शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

शासकीय कार्यालयांत आता १५ टक्केच कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:26 IST

कोल्हापूर : कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांतर्गत आता राज्य, केंद्र व स्थानिक प्राधिकरणाच्या शासकीय कार्यालयांमध्ये ...

कोल्हापूर : कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांतर्गत आता राज्य, केंद्र व स्थानिक प्राधिकरणाच्या शासकीय कार्यालयांमध्ये केवळ १५ टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी हे आदेश काढले असून, त्यातून कोविड संसर्ग व्यवस्थापनाशी निगडीत सेवांना सूट देण्यात आली आहे.

या आदेशानुसार लग्न समारंभदेखील एका हॉलमध्ये २ तासांत आणि २५ लोकांच्या उपस्थितीत करता येईल. या नियमाचे उल्लंघन झाल्यास ५० हजार रुपये दंड लावण्यात येणार आहे. तसेच सर्व प्रवासी वाहतूक ५० टक्के क्षमतेसह अत्यावश्यक सेवांसाठी व फक्त शहराअंतर्गत मर्यादीत असेल. खासगी बसेस ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील. शासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, पॅरामेडिकल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रुग्णालय आणि वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्राच्या आधारावर सार्वजनिक वाहनाचा वापर करता येणार आहे.

---