शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कांदा महागला, फळांनी बाजार फुलला : भाजीपाल्याची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:47 IST

कांद्याच्या दरातील वाढ या आठवड्यातही कायम असून, किलोचा दर ३५ ते ४० रुपयांवर पोहोचला आहे. साखरेचे दरही दोन रुपयांनी वाढून ३८ रुपयांवर पोहोचले आहेत. खाद्यतेलासह धान्यबाजार स्थिर असून, मागणीअभावी बाजारही शांत आहे. भाजीपाल्याची आवक मात्र चांगलीच वाढली असून त्याचे दरही कमी झाले आहेत. फळांची आवक मोठ्या प्रमाणावर दिसत असून, सफरचंदांच्या लालभडक ढिगांनी बाजार फुलला आहे.

ठळक मुद्देकांदा महागला, फळांनी बाजार फुललासाप्ताहिक बाजारभाव : भाजीपाल्याची आवक वाढली

कोल्हापूर : कांद्याच्या दरातील वाढ या आठवड्यातही कायम असून, किलोचा दर ३५ ते ४० रुपयांवर पोहोचला आहे. साखरेचे दरही दोन रुपयांनी वाढून ३८ रुपयांवर पोहोचले आहेत. खाद्यतेलासह धान्यबाजार स्थिर असून, मागणीअभावी बाजारही शांत आहे. भाजीपाल्याची आवक मात्र चांगलीच वाढली असून त्याचे दरही कमी झाले आहेत. फळांची आवक मोठ्या प्रमाणावर दिसत असून, सफरचंदांच्या लालभडक ढिगांनी बाजार फुलला आहे.रविवारी लक्ष्मीपुरी बाजारपेठेत फेरफटका मारला असता, बाजार फळांनी आणि भाज्यांनी फुललेला दिसला. पावसानेही दिवसभर उघडीप दिल्याने बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. महापूर व अतिवृष्टीमुळे खरिपातील कांद्याचे पीक कुजल्याने गणेशोत्सवापासून सुरू होणाऱ्या नवीन कांद्याची आवक पूर्णपणे थंडावली आहे.

परिणामी, साठवणुकीच्या कांद्यावरच बाजाराच्या मागणीची पूर्तता केली जात आहे. गेल्या आठवड्यात २५ रुपये असणारा दर आता ३५ ते ४० रुपये किलोवर पोहोचला आहे. शिवाय कांद्याची प्रतही खालावलेलीच आहे. आल्याचे दरही अजून चढेच आहेत. १६० रुपये किलो दर आहे. लिंबूचे दरही वाढून आहेत.

अजूनही १० रुपयांना दोन ते तीन लिंबू अशीच विक्री सुरू आहे.कोथिंबिरीचे दर कमी झाले आहे. १० ते १५ रुपयांना पेंढी मिळत आहे. बाजार समितीतही ३४ हजार पेंढ्यांची आवक झाली आहे. पालेभाज्या मात्र बाजारात दुर्मीळ आहेत.

मेथीचे कुठेतरी दर्शन होत असून पेंढीचा दर २० रुपये आहे. कांदापात, शेपू, पालक १० रुपये पेंढी दर आहे. हिरवी मिरची ३० ते ४० रुपये किलो आहे. वांगी ५० रुपये किलो असून उर्वरित सर्व फळभाज्याही ५० ते ६० रुपये किलो अशाच आहेत.साखरेचे दर वाढत आहेत. किलोचा दर ३८ रुपयांवर गेला आहे. सणासुदीला नारळाची मागणी असल्याने त्याचाही दर नगाला २० ते ३५ रुपये आहे. उपवासासाठी शाबू व वरी ९० रुपये किलो आहे. तांदूळ २५ ते ६० रुपये, तर ज्वारी २८ ते ५२ रुपये असा दर कायम आहे. गहू दर ३० ते ३५ रुपये आहे. खाद्यतेलांमध्ये वाढ दिसत आहे. सरकी ९० रुपये, शेंगतेल १३५, सोयाबीन ९५, सूर्यफूल १२५ रुपये दर झाला आहे. मूग, मसूर, हरभराडाळ ६० ते ७० रुपयांपर्यंत आहे.सफरचंदांचे ढीगबाजारात सफरचंदांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. सिमला येथून इंडियन सफरचंदांची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने बाजार लालभडक झाला आहे दरही ४० ते ८० रुपये किलो असे आहेत. अननसांची आवक अजून कायम आहे. केळीची आवक वाढली असून दरही ३० ते ४० रुपये डझन आहेत. डाळींब ३० ते ५० रुपये किलो आहेत. आकाराने मोठे असलेले थायलंडचे पेरूही बाजारात दिसत असून नगाची किंमत ३० ते ४० रुपये आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर