शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘चिकोत्रा’ धरणात अवघे २२ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:49 IST

दत्ता पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : चिकोत्रा खोऱ्यातील नागरिकांसह शेतीची तहान भागविण्यासाठी १८ वर्षांपूर्वी चिकोत्रा नदीवर बांधण्यात आलेले झुलपेवाडी धरण केवळ दोन वेळाच पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे धरण भरल्यानंतर जादा होणारे पाणी बाहेर जाण्यासाठी बांधण्यात आलेला सांडवा (ओव्हरफ्लो गेट) पाण्याच्या प्रतीक्षेत असलेला पाहायला मिळतो. तब्बल बारा वर्षांपासून धरणातील पाणी या गेटपर्यंत ...

दत्ता पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : चिकोत्रा खोऱ्यातील नागरिकांसह शेतीची तहान भागविण्यासाठी १८ वर्षांपूर्वी चिकोत्रा नदीवर बांधण्यात आलेले झुलपेवाडी धरण केवळ दोन वेळाच पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे धरण भरल्यानंतर जादा होणारे पाणी बाहेर जाण्यासाठी बांधण्यात आलेला सांडवा (ओव्हरफ्लो गेट) पाण्याच्या प्रतीक्षेत असलेला पाहायला मिळतो. तब्बल बारा वर्षांपासून धरणातील पाणी या गेटपर्यंत पोहोचलेलेच नाही. त्यामुळे यंदा तरी हे धरण ओव्हरफ्लो होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या या धरणात अवघे २२ टक्के म्हणजेच ३२९ एमसीएफटी पाणीसाठा झाला आहे, तर धरणाच्या पुढे चिकोत्रा नदी काटोकाट वाहत आहे. हा विरोधाभास सहजतेने जाणवतो.चिकोत्रा खोºयातील पाण्याचे दुर्भिक्ष पाहून प्रशासनाने कागल तालुक्याच्या दक्षिणेकडे आजरा तालुक्याच्या हद्दीत झुलपेवाडी येथे चिकोत्रा (झुलपेवाडी) धरणाची उभारणी केली. मात्र, अत्यल्प पाणलोट क्षेत्रामुळे हे धरण अतिवृष्टीची २००५ व २००७ ही दोन वर्षे वगळता पूर्ण क्षमतेने भरलेच नाही.यावर्षीही पावसाचे पडणारे पाणी मोठ्या प्रमाणात वाहूनच जात आहे. सध्या चिकोत्रा नदी दुथडी वाहत आहे. मात्र, धरणातील पाणीसाठ्याची पातळी अत्यंत संथगतीने वाढत आहे.जिल्ह्यातील सर्व लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरले आहेत, तर मोठी धरणे ५० टक्क्यांहून अधिक भरली आहेत; परंतु चिकोत्रा धरण केवळ २२ टक्क्यांवरच आले आहे. हा महिनाच हक्काचा पाऊस असतो. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रशासनाने हालचाली गतिमान करणे आवश्यक आहे. धरणक्षेत्रातून वाया जाणारे पाणी या धरणात वळविण्याची गरज आहे.चिकोत्रा खोºयात आजरा, भुदरगडसह कागलमधील ३५ गावांचा समावेश आहे. या धरणाची क्षमता अवघी दीड टीमसी इतकीच आहे. जर हे पूर्ण क्षमतेने भरले तर ३५ गावांच्या पिण्यासह ५ हजार ६२० एकर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे; परंतु दुर्दैव म्हणजे हे धरण भरतच नाही.दरम्यान, धरणक्षेत्रात गेल्या २४ तासांत १३४ मि.मी. पाऊस पडला असून, आजअखेर ९०८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या सुरुवातीला धरणात १८० एमसीएफटी पाणी शिल्लक होते, तर आता ३२९ एमसीएफटी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. म्हणजेच काळम्मावाडी धरणातून दूधगंगेत एकावेळी सोडल्या जाणाºया पाण्याचा निम्माही हा पाणीसाठा नाही. काळम्मावाडीतून एकाचवेळी साधारणत: ५०० एमसीएफटीहून अधिक पाणी नदीपात्रात सोडले जाते....तर आंदोलनाची तीव्रता वाढणारगेल्या दोन महिन्यांपासून किसान सभेच्या माध्यमातून हे धरण पूर्ण क्षमतेने भरावे तसेच नागणवाडी प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी विशेष लक्ष देण्याचे अभिवचन दिल्यामुळे हे आंदोलन थांबले आहे; परंतु दिवाळीपर्यंत याबाबत हालचाली न झाल्यास पुन्हा आंदोलनाची तीव्रता वाढविण्याशिवाय येथील जनतेला पर्यायच नाही.पाण्याचा संपर्क नसणारे एकमेव सांडवा गेट..!धरण भरल्यानंतर अतिरिक्त पाणी जाण्यासाठी या धरणाच्या दक्षिण बाजूला वक्राकार सांडवा गेट आहे. मात्र, गेल्या बारा वर्षांपासून या गेटपर्यंत पाणीच न गेल्याने हे गेट उघडलेले नाही. या गेटची उघडझाप होत नसल्यामुळे त्याच्यावर गंज चढत आहे. १८ वर्षांत केवळ दोन वेळाच उघडले जाणारे हे एकमेव गेट आहे.