शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

अंबाबाई मंदिराचे नुसतेच आराखडे

By admin | Updated: March 30, 2017 01:27 IST

विकासाची कोटींची उड्डाणे कागदावरच : आठ वर्षे फक्त चर्चा, सूचना, दुरुस्त्या, बदल

इंदुमती गणेश -- कोल्हापूर --अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यांचा फेरा आठ वर्षांनंतरही सुटलेला नाही. शहराच्या दोन हजार कोटींच्या आराखड्यापासून सुरू झालेला हा प्रवास १२० कोटी, त्यानंतर ५० कोटी, पुढे सूचना, दुरुस्त्या करून २५० कोटी, पहिला टप्पा ७० कोटींचा आणि आता ९० कोटींचा झाला आहे. कोट्यवधींची ही उड्डाणे कागदावरच झाली असून अंबाबाई मंदिरात इंचभरही बदल झालेला नाही. नव्या चर्चा, सादरीकरण, सूचना, बदल आणि फेरआराखडा या फेऱ्यातून करवीर निवासिनी श्री अंबाबाईची सुटका कधी होणार, असा प्रश्न पडला आहे. एखाद्या देवस्थानालादेखील लालफितीच्या शासकीय कारभाराच्या दुर्दैवाचा फेरा कसा लागतो याचे उत्तम उदाहरण म्हणून आता अंबाबाई मंदिर सांगता येईल. सन २००९ सालापासून सुरू झालेले आराखड्याचे फेरे आठ वर्षांनंतरही थांबलेले नाहीत. साडेतीन शक्तिपीठ असलेल्या अंबाबाई मंदिराला दरवर्षी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लाखोंनी वाढ होत असताना अंबाबाई मंदिराचे जतन, संवर्धन, भाविकांसाठी अन्नछत्र, यात्री-निवास पार्किंगसारख्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात अद्याप महापालिका आणि देवस्थान समितीला यश आलेले नाही. अंबाबाई मंदिराचा पहिला आराखडा सादर झाला सन २००९ मध्ये. स्थलांतराला परिसरातील नागरिकांनी विरोध केला. त्यानंतर पुढील तीन वर्षे तोच आराखडा फिरवून मांडला जायचा. चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी हा विषय मनावर घेतला आणि आराखड्यात दुरुस्त्या, बदल सुचविले. आराखडा जनतेसमोर सादर झाल्यावर पुन्हा दुरूस्त्या झाल्या, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत चंद्रकांतदादांनी आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर विभागीय आयुक्तांनी त्यावर बरेच बदल, स्फुटणी, आॅडिट अशा सूचना दिल्या. आता देवस्थान समितीच्यावतीने करण्यात येणाऱ्या जतन संवर्धन आणि अन्य कामांचा समावेश करून पहिल्या टप्प्यातील आराखडा ९० कोटींवर गेला आहे. तो सोमवारी शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. हे विषय लागले मार्गी...केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण २०१४ मध्ये सुरू झाले आणि हे काम दीड ते पावणेदोन वर्षांत संपले. आता दुसऱ्या टप्प्यासाठी तयारी सुरू झाली आहे. कोल्हापूर चित्रनगरी विकासकामांचा नारळ फुटून आता तेथे दिमाखात नवे भव्य सेट उभारले जात आहेत. गेल्या वर्ष दीड-वर्षात बनविण्यात आलेल्या जोतिबा मंदिराच्या २५ कोटींच्या आराखड्यालाही शासनाने काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली. मात्र, सर्वांत आधी तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार होऊनही तो मार्गी लागलेला नाही.