शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

धरणांत फक्त २३ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:39 IST

नसिम सनदी। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उष्णतेच्या लाटेने झालेले बाष्पीभवन आणि निवडणुकीच्या काळात लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे वाढविलेल्या विसर्गामुळे मे ...

नसिम सनदी।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : उष्णतेच्या लाटेने झालेले बाष्पीभवन आणि निवडणुकीच्या काळात लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे वाढविलेल्या विसर्गामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच धरणांनी तळ गाठल्याने कोल्हापूर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट आहे. जिल्ह्याची पिण्याची व पिकांची तहान भागविणाऱ्या चार मोठ्या धरणांतील पाणीसाठा आठवडाभरात तब्बल १०५ दशलक्ष घनमीटरने कमी झाला असून, आजच्या घडीला तो केवळ २३ टक्के उरला आहे. गतवर्षी याच वेळी ३९ टक्के साठा शिल्लक होता. नऊ मध्यम प्रकल्पांतही केवळ ३७ टक्के पाणी शिल्लक राहिल्याने उपसाबंदीची कुºहाडही कोसळली आहे.राधानगरी, दूधगंगा, वारणा, तुळशी यांसारखी चार मोठी धरणे आणि जोडीला नऊ मध्यम आणि ८५ लघु प्रकल्पांमुळे कोल्हापूर जिल्हा पाणीदार आहे. यावर्षी मात्र परिस्थिती वेगळी आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत ४० ते ५० टक्के साठा शिल्लक राहत होता. यावर्षी मात्र पावसाळ्यात सर्वच धरणे ओसंडून वाहूनसुद्धा उपलब्ध साठ्याची बचत करता आली नाही. याला प्रशासकीय गलथानपणा कारणीभूत ठरला आहे. त्यामुळेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे.जिल्ह्याचे भवितव्य हातात असणाºया चार मोठ्या धरणांतील पाणीसाठा तर आजवरच्या नीचांकावर पोहोचला असून, एकूण पाण्याच्या २५ टक्क्यांपेक्षाही साठा कमी झाला आहे. मागील वर्षापेक्षा हा साठा २८८.७९ दशलक्ष घनमीटरनी कमी झाला आहे. राधानगरी- १२, तुळशी- ७ , वारणा- २१, दूधगंगा १९ टक्के इतकी तूट गतवर्षीपेक्षाच्या तुलनेत दिसत आहे. त्यातच हवामान विभागाने मान्सूनचे आगमन लांबणार असल्याचे सांगितल्याने हे उपलब्ध पाणी जून महिनाअखेर म्हणून आजपासून दोन महिने पुरवून वापरणे हे पाटबंधारे विभागासमोर मोठे आव्हान असणार आहे. साहजिकच धरणातील विसर्ग, आवर्तन यांवर निर्बंध येत असून, उपसाबंदीही सुरू झाली आहे.आज आंदोलनाचा धडाकाधरणातील साठा एक चतुर्थांशपेक्षाही कमी झाल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार असल्याने उपसाबंदी सुरू केली आहे; पण त्याची सर्वाधिक झळ पिकांना बसत असल्याने शेतकरी आक्रमक होत आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचे नियोजन शेतकºयांनी केले आहे. आज, सोमवारी इरिगेशन फेडरेशन महावितरण व पाटबंधारे विभागाला जाब विचारणार आहे, तर इचलकरंजीचे कॉ. अप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी ते तेरवाड बंधाºयातील पाणी उपसा करण्यास परवानगी देण्यासाठी घेराओ घालणार आहेत.मध्यम प्रकल्प पाणीसाठा(दशलक्ष घनमीटरमध्ये )धरण आजचा टक्केवारी मागील वर्षाचीटक्केवारीकासारी २८.३७ ३६ ३६कडवी ३५.१८ ५० ५४कुंभी ३२.०४ ४२ ४३पाटगाव ३४.५७ ३३ ३२चिकोत्रा १८.१२ ४२ २२चित्री १५.२२ २९ ३८जंगमहट्टी ११.८७ ३५ ४३घटप्रभा १८.०८ ४१ ५६जांबरे ३.४६ १७ ३७मोठ्या धरणांतील पाणीसाठा (दशलक्ष घनमीटरमध्ये)धरण आजचा मागील गतवर्षी आजची मागील वर्षआठवडा आजचा टक्केवारी टक्केवारीराधानगरी ६२.३३ ८०.६६ ८८.२९ २८ ४०तुळशी ३९.३३ ४२.४३ ४५.९६ ४३ ५०वारणा १७६.७६ २१९.३४ ३४०.२७ २३ ४४दूधगंगा १२८.१६ १६९.४२ २२०.८५ १९ ३३एकूण ४०६.५८ ५११.८५ ६९५.३७ २३ ३९