शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

अहो, ती नाही.... पण तिच्यासारखीच मिळणार, शासकीय कार्यालयांमध्ये जुन्या पेन्शनचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 12:01 IST

संपाच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर समाजातून टीका

कोल्हापूर : जुन्या पेन्शनसाठीच्या मागणीसाठीचा संप मागे घेतला तरी मंगळवारी दिवसभर शासकीय कार्यालयांमध्ये, शाळाशाळांमध्ये एकच चर्चा होती. ती म्हणजे, ‘ती नाही... पण तिच्यासारखी मिळणार.’ जुन्या पेन्शनबाबत चर्चा करण्यातच अनेकांचा दिवस सरला आहे.जुन्या पेन्शनसाठी गेले आठ दिवस सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. एकीकडे मार्च एन्डची घाई, विधानसभेचे सुरू असलेले अधिवेशन या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी कर्मचारी संपावर गेल्याने साहजिकच बहुतांशी कामे ठप्प झाली. अनेक शासकीय कार्यालयांमध्ये केवळ कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेऊन अधिकाऱ्यांनी कसाबसा कारभार हलता ठेवला होता. परंतु आठवड्याभरानंतर मात्र मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हा संप मागे घेत असल्याची घोषणा मुंबईतून केली गेली. त्यामुळे मंगळवारपासून शासकीय कार्यालये सुरू झाली. परंतु परस्पर आंदोलन मागे घेतल्यामुळे काही ठिकाणी रोषही व्यक्त होत आहे.परंतु हे आंदोलन मागे घ्यायला कारणेही तशीच आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन देता येणार नाही असे स्पष्टपणे सांगितले होते. तरीही जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. त्यामुळे या समितीचा अहवाल आल्याखेरीज शासन काहीही निर्णय घेणार नाही हे स्पष्ट झाले. त्यामुळे आणखी आठ दिवस आंदोलन केले असते तरी त्यावेळीही हेच आश्वासन घेऊन आंदोलन मागे घ्यावे लागले असते. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यासाठी हेदेखील एक कारण आहे.ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तिची सुनावणीही दोन दिवसात आहे. जर या सुनावणीवेळी हा संप बेकायदेशीर ठरवला गेला असता तर तोही आंदोलनाला मोठा धक्का बसला असता. त्यामुळे याचाही विचार आंदोलन मागे घेताना केला गेला.समाजमन विरोधातशासकीय कर्मचाऱ्यांच्या यावेळच्या संपाच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर समाजातून टीका होऊ लागली होती. यांना पगार पाहिजे, लाच पाहिजे आणि पेन्शनही पाहिजे अशी टीका समाजमाध्यमांवर होऊ लागली. मोर्चासाठी पार्किंग केलेल्या कर्मचारी, शिक्षक यांच्या हायफाय गाड्यांचे फोटो फिरू लागले आणि कधी नव्हे ते समाजमन विरोधी जाऊ लागल्याने त्याचाही विचार यावेळी केला गेला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकारPensionनिवृत्ती वेतन