शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

धरणांत फक्त २३ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:39 IST

नसिम सनदी। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उष्णतेच्या लाटेने झालेले बाष्पीभवन आणि निवडणुकीच्या काळात लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे वाढविलेल्या विसर्गामुळे मे ...

नसिम सनदी।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : उष्णतेच्या लाटेने झालेले बाष्पीभवन आणि निवडणुकीच्या काळात लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे वाढविलेल्या विसर्गामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच धरणांनी तळ गाठल्याने कोल्हापूर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट आहे. जिल्ह्याची पिण्याची व पिकांची तहान भागविणाऱ्या चार मोठ्या धरणांतील पाणीसाठा आठवडाभरात तब्बल १०५ दशलक्ष घनमीटरने कमी झाला असून, आजच्या घडीला तो केवळ २३ टक्के उरला आहे. गतवर्षी याच वेळी ३९ टक्के साठा शिल्लक होता. नऊ मध्यम प्रकल्पांतही केवळ ३७ टक्के पाणी शिल्लक राहिल्याने उपसाबंदीची कुºहाडही कोसळली आहे.राधानगरी, दूधगंगा, वारणा, तुळशी यांसारखी चार मोठी धरणे आणि जोडीला नऊ मध्यम आणि ८५ लघु प्रकल्पांमुळे कोल्हापूर जिल्हा पाणीदार आहे. यावर्षी मात्र परिस्थिती वेगळी आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत ४० ते ५० टक्के साठा शिल्लक राहत होता. यावर्षी मात्र पावसाळ्यात सर्वच धरणे ओसंडून वाहूनसुद्धा उपलब्ध साठ्याची बचत करता आली नाही. याला प्रशासकीय गलथानपणा कारणीभूत ठरला आहे. त्यामुळेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे.जिल्ह्याचे भवितव्य हातात असणाºया चार मोठ्या धरणांतील पाणीसाठा तर आजवरच्या नीचांकावर पोहोचला असून, एकूण पाण्याच्या २५ टक्क्यांपेक्षाही साठा कमी झाला आहे. मागील वर्षापेक्षा हा साठा २८८.७९ दशलक्ष घनमीटरनी कमी झाला आहे. राधानगरी- १२, तुळशी- ७ , वारणा- २१, दूधगंगा १९ टक्के इतकी तूट गतवर्षीपेक्षाच्या तुलनेत दिसत आहे. त्यातच हवामान विभागाने मान्सूनचे आगमन लांबणार असल्याचे सांगितल्याने हे उपलब्ध पाणी जून महिनाअखेर म्हणून आजपासून दोन महिने पुरवून वापरणे हे पाटबंधारे विभागासमोर मोठे आव्हान असणार आहे. साहजिकच धरणातील विसर्ग, आवर्तन यांवर निर्बंध येत असून, उपसाबंदीही सुरू झाली आहे.आज आंदोलनाचा धडाकाधरणातील साठा एक चतुर्थांशपेक्षाही कमी झाल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार असल्याने उपसाबंदी सुरू केली आहे; पण त्याची सर्वाधिक झळ पिकांना बसत असल्याने शेतकरी आक्रमक होत आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचे नियोजन शेतकºयांनी केले आहे. आज, सोमवारी इरिगेशन फेडरेशन महावितरण व पाटबंधारे विभागाला जाब विचारणार आहे, तर इचलकरंजीचे कॉ. अप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी ते तेरवाड बंधाºयातील पाणी उपसा करण्यास परवानगी देण्यासाठी घेराओ घालणार आहेत.मध्यम प्रकल्प पाणीसाठा(दशलक्ष घनमीटरमध्ये )धरण आजचा टक्केवारी मागील वर्षाचीटक्केवारीकासारी २८.३७ ३६ ३६कडवी ३५.१८ ५० ५४कुंभी ३२.०४ ४२ ४३पाटगाव ३४.५७ ३३ ३२चिकोत्रा १८.१२ ४२ २२चित्री १५.२२ २९ ३८जंगमहट्टी ११.८७ ३५ ४३घटप्रभा १८.०८ ४१ ५६जांबरे ३.४६ १७ ३७मोठ्या धरणांतील पाणीसाठा (दशलक्ष घनमीटरमध्ये)धरण आजचा मागील गतवर्षी आजची मागील वर्षआठवडा आजचा टक्केवारी टक्केवारीराधानगरी ६२.३३ ८०.६६ ८८.२९ २८ ४०तुळशी ३९.३३ ४२.४३ ४५.९६ ४३ ५०वारणा १७६.७६ २१९.३४ ३४०.२७ २३ ४४दूधगंगा १२८.१६ १६९.४२ २२०.८५ १९ ३३एकूण ४०६.५८ ५११.८५ ६९५.३७ २३ ३९