शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कांदा महागला, फळांनी बाजार फुलला : भाजीपाल्याची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:47 IST

कांद्याच्या दरातील वाढ या आठवड्यातही कायम असून, किलोचा दर ३५ ते ४० रुपयांवर पोहोचला आहे. साखरेचे दरही दोन रुपयांनी वाढून ३८ रुपयांवर पोहोचले आहेत. खाद्यतेलासह धान्यबाजार स्थिर असून, मागणीअभावी बाजारही शांत आहे. भाजीपाल्याची आवक मात्र चांगलीच वाढली असून त्याचे दरही कमी झाले आहेत. फळांची आवक मोठ्या प्रमाणावर दिसत असून, सफरचंदांच्या लालभडक ढिगांनी बाजार फुलला आहे.

ठळक मुद्देकांदा महागला, फळांनी बाजार फुललासाप्ताहिक बाजारभाव : भाजीपाल्याची आवक वाढली

कोल्हापूर : कांद्याच्या दरातील वाढ या आठवड्यातही कायम असून, किलोचा दर ३५ ते ४० रुपयांवर पोहोचला आहे. साखरेचे दरही दोन रुपयांनी वाढून ३८ रुपयांवर पोहोचले आहेत. खाद्यतेलासह धान्यबाजार स्थिर असून, मागणीअभावी बाजारही शांत आहे. भाजीपाल्याची आवक मात्र चांगलीच वाढली असून त्याचे दरही कमी झाले आहेत. फळांची आवक मोठ्या प्रमाणावर दिसत असून, सफरचंदांच्या लालभडक ढिगांनी बाजार फुलला आहे.रविवारी लक्ष्मीपुरी बाजारपेठेत फेरफटका मारला असता, बाजार फळांनी आणि भाज्यांनी फुललेला दिसला. पावसानेही दिवसभर उघडीप दिल्याने बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. महापूर व अतिवृष्टीमुळे खरिपातील कांद्याचे पीक कुजल्याने गणेशोत्सवापासून सुरू होणाऱ्या नवीन कांद्याची आवक पूर्णपणे थंडावली आहे.

परिणामी, साठवणुकीच्या कांद्यावरच बाजाराच्या मागणीची पूर्तता केली जात आहे. गेल्या आठवड्यात २५ रुपये असणारा दर आता ३५ ते ४० रुपये किलोवर पोहोचला आहे. शिवाय कांद्याची प्रतही खालावलेलीच आहे. आल्याचे दरही अजून चढेच आहेत. १६० रुपये किलो दर आहे. लिंबूचे दरही वाढून आहेत.

अजूनही १० रुपयांना दोन ते तीन लिंबू अशीच विक्री सुरू आहे.कोथिंबिरीचे दर कमी झाले आहे. १० ते १५ रुपयांना पेंढी मिळत आहे. बाजार समितीतही ३४ हजार पेंढ्यांची आवक झाली आहे. पालेभाज्या मात्र बाजारात दुर्मीळ आहेत.

मेथीचे कुठेतरी दर्शन होत असून पेंढीचा दर २० रुपये आहे. कांदापात, शेपू, पालक १० रुपये पेंढी दर आहे. हिरवी मिरची ३० ते ४० रुपये किलो आहे. वांगी ५० रुपये किलो असून उर्वरित सर्व फळभाज्याही ५० ते ६० रुपये किलो अशाच आहेत.साखरेचे दर वाढत आहेत. किलोचा दर ३८ रुपयांवर गेला आहे. सणासुदीला नारळाची मागणी असल्याने त्याचाही दर नगाला २० ते ३५ रुपये आहे. उपवासासाठी शाबू व वरी ९० रुपये किलो आहे. तांदूळ २५ ते ६० रुपये, तर ज्वारी २८ ते ५२ रुपये असा दर कायम आहे. गहू दर ३० ते ३५ रुपये आहे. खाद्यतेलांमध्ये वाढ दिसत आहे. सरकी ९० रुपये, शेंगतेल १३५, सोयाबीन ९५, सूर्यफूल १२५ रुपये दर झाला आहे. मूग, मसूर, हरभराडाळ ६० ते ७० रुपयांपर्यंत आहे.सफरचंदांचे ढीगबाजारात सफरचंदांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. सिमला येथून इंडियन सफरचंदांची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने बाजार लालभडक झाला आहे दरही ४० ते ८० रुपये किलो असे आहेत. अननसांची आवक अजून कायम आहे. केळीची आवक वाढली असून दरही ३० ते ४० रुपये डझन आहेत. डाळींब ३० ते ५० रुपये किलो आहेत. आकाराने मोठे असलेले थायलंडचे पेरूही बाजारात दिसत असून नगाची किंमत ३० ते ४० रुपये आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर