित कृतज्ञता पर्वाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्यायमंत्री विश्वजित कदम, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शाहू छत्रपती म्हणाले, १२० वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी सर्व मंदिरे सर्व जाती-धर्मातील लोकांसाठी खुली केली. नंतर देशात कायदा केला गेला. सध्याच्या परिस्थितीमध्ये शाहूंचे विचार पुढे नेण्यासाठी प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. लोकप्रतिनिधींवर ही जबाबदारी असून याची सुरुवात कोल्हापूरमधून झाली आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारने यात योगदान द्यावे.

ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, मी ज्या शाळेत शिकलो, ज्या वसतिगृहात राहिलो, महाविद्यालयात शिकलाे, त्या सर्व शाहू महाराजांच्याच नावच्या संस्था आहेत. एकाअर्थाने मी ‘शाहू प्रॉडक्ट’ आहे.

मंत्री विश्वजित कदम म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते बालगंधर्वांपर्यंत अनेकांना शाहू महाराजांनी पाठबळ दिले. त्यांच्या विचाराचा धागा पकडून तृतीयपंथीयांना ओळखपत्रे देण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, शाहू महाराजांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी गेले काही महिने लोकप्रतिनिधी, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते राबत होते. या माध्यमातून ६० हून अधिक कार्यक्रम केवळ एका महिन्यात घेण्यात आले. २६ जून रोजी शाहू जन्मस्थळ लोकार्पण करण्याचा मानस आहे.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अजूनही शाहू विचारांचा किती पगडा आहे, हे कोल्हापूरच्या नागरिकांनी दाखवून दिले आहे. मागासलेल्यांना १००/१०० एकर जागा वाटणारा असा हा विलक्षण लोकराजा होता. याच काळात राज्यात धार्मिक तेढ वाढविण्याचे काम सुरू असताना कोल्हापूर शांत राहिले. याला शाहूंचे विचारच कारणीभूत आहेत.

शाहू महाराजांचे आगमन अन् सभागृहाचे अभिवादन

यानिमित्ताने हिलरायडर्स निर्मित आणि सागर बगाडे दिग्दर्शित शाहू राज्यारोहण कार्यक्रम सादर करण्यात आला. प्रेक्षकांमधूनच लवाजम्यासह शाहू महाराज रंगमंचावर आले. तेव्हा त्यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण सभागृह उठून उभे राहिले. यावेळी शाहू महाराजांच्या घोषणांनी केशवराव भोसले नाट्यगृह दुमदुमून गेले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती