शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
7
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
8
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
9
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
10
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
11
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
12
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
13
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
14
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
15
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
16
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
17
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
18
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
19
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
20
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
Daily Top 2Weekly Top 5

‘जल आराखड्यात’ केवळ ‘भाषणबाजी’च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2015 01:13 IST

व्यापक बैठकीची मागणी : शेतकऱ्यांना सोबत घेऊन नियोजनाची गरज

राम मगदूम - गडहिंग्लज -शेतकऱ्यांऐवजी पुढाऱ्यांचीच गर्दी आणि सल्ला मसलतीऐवजी फक्त भाषणबाजीच अधिक झाल्यामुळे गडहिंग्लजमधील जल आराखडा कार्यशाळा म्हणजे केवळ सोपस्कारच ठरला. त्यामुळे घटप्रभा उपखोऱ्यातील ‘जल आराखड्यासाठी’ संबंधित सर्व खात्यांचे अधिकारी, शेती व पाणीतज्ज्ञांच्या उपस्थितीत पुन्हा व्यापक बैठक बोलावण्यात यावी, अशी समस्त शेतकरी बांधवांची मागणी आहे.महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातर्फे घटप्रभा उपखोऱ्यातील एकात्मिक जल आराखडा प्रारूप स्वरूपात तयार करण्यात आला आहे. त्यावर उपखोऱ्यातील लाभार्थी शेतकरी-पाणी वापरकर्ते यांच्याशी सल्ला मसलत करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मात्र, ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात ही कार्यशाळा झाल्यामुळे अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.गडहिंग्लज विभागात ‘घटप्रभा’ ही प्रमुख नदी, तर हिरण्यकेशी, ताम्रपर्णी व मार्कंडेय या उपनद्या आहेत. कृष्णा पाणी वाटप लवादानुसार या विभागाच्या वाट्याला ७ टीएमसी पाणी मिळाले आहे. त्यासाठी जंगमहट्टी, चित्री, फाटकवाडी, जांबरे, उचंगी, सर्फनाला व आंबेओहळ या धरणांची कामे हाती घेण्यात आली. यापैकी उचंगी, सर्फनाला व आंबेओहळ या प्रकल्पाची कामे रखडली आहेत. वाट्याला आलेल्या पाण्याचा कोटा संपल्यामुळे तीन टीएमसीचा ‘किटवडे’ प्रकल्प अद्याप कागदावरच आहे. तो पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणी व भविष्यासाठी लागणारे पाणी यावर विचारमंथन होऊन परिपूर्ण आराखडा आणि ठोस कृती कार्यक्रम निश्चित होण्याची गरज आहे. मात्र, गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तालुक्यांतील शेतकरी आणि बहुतेक लोकप्रतिनिधींनी जल आराखड्याच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली, त्यामुळेच ही कार्यशाळा फक्त ‘सरकारी’ ठरली.यांनीही फिरवली पाठकृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक व माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, माजी आमदार नरसिंगराव पाटील, श्रीपतराव शिंदे व माजी जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनीही याकडे पाठ फिरवली. त्यांच्या अनुभवांची व सूचनांची नोंद घेणे आवश्यक आहे.अर्धवट प्रकल्पांचे काय ?निधी आणि पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे रखडलेल्या उचंगी, सर्फनाला व आंबेओहळ या प्रकल्पांचे काय होणार ? याविषयी संबंधित शेतकरी व प्रकल्पग्रस्त संभ्रमात आहेत. त्यामुळे या अर्धवट प्रकल्पांचे काय होणार ? याचेही उत्तर मिळायला हवे.२५० टीएमसी पाणी जाते वाया दरवर्षी घटप्रभा उपखोऱ्यातून सुमारे २५० टीएमसी पाणी वाया जाऊन कर्नाटकात जाते. या अतिरिक्त पाण्याबरोबरच पावसामुळे उपलब्ध होणारे स्थानिक व बाहेरून येणाऱ्या पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन व्हायला हवे. यासाठी कृषी, वन, जलसंधारण आणि पाटबंधारे आदी संबंधित विभागांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना सोबत घेऊन परिपूर्ण व आदर्श जल आराखडा बनवायला हवा. नसमन्यायी व गावनिहाय वाटणीघटप्रभा उपखोऱ्यातील लोकसंख्या आणि लागवडीलायक सिंचन क्षेत्र किती ? पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरासाठी किती पाणी लागणार ? धरणे व तलावात साठले जाणारे आणि अडविल्या जाणाऱ्या पाण्याचे समन्यायी व गावनिहाय वाटणी कशी करणार ? प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी कसे पोहोचणार ? याचाही कृती कार्यक्रम ठरवायला हवा.