शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

इमारत बांधणीच्या केवळ चर्चाच

By admin | Updated: December 9, 2014 23:24 IST

करवीर पंचायत समिती : बांधकामाबाबत सभागृहात सदस्य बोलत नाहीत

रमेश पाटील -कसबा बावडा -‘करवीर’ पंचायत समितीच्या नुतन इमारत बांधणीची चर्चा आता सहा महिन्यानंतर हवेतच विरून गेली आहे. इमारत सध्या आहे त्या जागी बांधायची की शेंडापार्कातील जागेत बांधायची याबाबत सदस्यामध्ये वाद होऊन चक्क दोन गट पडले होते. आता या गोष्टीला सहा महिने झाले. सहा महिन्यानंतरही इमारतबाबत प्रशासन आणि सदस्य काहीच हालचाल करताना दिसत नाहीत. तसेच सदस्यही या विषयावर सभागृहात बोलत नाहीत. त्यामुळे समितीचा कारभार पत्र्याच्या शेडमध्येच पूर्वीप्रमाणेच अजून काही वर्षे चालत राहील, असे सध्याचे तरी चित्र आहे. करवीर पंचायत समितीची इमारत सध्या ज्या जागेवर आहे, त्या जागेबाबत न्यायालयात दावा सुरू आहे. त्यामुळे सध्याच्या जागेत नवीन इमारत बांधता येत नाही. तसेच शहरात कोठेही अशी मोठी जागा उपलब्ध होत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे करवीर पंचायत समितीचे नवीन इमारतीचे स्वप्न अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. करवीर पंचायत समितीचे कार्यालय सध्याच्या जागेवरून शेंडापार्क येथे हलवण्याचा प्रयत्न तत्कालीन सभापती दिलीप टिपुगडे यांनी केला होता. परंतु उपसभापती दत्तात्रय मुळीक आणि जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील तसेच समितीच्या अन्य सदस्यांनी या स्थलांतराला विरोध केला. कारण समितीचे सध्याचे कार्यालय सर्वांच्याच सोयीचे आहे. या कार्यालयाजवळच जिल्हा परिषद, सी.पी.आर., तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी कार्यालय असल्याने लोकांना पंचायत समितीमधील कामे करता येते. परिणामी त्यांचा वेळ आणि प्रवासखर्च वाचतो. त्यामुळे शेंडापार्कातील जागेला विरोध केल्याचे मुळीक यांचे म्हणणे होते. तर सध्याच्या जागेचा वाद न्यायालयात गेला आहे. निकाल केव्हा लागेल हे सांगता येत नाही. तसेच शहरात प्रशस्त अशी मोठी जागा मिळणार नाही म्हणून शेंडापार्कातील जागा योग्य असल्याचे दिलीप टिपुगडे यांचे मत होते. मात्र त्यांना अन्य सदस्यांनी विरोध केला. सदस्यांच्या या वादाला सहा महिने झाले तरी इमारत कोठे बांधायची यावर एकमत सदस्यात झाले नाही. दरम्यान, या जागेच्या वादाचा प्रश्न सहा महिन्यापूर्वी म्हणजेच जून महिन्यात उपस्थित केला गेला होता. त्यानंतर प्रत्येक महिन्याला मासिक सभा झाली. मात्र एकाही सदस्याने नवीन इमारत कोठे बांधणार यावर चर्चाही केलेली नाही.निधी उपलब्ध होतो, पण एकमत नाहीनवीन इमारत बांधण्यासाठी शासन वाट्टेल तेवढा निधी उपलब्ध करते. सध्या जिल्ह्यातील राधानगरी, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, गगनबावडा, आजरा पंचायत समित्या नवीन इमारतीत स्थलांतर झाल्या आहेत. मात्र सुजलाम-सुफलाम म्हणून स्वत:ला मिरवणारी करवीर पंचायत जुन्याच इमारतीमधून आपला कारभार हाकते. समितीच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन सर्वांच्या सोयीची अशी इमारतीसाठी जागा निवडावी किंवा सध्या आहे त्या जागेबाबत जागामालकांशी काही तडजोड होते का ते पहावे आणि सुंदर इमारत उभारावी, एवढीच अपेक्षा करवीरच्या जनतेची आहे.