शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
2
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
3
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
5
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
6
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
7
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
8
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
9
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
10
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
11
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
12
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
13
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
14
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
15
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
16
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
17
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
18
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
19
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
20
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे

कांदा महागला, फळांनी बाजार फुलला : भाजीपाल्याची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:47 IST

कांद्याच्या दरातील वाढ या आठवड्यातही कायम असून, किलोचा दर ३५ ते ४० रुपयांवर पोहोचला आहे. साखरेचे दरही दोन रुपयांनी वाढून ३८ रुपयांवर पोहोचले आहेत. खाद्यतेलासह धान्यबाजार स्थिर असून, मागणीअभावी बाजारही शांत आहे. भाजीपाल्याची आवक मात्र चांगलीच वाढली असून त्याचे दरही कमी झाले आहेत. फळांची आवक मोठ्या प्रमाणावर दिसत असून, सफरचंदांच्या लालभडक ढिगांनी बाजार फुलला आहे.

ठळक मुद्देकांदा महागला, फळांनी बाजार फुललासाप्ताहिक बाजारभाव : भाजीपाल्याची आवक वाढली

कोल्हापूर : कांद्याच्या दरातील वाढ या आठवड्यातही कायम असून, किलोचा दर ३५ ते ४० रुपयांवर पोहोचला आहे. साखरेचे दरही दोन रुपयांनी वाढून ३८ रुपयांवर पोहोचले आहेत. खाद्यतेलासह धान्यबाजार स्थिर असून, मागणीअभावी बाजारही शांत आहे. भाजीपाल्याची आवक मात्र चांगलीच वाढली असून त्याचे दरही कमी झाले आहेत. फळांची आवक मोठ्या प्रमाणावर दिसत असून, सफरचंदांच्या लालभडक ढिगांनी बाजार फुलला आहे.रविवारी लक्ष्मीपुरी बाजारपेठेत फेरफटका मारला असता, बाजार फळांनी आणि भाज्यांनी फुललेला दिसला. पावसानेही दिवसभर उघडीप दिल्याने बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. महापूर व अतिवृष्टीमुळे खरिपातील कांद्याचे पीक कुजल्याने गणेशोत्सवापासून सुरू होणाऱ्या नवीन कांद्याची आवक पूर्णपणे थंडावली आहे.

परिणामी, साठवणुकीच्या कांद्यावरच बाजाराच्या मागणीची पूर्तता केली जात आहे. गेल्या आठवड्यात २५ रुपये असणारा दर आता ३५ ते ४० रुपये किलोवर पोहोचला आहे. शिवाय कांद्याची प्रतही खालावलेलीच आहे. आल्याचे दरही अजून चढेच आहेत. १६० रुपये किलो दर आहे. लिंबूचे दरही वाढून आहेत.

अजूनही १० रुपयांना दोन ते तीन लिंबू अशीच विक्री सुरू आहे.कोथिंबिरीचे दर कमी झाले आहे. १० ते १५ रुपयांना पेंढी मिळत आहे. बाजार समितीतही ३४ हजार पेंढ्यांची आवक झाली आहे. पालेभाज्या मात्र बाजारात दुर्मीळ आहेत.

मेथीचे कुठेतरी दर्शन होत असून पेंढीचा दर २० रुपये आहे. कांदापात, शेपू, पालक १० रुपये पेंढी दर आहे. हिरवी मिरची ३० ते ४० रुपये किलो आहे. वांगी ५० रुपये किलो असून उर्वरित सर्व फळभाज्याही ५० ते ६० रुपये किलो अशाच आहेत.साखरेचे दर वाढत आहेत. किलोचा दर ३८ रुपयांवर गेला आहे. सणासुदीला नारळाची मागणी असल्याने त्याचाही दर नगाला २० ते ३५ रुपये आहे. उपवासासाठी शाबू व वरी ९० रुपये किलो आहे. तांदूळ २५ ते ६० रुपये, तर ज्वारी २८ ते ५२ रुपये असा दर कायम आहे. गहू दर ३० ते ३५ रुपये आहे. खाद्यतेलांमध्ये वाढ दिसत आहे. सरकी ९० रुपये, शेंगतेल १३५, सोयाबीन ९५, सूर्यफूल १२५ रुपये दर झाला आहे. मूग, मसूर, हरभराडाळ ६० ते ७० रुपयांपर्यंत आहे.सफरचंदांचे ढीगबाजारात सफरचंदांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. सिमला येथून इंडियन सफरचंदांची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने बाजार लालभडक झाला आहे दरही ४० ते ८० रुपये किलो असे आहेत. अननसांची आवक अजून कायम आहे. केळीची आवक वाढली असून दरही ३० ते ४० रुपये डझन आहेत. डाळींब ३० ते ५० रुपये किलो आहेत. आकाराने मोठे असलेले थायलंडचे पेरूही बाजारात दिसत असून नगाची किंमत ३० ते ४० रुपये आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर